चिंता मिटली,जिल्ह्यातील धरणांत आहे इतका जलसाठा !

अहमदनगर :- दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला कमी प्रमाणात पाऊस होतो. मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र सुरुवातीला चांगला पाऊस होतो. ऑगस्टच्या मध्यात ही धरणे जवळपास भरत येतात. परंतु, यंदा परतीच्या पावसामुळे व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सध्या साठ्याची स्थिती चांगली आहे. यंदा नोव्हेंबर महिना संपत आला असला, तरी … Read more

शेतीच्या वादातून महिलेस लाथाबुक्यांनी जबर मारहाण, पतीस ठार मारण्याची धमकी!

अहमदनगर : कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला असून तुमच्या कोर्टाच्या निकालानंतर व ताबा मिळाल्यानंतर तुम्ही शेती करा.असे सांगितल्याचा राग आल्याने पाच जणांनी एका महिलेस मारहाण करून जबर जखमी केले आहे. याबाबत जानकाबाई कचरू पिंपळे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर असे की, या शेतीचा वाद कोर्टात सुरू आहे.व निशान पाच या … Read more

लाथाबुक्क्याने व काठीने बेदम मारहाण करत १० हजार हिसकावले

नगर – जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात यादववाडी फाट्याजवळ शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विजय मारुती शिंदे, वय ३६, रा. भोवळगाव, ता. श्रीगोंदा हे दुचाकीवरुन जात होते.  त्याचवेळी  मागील भांडणाच्या कारणातून आरोपी नाना आडोले, रा. यादववाडी, पारनेर व इतर दोन जण यांनी दुचाकीला दुचाकी आडवी घालून लाथाबुक्क्याने व हे काठीने बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली. जोडीदाराच्या खिशातून १० हजार … Read more

जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे ? शालिनी विखे की राजश्री घुले

 नगर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे जाणार की, पुन्हा विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे अध्यक्षपद आपल्याकडेच राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. महिन्याभरात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सध्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे आहेत. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे आहे.  शालिनी विखे  … Read more

आमदार संग्राम जगताप मंत्रिपदाचे दावेदार

नगर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने नगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून नगरचे आमदार संग्राम जगताप यांना नक्कीच मंत्रिपद मिळेल, असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केला.   जगताप यांच्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जिल्ह्याचे मंत्रिपद निश्चित आहे. मात्र, ते कोणाला … Read more

भरदुपारी एसटी स्टॅण्डवर ५ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडले !

नगर –  नगर शहरात लुटमार करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच शहरातील  माळीवाडा परिसरात एसटी स्टॅण्ड येथे दुपारी ४.३० च्या सुमारास महिलेचे गळ्यातील ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरांनी ओरबाडून धूम ठोकली.  सौ. उषा चंद्रकांत केदार असे या सेवानिवृत्त महिलचे नाव  असून (रा. पाईपलाईन रोड, वैष्णवी कॉलनी, नगर) येथे राहत आहेत.  सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत १. २५ … Read more

भाजपने बबनराव पाचपुते यांच्याकडे दिली ही जबाबदारी !

अहमदनगर :- भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आपल्या बाजूने आणण्याची जबाबदारी भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्याकडे सोपवली आहे. आम्ही विधीमंडळात बहुमत सादर करू. यात मला अजिबात साशंकता वाटत नाही. ‘ऑपरेशन लोटस’बाबत गुप्तता राहू द्या, असे सूचक वक्तव्य बबनराव पाचपुते यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी माझा चांगला संबंध आहे आणि त्यासोबत सर्व आमदारांसोबत माझा … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ आमदार शरद पवार यांच्यासोबत

अहमदनगर – राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला. त्याचे धक्के राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात बसले. राजकीय विश्वच हादरून गेले. त्याला कारणही तसेच आहे.  भाजपाने राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. सत्तास्थापनेवेळी अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील 11 आमदार गेल्याचे … Read more

अहमदनगर महापालिका सत्ता पॅटर्न आता राज्यात ?

अहमदनगर : अहमदनगरच्या महानगरपालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली आहे.नगरचा हा सत्ता पॅटर्न आता राज्यात राबविण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपने राज्यात हाच पॅटर्न राबवित सत्ता स्थापन केली आहे. सन २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात नगरच्य मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली होती.या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक २४,राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

हॉटेल सोडून जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना शिवसेना नेत्यांनी पकडले ? आणि नंतर ……

अहमदनगर :- बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आपल्या आमदारांच्या सुरक्षीततेसाठी हे तिन्ही पक्ष सावध झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काल दिवसभर धावपळ करुन सायंकाळपर्यंत आमदार गोळा केले आहेत सध्या या आमदारांवर छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांचे विशेष लक्ष आहे. आता शिवसेनेचे आमदार मुंबईत हॉटेल ललितमध्ये आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे … Read more

माजीमंत्री बबनराव पाचपुतेच ठरविणार देवेंद्र फडणवीस – अजित पवारांचे भवितव्य !

अहमदनगर :- कालची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. अजित पवार यांनी बंडखोरी करत थेट भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.या बंडखोरीची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे. मात्र याच बंडखोरीमुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विधानसभेत … Read more

नगर शहरातील त्या वेश्या व्यवसायाबाबत धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर :- शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात एक महिलेला ताब्यात घेतले आहे. तर एका पिडीत बांग्लादेशीय तरूणीची सुट्का कारण्यात आली आहे.  तारकपूर बसस्थानकासमोरील प्रेरणा आर्केड बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. एक एजंट महिला, बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या नंतर याबाबत धक्कादायक … Read more

नव्या सरकारबाबत आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ही प्रतिक्रीया

शिर्डी :- विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेन भाजपालाच पसंती दिली होती.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येणार हा आत्मविश्वास आम्हाला होता, मी पुन्हा येईन असे जनतेला त्यांनी  दिलेले अभिवचन त्‍यांनी कृतीतुन खरे करुन दाखविले असल्‍याची प्रतिक्रीया माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या ७० व्‍या गळीत हंगामाच्‍या कार्यक्रमानंतर आ.विखे … Read more

खासदार सुजय विखे पाटील नव्या सरकार बाबत म्हणतात ….

अहमदनगर :- आज सकाळी झालेल्या राज्याच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचा झटका मलाही बसला अशी प्रतिक्रिया खा.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि भाजपाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा … Read more

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सहाही आमदार शरद पवार यांच्या मागे !

अहमदनगर :- आज सकाळी अचानक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. या निर्णयाची मतदारांना जशी कल्पना नव्हती तशी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना देखील कल्पना नसल्याचे समजते. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. यापैकी सर्व आमदार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी … Read more

नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

नगर: महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर पंपिंग स्टेशन येथील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर, तसेच विळद पंपिंग स्टेशन येथे बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पंपिंग स्टेशनहून होणारा पाणीपुरवठा बंद झाला. वीजपुरवठा सुरू … Read more

आमदार-खासदार असतानाही दादापाटील शेळके यांचा साधेपणा कधी हरवला नाही !

अहमदनगर :-दादापाटील शेळके हे दोन वेळेस लोकसभेत व चार वेळेस विधानसभेत निवडून गेले होते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ व नगर विधानसभा मतदारसंघात त्यांचे अनेक दशके वर्चस्व राहिले.  त्यांच्यावर नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.उपचार सुरू असताना आज रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनामुळे नगर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली. दादा पाटील शेळके यांनी नगर तालुका सहकारी साखर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधन

अहमदनगर : माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके (वय 79) यांचे आज रात्री निधन झाले नोबेल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांचा अंत्यविधी  खारे खर्जुने येथे उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे. १९९६ मध्ये वयाच्या ५५ व्या वर्षी दादापाटील शेळके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार झाले होते.  शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा … Read more