अहमदनगर ब्रेकिंग :रक्ताच्या नात्याला काळिमा वडिलांकडून मुलीवर अत्याचार !

पारनेर :- तालुक्यातील सुपे येथे वडिलांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून रक्ताच्या नात्याला काळिमा फासलीय. या घटनेमधील पीडिता अल्पवयीन आहे. वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,सुप्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बापाने शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास स्वतःच्या मुलीस वासनेची शिकार बनवली. अत्याचारानंतर कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची … Read more

सरसकट पीक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील: आ.तनपुरे

अहमदनगर: योग्य पद्धतीने नियोजन करून मुळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी नगर पाथर्डी तालुक्यांसाठी योजनेमार्फत पुरवले जाईल. शेतकऱ्­यांच्या जनतेच्या हिताच्या प्रश्­नासाठी कायम कटिबद्ध असून, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्­यांना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सरसकट पिक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील खोसपुरी येथे … Read more

मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास तीन वर्षे शिक्षा

नेवासा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत भाऊसाहेब पवार (रा. लोहगाव, सोेनई, ता. नेवासा) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत पवार याने सन २०१८ साली पिडीत मुलगी ही दहावीचा पेपर देण्यासाठी जाताना व … Read more

आ. थोरातांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम

संगमनेर : सहकारामुळे रोजगार निर्मिती होवून ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. शासनाने नेहमी सहकाराला पूरक असे धोरणे घेणे गरजेचे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम असून, शेतकऱ्यांसाठी शाश्­वत असलेल्या ऊस पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब … Read more

कांद्यास सहा हजार रूपये भाव

राहुरी : बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर काल गावरान कांद्याची २,९५० गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास सहा हजार रूपये क्विंटल भाव मिळाला असून लाल कांद्याची १२२७ कांदा गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास तीन हजार रूपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे (गावराण … Read more

पोटनिवडणुकीचा खर्च ‘त्या’ उमेदवारांकडून वसूल करावा

जामखेड : सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले आमदार, खासदार नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: राजीनामा दिल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारास विज़यी घोषित करावे तसेच अशा मतदारसंघात सरकारी खर्चातून पुन्हा निवडणूक घेऊ नये, यदा कदाचित पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्यास राज़ीनामा दिलेल्या उमेदवाराकडून पोटनिवडणुकीचा खर्च वसूल केला ज़ावा अशी मागणी महाराष्ट्र धडाका आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. महारुद्र … Read more

शेतीच्या वादातून बेदम मारहाण 

अहमदनगर : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथे शेतातील पाईप कोणी काढले असे विचारल्याचा राग येवून ८ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळासाहेब भगवंत मगर (वय ६७, रा. जेऊर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शेतातील पाण्याचे पाईप काढलेले दिसल्याने त्यांनी पाण्याचे पाईप कोणी … Read more

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

श्रीरामपूर : वडिलांनी बोलाविले असल्याचे सांगून येथील एका शाळेत सहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. टिळकनगर येथील संविधान कॉलनीत काल दुपारी हा प्रकार घडला. ही अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी असता एक तरुण तोंडाला रुमाल बांधून लाल टी शर्ट व काळी जीन्स पॅन्ट परिधान करून दुचाकीवरून मुलीच्या घरी आला. तुला तुझ्या … Read more

बनावट सातबारा तयार करुन फसवणूक

अहमदनगर :- बनावट कागपत्र तयार करुन भूविकास बँक व महसुल कर्मचार्‍यांनी संगनमतीने वडिलोपार्जित साडे नऊ एकर शेतजमीन बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नंदू विधाते यांनी केला आहे. चार वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नंदू विधाते यांचे वडिल नाना उर्फ वसंत विधाते यांच्या मालकीची … Read more

राजकारण कळत नाही, असे मी म्हणायचो, पण विधानसभेनंतर मला कळले आहे की येथे…..

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पुलात बाधीत होणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांना २५ नोव्हेंबरपर्यंत हमीपत्र भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून दिल्यामुळे मालमत्ताधारकांना सुमारे २५ टक्के आर्थिक नुकसान टाळता येणार आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दिली. उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेतील मालमत्ताधारकांची बैठक खासदार विखे यांनी बोलावली होती. … Read more

त्या तरुणाची दोन दिवसांनंतरही ओळख पटली नाही

राहुरी :- मुळा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाची ओळख दोन दिवसांनंतरही पटू शकलेली नाही. हा तरुण शनिवारी दुपारी मुळा धरणाच्या प्रवेशद्वाराशेजारच्या दत्त मंदिराजवळ थांबला होता. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह उजवा कालव्याच्या पंपहाऊसलगत पाण्यावर तरंगताना आढळला. गावकऱ्यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. ओळख पटवण्यासाठी मृतदेह राहुरी येथील शवविच्छेदन केंद्रात ठेवण्यात आला आहे. पोलिस … Read more

जीवघेण्या हल्ल्यानंतरही आरोपीवर कारवाई नाही,पाचपुतेंची तक्रार

अहमदनगर :- नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील हॉटेलमध्ये मी झोपलेलो असताना अज्ञात व्यक्तीने खुनी हल्ला केला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला होतानाचे चित्रीकरण पोलिसांना दिले आहे, पण गुन्हा घडून २२ दिवस झाले, तरी कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. या घटनेुळे आमचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून चौकशी करण्यास गेल्यास पोलिस … Read more

पोलिसांच्या दुर्लक्षाने पती-पत्नीचा खून !

श्रीगोंदे :- एक महिन्यापूर्वी गोरख भदे व त्यांची पत्नी सुरेखा भदे यांना जाळून मारण्यात आले. याबाबात खुनाचा गुन्हा दाखल झाला. या दोघांच्या जबाबात पोलिस यंत्रणेने वेळेवर दखल घेतली नसल्याने त्यांची हत्या आरोपीने केली. या खुनाचा निःपक्षपातीपणे तपास व्हावा, यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे साहेबराव रासकर यांच्यासह नातेवाईक, तर दुसऱ्या घटनेत पोलिसांनी मारहाण केली असल्याने कोकणगावमधील … Read more

आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू !

अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब … Read more

महा’शिव’आघाडी बद्दल खा. सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर : ”शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडी करून सत्तास्थापन करत आहेत. मात्र युतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा फॉर्म्युला ठरवून दिला आहे. तो शिवसेनेने आठवायला पाहिजे. त्यानुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे युती असताना दिलेला हा फॉर्म्युला आहे. तो शिवसेनेने जपला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय … Read more

श्रीरामपूरसह जिल्ह्यातील नगरपालिकांना रस्त्यांसाठी विशेष निधी द्यावा- स्नेहल खोरे

श्रीरामपूर – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, देवळाली-प्रवरा, कोपरगाव, संगमनेर, राहता, राहुरी, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे.  याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या मागणी पत्रात सौ.स्नेहल खोरे यांनी म्हटले आहे … Read more

श्रीगोंद्यात बांधकाम व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू

नगर: दौंड – अहमदनगर रस्त्यावर काष्टी येथील शिवनेरी हॉटेलसमोर दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात श्रीगोंदा येथील बांधकाम व्यावसायिक जय मरकड यांचा मृत्यू झाला तर स्कॉर्पिओ गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागेश होलम यांनी सांगितली. एमएच १६ बीएच ४७१० आणि एमएच ४२ के ८६२२ या दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर धडकून … Read more

…तर आ.शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात,रोहीत पवार,संग्राम जगताप होणार मंत्री !

अहमदनगर :- मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.  राज्यात शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे महाशिवआघाडी … Read more