आता पर्यंत कोरोनामुळे झाला ‘इतक्या’ नगरकरांचा मृत्यू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील ३५८ रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८७ टक्के आहे. दरम्यान रुग्णसंख्येत ५९८ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३९३५ झाली आहे. चौघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या ७३६ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १११, खासगी प्रयोगशाळेत १६० आणि अँटीजेन चाचणीत ३२७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ५०, अकोले १६, जामखेड १, कोपरगाव २, नगर ग्रामीण २, नेवासे ५, पारनेर १, पाथर्डी ५, राहाता १, राहुरी १, संगमनेर २, शेवगाव ११, श्रीगोंदे ७, श्रीरामपूर १ रुग्णाचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा ३३, अकोले ४, जामखेड २, कर्जत ६, कोपरगाव ५, नगर ग्रामीण २१, नेवासे ६, पारनेर ६, पाथर्डी २, राहाता ३३, राहुरी ११, संगमनेर १५, शेवगाव २, श्रीगोंदे ३, श्रीरामपूर ११ रुग्ण आहेत. अँटीजेन चाचणीत मनपा १२, अकोले २२, जामखेड ४६, कर्जत ३६, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १०, नेवासे २, पारनेर ५, पाथर्डीचे ४१ रुग्ण आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe