नेवासा – दुष्काळ हटलाच नसल्याने कुकाणा परिसरातील उभी पिके पाऊस व पाटपाण्याअभावी संकटात सापडली असून, खरिपाची पिके या आठवड्यात माना टाकू लागली आहेत.
पाटबंधारे विभागाने पाटपाण्याचे योग्य नियोजन केल्यास उभ्या शेतपिकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सुरू असलेले आवर्तन गांभिर्याने घ्यावे, असे आवाहन कुकाण्यातील समता पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग यांनी केले आहे.

कुकाण्यासह परिसरातील देवगाव, देडगाव, तेलकुडगाव, जेऊरहैबती,तरवडी, वडुले, वाकडी, शिरसगाव, चिलेखनवाडी, आंतरवाली, देवसडे, पाथरवाला, सुलतानपूर, सुकळी, नांदूर शिकारीसह लगतच्या शिवारातील पिके पाटपाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पिकांना या दोन-तीन दिवसात पाटपाणी न मिळाल्यास उभी पिके जळण्याची शक्यता आहे. विहिरींना पाणी वाढेल, असा एकही दमदार पाऊस कुकाणा परिसरात अजून झालेला नाही.पिकांचा भरवसा पाटपाण्यावरच आहे
मात्र, आता पाटपाण्याचे नियोजनच महत्वाचे आहे. पाऊसही नाही आणि पाटपाणीही नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कापूस, बाजरी, मका पिके जोमात आहेत. परंतु या पिकांना त्वरित पाण्याची गरज आहे.
कुकाणा परिसरात अजूनही दुष्काळीच परिस्थिती आहे. मुळा धरण भरले असले तरी पिकांना लगेचच पाटपाणी मिळेल याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे उभी पिके हातातून जातात की काय याच चिंतेत शेतकरी आहेत, असेही श्री. अभंग यांनी म्हटले आहे.
- क्रिकेट इतिहासातील अजब विक्रम! कसोटीच्या पहिल्या बॉलवर सिक्स मारणारा जगातील एकमेव फलंदाज, कोण आहे हा खेळाडू?
- मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचा आता ‘या’ जिल्ह्यापर्यंत विस्तार होणार ! कसा असणार 21 हजार 670 कोटी रुपयांचा नवा मार्ग ?
- महागडं पॉलिश विसरा! घरातील लाकडी दरवाजाला ‘या’ 1 चमचा तेलाने येईल नव्यासारखी चमक, जाणून घ्या ही जबरदस्त ट्रिक
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 5 जुलैला चालवली जाणार एक नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘ह्या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार
- पैसे कमावायचे असतील तर श्रीमंत लोकांच्या ‘या’ सवयी आजच अंगीकारा; आयुष्य बदलून जाईल!