अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- ढोरजळगाव परीसरातील पावसामुळे पाणी साचून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी व शेतशिवारातील वहिवाट रस्त्याच्या पाहणीसाठी शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड यांनी थेट बैलगाडीने शेतक-यांचा बांध गाठला.
गरडवस्ती – गरवाडी ते ढोरजळगाव ने या शेती जमिनीतील वहिवाट रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी तहसिलदार यांच्याकडे दाद मागितली होती.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व शेतात पिके असल्याने शेतक-यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे त्याची तातडीने दखल घेत तहसिलदार भाकड मंगळवारी प्रत्यक्ष पाहणीसाठी त्या परिसरात गेल्या.
मात्र रस्त्यातील चिखल व पाणी यामुळे त्यांचे वाहन जावू शकले नाही. त्यामुळे त्यांनी माघार न घेता बैलगाडीतुन जात रस्त्यांची तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी, तुर, मुग, सोयाबिन या पिकांची पाहणी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा