मुळा धरणातून ३ हजार क्युसेकने पाणी सोडले

राहुरी शहर : मुळा धरणातून नदी पात्रात तीन हजार क्यूसेकने काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली. मुळा धरणाचा पाणी साठा २५ हजार ७३८ टीएमसी असून धरणात ३ हजार ४०० क्यूसेकने आवक सुरु असून धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरु आहे. धरण ९८ टक्के भरले आहे. मुळा उजवा … Read more

राज्यात पुन्हा युतीचे सरकार !

राहुरी : पाच वर्षात सत्तेवर असताना आम्ही केलेल्या विविध लोककल्याणकारी कामांमुळेच राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे महाजनादेश यात्रेनिमित्त लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अधोरेखित झाले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात राहुरी फॅक्टरी येथे मुख्यमंत्री बोलत होते. राहुरी फॅक्टरी येथे देवळाली प्रवरा शहरवासियांच्या वतीने आमदार चंद्रशेखर कदम … Read more

राधाकृष्ण विखे-पाटलांना दिलासा

मुंबई : राज्यात नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणारे नवनिर्वाचित मंत्री काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपच्या गोटात सामील झालेले राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले जयदत्त क्षीरसागर आणि रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला.  त्याच्या मंत्रीपदाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. बहुचर्चित … Read more

संगमनेरची निवडणूक लक्षवेधी ठरणार आ.थोरांताविरोधात इंदुरीकर महाराज निवडणूक लढविणार ?

संगमनेर – येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज निवडणूक रिंगणात उतरणार अशी दबक्या आवाज चर्चा होती. मात्र आज शुक्रवारी संगमनेर येथील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने इंदुरीकर महाराज थोरातांविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज रिंगणात उतरणार या दबक्या … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर महिलेकडून शाईफेक !

अहमदनगर : अकोले तालुक्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शाईफेकीची घटना घडली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ता शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिशय शाई फेकून निषेध केला. शासनाने महापोर्टल बंद केले, अकोले तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. अकोले येथे सुगाव शिवारात … Read more

मुलीची छेड काढणारा ‘तो’ तरुण पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर – शहरातील हॉटेल उदय पॅलेससमोर मुलीची छेड काढणाऱ्यास पोलिसांनी काकडी (ता. राहाता) येथून पकडून आणले. तरुण तालुक्यातील खानापूर येथील आहे. मात्र, ज्या मुलीची छेड काढली तिने तक्रार दिलेली नसल्याने पोलिसांना पुढील कारवाईस अडचणी येत आहे. त्यामुळे तक्रारीसाठी पुढे येण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. ही घटना सिद्धीविनायक गणपती मंदिराजवळ घडली. यावेळी मुलीने हिमत दाखवित सदर … Read more

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

संगमनेर : शहरातील एका रस्त्यावर विजय अण्णासाहेब दिघे (वय २४, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) याने एका एकवीस वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.  याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास विजय अण्णासाहेब दिघे याने तरुणीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कोपरगाव : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पुणतांबा चौफुली ते इगडेफाटा दरम्यान गुरसळ वस्ती, डाऊच खुर्द (ता. कोपरगाव) येथे शनिवारी (दि. ७) रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  याबाबत अधिक माहिती अशी, रवींद्र सर्जेराव जानराव (वय ४२, रा. अंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक) हे दुचाकी (क्र. एमएच १५, बीएस ८३८०) वरून जात … Read more

आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…

श्रीरामपुर:-भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात श्रीरामपुरात फलक लावण्यात आले असून ‘आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…’ असा मजकूर असलेल्या या फलकांची जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. यामुळे श्रीरामपुरातील कांबळे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर आता युतीच्या नेत्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार व नुकत्याच … Read more

आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे…यशवंतराव गडाख यांचे कार्यकर्त्याना भावनिक आवाहन

नेवासा :- ‘मी चाळीस-पन्नास वर्षे राजकीय संघर्षात घालवली. संस्था वाढवल्या जपल्या मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी वरून कीर्तन आतून तमाशा करू नये.  माझे भाषण हे शेवटचे आहे का मला माहिती नाही. मला काही मागायचे नाही तुम्हाला पण आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे,’ असे भावनिक आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले. गडाख अलीकडेच आजारपणातून … Read more

माजी आ. शंकरराव गडाख ‘या’ पक्षाकडून लढणार विधानसभा !

नेवासे : माजी आ. शंकरराव गडाख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ‘क्रांतिकारी’ पक्षाकडूनच निवडणूक लढणार असल्याची घोषणा आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख उपस्थित होते, विशेष म्हणजे युवा नेते प्रशांत गडाख मांडवाबाहेर कार्यकर्त्यांसमवेत बसले होते. यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी ‘राजकीय पळापळ’ करणार्‍यांची खिल्ली उडवली, तसेच वरुन किर्तन आतून तमाशा न करण्याचं आवाहनही … Read more

आ.मुरकुटे यांच्यावर विखे, कर्डिले, घुलेंचे कार्यकर्ते संतापले!

नेवासे :- तत्कालीन लोकप्रतिनिधी गप्प राहिल्याने २००५ चा समन्यायी पाणीवाटप कायदा झाला. तालुक्याचे पाणी जायकवाडीला गेले हे त्याच लोकप्रतिनिधींचे पाप आहे, अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.  वडाळा बहिरोबा येथे रविवारी रात्री विकासदिंडीत आयोजित सभेत मुरकुटे यांनी जिल्ह्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींवर पाटपाणी प्रश्नी जोरदार हल्ला चढवला. तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या जाेरावर संधी देण्याचे आवाहन करतानाच पाटपाणी … Read more

प्रेयसीला डिझेल टाकून पेटवले, प्रियकराला अटक

नाशिक :- प्रेससंबंधांतून प्रेयसीवर डिझेल टाकून तिला पेटवून देत जिवे मारण्याचा धक्कादायक प्रकार आडगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयिताच्या विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत या महिलेला मेडिकल काॅलेज महाविद्यालयात दाखल करण्यात आल होते. प्रकृती खालावल्याने तिला संंगमनेरला प्रवरा मेडिकल काॅलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आडगाव पोलिसांनी संशयिताला … Read more

‘त्या’ पाणी योजनेशी विखेंचा संबंध नाही

संगमनेर :- अंभोरे ग्रामपंचायतीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २ कोटी १८ लाखांचा निधी मिळवला. त्यात मंत्री राधाकृष्ण विखेंचे कोणतेही योगदान नाही. निधी मिळाला तेव्हा विखे हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, असे सरपंच भास्कर खेमनर यांनी सांगितले. अंभोरे पेयजल योजनेच्या श्रेयावरून थोरात-विखे गटात कलगीतुरा रंगला … Read more

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोले : भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, तालुक्यातील भंडारदरा धरणातून ३४ हजार १२५ क्यूसेक, तर निळवंडे धरणातून २८ हजार १९८ क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अकोले तालुक्यात पावसाची संततधार सर्वदूर सुरूच असून मुळाखोरे, आढळा खोरे, प्रवरा खोऱ्यासह भंडारदरा पाणलोट क्षेत्रात … Read more

कोपरगावात निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे !

कोपरगाव :- विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार याची खात्री पटल्याने सहकार सम्राट हादरले आहेत. प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यांवरील सहकारी संस्थांमधील हक्काचे कर्मचारी हेरगिरी करण्यासाठी त्यांनी नेमले आहेत. गेल्या किमान तीन महिन्यांपासून तथाकथित लोकप्रिय नेत्यांनी सहकारातील कर्मचाऱ्यांना स्वतःचे गुलाम समजून राजकारणासाठी राबवणे चालू आहे, असा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव :- दहेगाव येथील वैशाली संदीप अनर्थे (वय ३२) हिस पती, सासू-सासरे यांनी घर बांधण्याकरिता माहेरून १५ हजार रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. या संदर्भात मृत वैशाली संदीप अनर्थे हिचा भाऊ नीलेश आनंदराव कांबळे (महादेवनगर) यांनी पती … Read more

पिचड यांंच्या विरोधात माकप लढणार : डॉ. अजित नवले

अकोले :- पराभवाची भीती आणि राजकीय लोभापायी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पिचड पिता-पुत्र भाजपवासी झाले. राष्ट्रवादीचे तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेही पिचडांसोबत भाजपत गेले. अशा परिस्थितीत विरोधक म्हणून आता गावोगावी संघटन असलेला माकप हा एकमेव राजकीय पक्ष शिल्लक आहे. माकप संपूर्ण ताकदीने या विधानसभा निवडणुकीत हस्तक्षेप करून राजकीय तत्त्वनिष्ठता आणि पावित्र्याची जपवणूक करण्यात आघाडीवर राहील, असे … Read more