अहमदनगर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारांनी अर्ज भरता आले नाही. मंगळवारी विविध मतदारसंघातून सात उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले.
श्रीरामपूर मतदारसंघात अशोक निवृत्ती बागुल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. नेवासा मतदारसंघात सुनिता शंकरराव गडाख यांनी एक अर्ज क्रांतिकारी शेतकरी पार्टी व एक अर्ज अपक्ष असे २ अर्ज दाखल केले.

पारनेर मतदारसंघात भाऊसाहेब माधव खेडेकर यांनी अपक्ष आणि नीलेश ज्ञानदेव लंके यांनी राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केले. श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांनी भाजपच्या वतीने अर्ज दाखल केला.
कर्जत-जामखेड मतदारसंघात रामदास शंकर शिंदे यांनी भाजपच्या वतीने दोन अर्ज दाखल केले. तर सुमित कन्हय्या पाटील यांनी अपक्ष एक अर्ज दाखल केला. अकोल्यात ७ जणांनी १० अर्ज नेले. संगमनेरमध्ये ७ जणांनी १७ अर्ज नेले.
शिर्डीत ७ जणांनी ९ अर्ज, कोपरगावात १३ उमेदवारांनी २२ अर्ज, श्रीरामपूरमध्ये १६ जणांनी २१ नामनिर्देशनपत्रे नेली. नेवाशात ६ व्यक्तींनी ६ अर्ज नेले.
शेवगाव मतदारसंघात ९ जणांनी १९ अर्ज नेले. राहुरीत १० जणांनी १२ अर्ज नेले. पारनेरमध्ये ११ व्यक्तींनी १२ अर्ज नेले. नगर शहरात एकूण १० लोकांनी १५ अर्ज नेले. श्रीगोंद्यात आज १० लोकांनी १६ अर्ज नेले.
- हिरव्या मिरच्या कापल्यावर हात जळजळतात?, हे 5 घरगुती उपाय लगेचच आराम देतील!
- दातदुखी आणि श्वासाच्या दुर्गंधीवर करा ‘हा’ घरगुती रामबाण उपाय, 100% करेल परिणाम!
- पोलीस अधीक्षकांकडून माहिती ; शनी शिंगणापूर बनावट ऍप प्रकरण दोन कर्मचाऱ्यांच्या नावावर एक कोटी रुपये जमा
- AC कोचमधून बेडशीट, उशी किंवा टॉवेल चोरी गेल्यास कोण असते जबाबदार?, रेल्वेचे नियम काय आहेत? जाणून घ्या
- ‘हे’ आहेत जगातील सर्वात सुंदर 6 रंगीबेरंगी आणि हुशार प्राणी, फोटो पाहूनच थक्क व्हाल!