Ahilyanagar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. शिर्डीत झालेल्या भाजपच्या परिषदेत त्यांनी याबाबत सूचनाही दिल्या. याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही अशाच प्रकारची भूमिका घेतली होती, ज्यामुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जर भाजपने खरंच स्वबळावर निवडणुका लढवल्या, तर शिंदे गट आणि अजित पवार गटही स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणते चित्र दिसेल, यावर आधारित आमचा हा स्पेशल रिपोर्ट…