नेवाशात ‘जयहरी’ का ‘जय क्रांतिकारी’?

नेवासा – संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या नेवासा विधानसभा मतदार संघात मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला देणार धक्का? असा सवाल मतदार संघात उपस्थित केला जात असून उद्या नेवासा मतदार संघात ‘जयहरि’ का ‘जय क्रांतिकारी’ चा जयघोष होतो याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.  नेवाशात दोन्ही उमेदवारांनी अटीतटीने निवडणूक लढवली. त्यामुळे गडाख – मुरकुटे समर्थकांकडून विजयाचा दावा … Read more

श्रीरामपुरात कांबळे की कानडे? उत्सुकता शिगेला…

श्रीरामपूर – श्रीरामपूर मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे त्यांच्या विरोधात कांग्रेसचे उमेदवार साहित्यिक लहू कानडे यांनी कडवी झुंज दिली आहे. कांबळेंच्या पाठिशी गृहनिर्माण मंत्री ना. विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे सभापती दीपक पटारे, भाजपाचे प्रकाश चित्ते आदींच्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. शिवाय २२ नगरसेवकांचा फौजफाटा होता.  दुसऱ्या बाजूला कॉग्रेसचे लहू कानडे यांच्या मागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

जिल्ह्यात युतीचे पारडे जड?

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर शिवसेना – भाजप महायुतीचे पारडे जड दिसून येत आहे. नगर जिल्ह्यामध्ये विद्यमान ११ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेने चार, भाजपने आठ, काँग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादीने आठ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.  श्रीगोंद्यामध्ये राहुल जगताप यांनी निवडणूक न लविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप युतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना … Read more

राहुरीत आ.कर्डिलेंना धाकधूक, तर तनपुरेंना उत्सुकता

राहुरी – निवडणुकीच्या सुरुवातीला आ. कर्डिले यांनी आपण १ लाख मताधिक्क्याने निवडून येवू, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. मात्र निवडणुकीदरम्यान राहुरी तालुक्याच्या मतदारांमध्ये झालेली एकी, पाथर्डी – नगर भागात गेल्या दोन निवडणुकीपेक्षा तनपुरेंची सुधारलेली परिस्थिती पहाता उद्याच्या निकालाची तनपुरे गटाला उत्सुकता आहे.  तर आ. कर्डिले गटाला धाकधूक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या प्रारंभी कर्डिले … Read more

भारत-पाक सीमेवर शत्रूशी दोन हात करताना अहमदनगरचा जवान शहीद

अहमदनगर :- भारत – पाक सिमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे.  कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती.  लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच … Read more

या ठिकाणी होणार अहमदनगर जिल्ह्यातील मतमोजणी…

अहमदनगर ;- मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  विधानसभा निवडणुकी साठीची मतमोजणी प्रक्रिया ही त्या-त्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्याची सर्व तयारीही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे. त्याठिकाणी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली आहे. विशेषता तेथील सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असणार आहे. तेथील … Read more

रेशनिंगच्या काळ्याबाजाराचा भांडाफोड

अहमदनगर – शहराच्या तांगे गल्ली येथील स्वस्त धान्य दुकानातील रेशनिंगचा माल इतर गोण्यात पॅकिंग करुन विक्रीसाठी टेम्पोमध्ये भरला जात असताना जन आधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन रेशनिंग मालाच्या काळ्याबाजाराचा भांडाफोड केला. रेशन दुकान मालकांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला असता पोटे यांनी यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारींसह जिल्हा पुरवठा विभागाला कळविले. पुरवठा विभागाच्या अधिकारी … Read more

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चार नगरसेवकांचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर ;- महानगर पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा सभागृहाचा दोन वर्षापुर्वी ठराव झालेला असताना पुतळा तातडीने बसविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार वाकळे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह 11 शिवप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात आली. सदर पुतळ्याचे काम प्रगतीपथावर न आल्यास 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा … Read more

श्रीगोंदे तालुक्यात मुसळधार पाउस, नद्यांना पूर, शेतकरी खुश

श्रीगोंदे – परतीच्या पावसाने श्रीगोंदे तालुक्यात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कोळगाव, पारगाव, घारगाव, येळपणे, येथील नद्यांना पूर आला. दुथड्या भरून वाहणाऱ्या नद्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. २-३ तास चाललेल्या पावसाने गावातील मुख्य रस्त्यांवर दोन ते अडीच फुटांपर्यंत … Read more

इव्हीएममध्ये घोळ असल्याची गडाख समर्थकांची तक्रार

कुकाणे :- नेवासे बुद्रूक व साईनाथनगर येथे मतदान यंत्रात घोळ झाल्याची तक्रार गडाख समर्थकांनी केली आहे. मतदान यंत्रातील सात नंबरचे बटण दाबल्यावर एक नंबरचा दिवा लागत असल्याचे मतदारांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार घेतली नाही, असे बाळासाहेब कोकणे यांनी सांगितले, तर याबाबत तक्रार दिली नसल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी सातपासून मतदान केंद्रांवर … Read more

अहमदनगर मध्ये अवघ्या ७.५० लाखांमध्ये फ्लॅट !

केडगाव :- परवडणाऱ्या दरात सर्व सुखसोयींनी सुसज्ज हक्काचे घर असावे असे मनोमन वाटणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करणारा १ बीएचके फ्लॅटचा स्वप्नपूर्ती हा अतिभव्य गृहप्रकल्प केडगाव-कल्याण लिंकरोडवर साकारला जात आहे. स्वप्नपूर्ती साकारणारे ‘शुभवास्तू रियल्टी’ फर्म क्रेडाई अहमदनगरचे सदस्य आहे. या आठ बिल्डिंगच्या गृहप्रकल्पातील चार बिल्डिंगमधील फ्लॅटचे बुकिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित चार बिल्डिंगमधील फ्लॅटसाठी गुरुवार, २४ ते २८ … Read more

प्रतिभा पाचपुतेंसह चार महिलांविरोधात गुन्हा

श्रीगोंदे | काष्टी येथील मतदान केंद्र २८० मध्ये बळजबरीने घुसून मतदान कंट्रोल मशीनची पूजा करून त्याचा फोटो काढल्याची तक्रार केंद्राध्यक्ष सीताराम नाना घोडके यांनी दिल्यानंतर भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांची पत्नी प्रतिभा पाचपुतेंसह अन्य चार महिलां विरोधात मंगळवारी पहाटे श्रीगोंदे पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिभा बबन … Read more

बाळासाहेब थोरात म्हणतात जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय !

अहमदनगर :- जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडासाफ झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतंय. पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात … Read more

निवडणुकीनंतर रोहित पवारांनी केल हे ‘काम’ !

बारामती :- महाराष्ट्राच्या राजकारणातील आश्वासक युवा चेहरा म्हणून रोहित पवार ओळखले जातात. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू म्हणून त्यांची विशेष ओळख. बारामती हा आपला बालेकिल्ला सोडून रोहित थेट कर्जत-जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. गेली पाच-सहा महिने रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे आपली लाडकी मुलगी आनंदीता आणि मुलगा शिवांश यांना त्यांना वेळ देता … Read more

जामखेडला मतदानाचा टक्का वाढला

जामखेड – जामखेड शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. पावसाने उघडीप दिल्याने सर्वांना मतदान करता आले. त्यामुळे टक्केवारी वाढणार आहे. सकाळी मतदान करण्यासाठी येणाऱ्यांत महिलांची संख्या जास्त होती. नवमतदार प्रथमच आपला हक्क बजावत असल्याने त्यांच्यात उत्साह दिसत होता. दिवसभर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बांधखडक येथील घटना वगळता तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. कर्जत-जामखेड … Read more

राहुरीत दोघांचा गळफास, तर एकाचा अपघाती मृत्यू

राहुरी शहर –  राहुरी तालुक्यात सोमवारी तिघांचा मृत्यू झाला. घोरपडवाडी येथे हाॅटेल आयाममागे सुदाम चंद्रभान बर्डे (वय १९) या तरुणाचा निलगिरीच्या झाडाला दोर बांधून गळफास लावून घेतलेला मृतदेह आढळला.  राहुरी येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुसऱ्या घटनेत सोनगाव येथील अनापवाडी येथील सचिन यशवंत अनाप (वय २६) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या … Read more

शहरात उशिरापर्यंत लागल्या होत्या रांगा

नगर –  मताधिकार बजावण्यासाठी नगरकर सोमवारी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. पावसाने अचानक हजेरी लावली, तरी मतदारांमध्ये चांगला उत्साह पहायला मिळाला.  सायंकाळी पाचपर्यंत जिल्हाभरातील मतदानाचा टक्का ६२ पर्यंत पोहोचला होता, तर नगर शहरातील मतदानाचा टक्का ५२ वर होता. जिल्हाभरातील प्रतिसादाच्या तुलनेत नगर शहरात कमी प्रतिसाद मिळत असल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून … Read more

जिल्ह्यात मतांचा धो-धो पाऊस, सरासरी ६७ %, सर्वाधिक नेवासा, तर सर्वात कमी नगर शहर

अहमदनगर – पावसामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मतदारांनी सोमवारी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडून मतांचा पाऊस पाडला. मतदानाचा टक्का अनेक ठिकाणी वाढल्याने धक्कादायक निकाल लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत सायंकाळी ६ पर्यंत एकूण ६७ टक्के मतदान झाले. नेवासे मतदारसंघात सर्वाधिक ८० टक्के, तर नगर शहर मतदारसंघात … Read more