नेवासा – दुष्काळ हटलाच नसल्याने कुकाणा परिसरातील उभी पिके पाऊस व पाटपाण्याअभावी संकटात सापडली असून, खरिपाची पिके या आठवड्यात माना टाकू लागली आहेत.
पाटबंधारे विभागाने पाटपाण्याचे योग्य नियोजन केल्यास उभ्या शेतपिकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सुरू असलेले आवर्तन गांभिर्याने घ्यावे, असे आवाहन कुकाण्यातील समता पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग यांनी केले आहे.

कुकाण्यासह परिसरातील देवगाव, देडगाव, तेलकुडगाव, जेऊरहैबती,तरवडी, वडुले, वाकडी, शिरसगाव, चिलेखनवाडी, आंतरवाली, देवसडे, पाथरवाला, सुलतानपूर, सुकळी, नांदूर शिकारीसह लगतच्या शिवारातील पिके पाटपाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पिकांना या दोन-तीन दिवसात पाटपाणी न मिळाल्यास उभी पिके जळण्याची शक्यता आहे. विहिरींना पाणी वाढेल, असा एकही दमदार पाऊस कुकाणा परिसरात अजून झालेला नाही.पिकांचा भरवसा पाटपाण्यावरच आहे
मात्र, आता पाटपाण्याचे नियोजनच महत्वाचे आहे. पाऊसही नाही आणि पाटपाणीही नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कापूस, बाजरी, मका पिके जोमात आहेत. परंतु या पिकांना त्वरित पाण्याची गरज आहे.
कुकाणा परिसरात अजूनही दुष्काळीच परिस्थिती आहे. मुळा धरण भरले असले तरी पिकांना लगेचच पाटपाणी मिळेल याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे उभी पिके हातातून जातात की काय याच चिंतेत शेतकरी आहेत, असेही श्री. अभंग यांनी म्हटले आहे.
- Samsung Galaxy M16 5G आणि M06 5G लाँच होताच स्वस्तात विक्रीला Amazon वर बंपर डील्स
- Volvo XC90 नव्या रूपात येणार ! 25 KMPL मायलेज देणारी 7 सीटर SUV
- Nothing चा नवा गेमचेंजर ! CMF फोन 2 मध्ये तगडा प्रोसेसर आणि 50MP कॅमेरासह लॉन्च होणार
- 200MP कॅमेरा आणि 12GB RAM असलेला Redmi Note 13 Pro आता 20 हजारांत
- 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung स्मार्टफोन मिळतोय इतका स्वस्त