कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी सुनील अरविंद नाईक यांनी पोलिसांत खबर दिली. यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मुख्य हवालदार आंधळे करीत आहेत.
- Big Breking कसारा घाट पुढील सहा दिवस राहणार बंद
- राज्यात प्रसिद्ध असलेल्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी ! ग्रामसभेचा ठराव; राज्यात उडाली खळबळ
- नगर जिल्ह्याचा बिहार झालाय ! अतिक्रमण मोहिमेविरोधात खा. नीलेश लंके यांचा संताप
- Breaking ! एसटी प्रवासात महिलांचे ‘हाफ तिकीट’ बंद होणार ? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
- Court News : तू सुंदर दिसतेस असा मेसेज मुलीला पाठवला तर काय शिक्षा होईल ?