नेवासा :- ‘मी चाळीस-पन्नास वर्षे राजकीय संघर्षात घालवली. संस्था वाढवल्या जपल्या मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी वरून कीर्तन आतून तमाशा करू नये.
माझे भाषण हे शेवटचे आहे का मला माहिती नाही. मला काही मागायचे नाही तुम्हाला पण आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे,’ असे भावनिक आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.
गडाख अलीकडेच आजारपणातून सावरले आहेत. त्यानंतर त्यांची ही पहिलीच मोठी सभा होती. त्यामध्ये त्यांचे आक्रमक रूप पहायला मिळाले.
सोनई येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा मेळावा यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. त्यांचे चिरंजीव माजी आमदार शंकराव गडाख यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी हा मेळावा घेण्यात आला.
यावेळीही गडाख कोणत्यात पक्षात न जाता आपल्या शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फेच निवडणूक लढविणार आहेत.
त्यानंतर ज्या पक्षाची सत्ता येईल, त्यांच्यासोबत जाण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणाही या मेळाव्यात करण्यात आली.
तालुक्यात पाण्याची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना ठाऊक आहे. अनेक पिके जळून गेली, जर पाऊस आला नसता, तर काय अवस्था झाली असती.
आपलं पाणी खाली चालले आहे आता तर सुमारे २ टीएमसी पाणी बीडला देण्याचा निर्णय झाला आहे. यावर तालुक्याचा आमदार काही बोलत नाही.
शंकरराव आमदार असताना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी व अकोले तालुक्यात धरणे बांधली जात असताना आपल्याच सरकारचे ज्येष्ठ मंत्री पिचड यांच्याशी वाईटपणा घेतला.
आगामी निवडणुकीत पाणीप्रश्नांवर लढणाऱ्याला विधानसभेत पाठवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.
- अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित
- आरोग्य व्यवस्थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहमदनगर : स्वतःच्या जमिनीत सापडलेले गुप्तधन परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका ! सुनावणी सुरु, आतापर्यंत काय-काय घडलं ?
- NCL Pune Bharti 2024 : NCL पुणे मध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी!
- भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले ! पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा