नगर : ‘मातोश्रीपर्यंत जाणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठावंत लोक लागतात, जे गेल्या ३५ वर्षांपासून काम करतात. मला जे शिवसेनेचे तिकीट मिळाले, हे निष्ठेचे फळ आहे,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली.
‘गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात काहीजणांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल खोट्या अफवा होत्या, पण त्यात काही तथ्य नव्हते. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने नगरमधील खोट्या अफवा बंद झाल्या आहेत,’ असेही त्यांनी कोणाचेही नाव न घेता आवर्जून स्पष्ट केले.
नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म घेवून नगरला राठोड आल्यावर केडगावकरांनी रंगोली चौकात त्यांचे स्वागत केले. या वेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, ‘नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार आहे.
नगर शहराचा विकास शिवसेनाच करणार, हा विश्वास जनतेला आहे. ज्यांनी पाच वर्षात नगरकरांना फक्त विकासाचा गप्पा आणि थापा दिल्या, त्याही बंद होतील.’
- राज्याला पुन्हा प्रगतीच्या दिशेने नेण्याचा संकल्प करुयात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- मिलिंद नार्वेकरांकडून फोन..उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर.. पडद्यामागील घडामोडींचा गौप्यस्फोट
- जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर पगारात किती वाढ होणार ? केव्हा लागू होणार 8th Pay Commission ? वाचा सविस्तर
- भारतातील वंध्यत्वाच्या समस्येने केले गंभीर स्वरूप धारण
- Investment Tips: एसआयपीत गुंतवणूक करून दुपटीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर करा ‘हे’ काम! गुंतवणुकीपेक्षा तिप्पट मिळेल पैसा