नगर : ‘मातोश्रीपर्यंत जाणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठावंत लोक लागतात, जे गेल्या ३५ वर्षांपासून काम करतात. मला जे शिवसेनेचे तिकीट मिळाले, हे निष्ठेचे फळ आहे,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली.
‘गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात काहीजणांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल खोट्या अफवा होत्या, पण त्यात काही तथ्य नव्हते. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने नगरमधील खोट्या अफवा बंद झाल्या आहेत,’ असेही त्यांनी कोणाचेही नाव न घेता आवर्जून स्पष्ट केले.

नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म घेवून नगरला राठोड आल्यावर केडगावकरांनी रंगोली चौकात त्यांचे स्वागत केले. या वेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, ‘नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार आहे.
नगर शहराचा विकास शिवसेनाच करणार, हा विश्वास जनतेला आहे. ज्यांनी पाच वर्षात नगरकरांना फक्त विकासाचा गप्पा आणि थापा दिल्या, त्याही बंद होतील.’
- विद्यार्थ्यांनो, 16 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल ! नवीन वेळापत्रक पहा…
- SBI CBO Jobs 2025: पदवीधरांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! CBO पदाच्या तब्बल 2964 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती…
- …….म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय लांबणीवर ! राज्य कर्मचाऱ्यांचा डीए कधी वाढणार ?
- Railway प्रवाशांसाठी गुड न्यूज ! नागपूर रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी चालवली जाणार एक्सप्रेस ट्रेन, पहा….
- अगदी घरी बसून येईल तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स; प्रत्येक दुरूस्तीही होते घरच्याघरी, कशी? तर वाचा