वाधवान बंधुचा ‘बागबान’ कोण? हे अखेरपर्यंत जनतेला समजलेच नाही – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- गृह वि‍भागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्‍ता क्लिनचिट मिळवुन सेवेत पुन्‍हा रुजू झाल्‍यानंतरही वाधवान बंधुचा ‘बागबान’ कोण? हे अखेरपर्यंत राज्‍यातील जनतेला समजलेच नाही अशी खोचक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. राज्‍यात लॉकडाऊनचा कालावधी जाहीर असतानाही वाधवान बंधुना लोणावळा ते महा‍बळेश्‍वर असा पास गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ … Read more

एकाच दिवसात १२०२ रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.१९ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार १३६ झाली आहे. आज २१२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९६३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ … Read more

जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत ३१६ बसेसमधून ७ हजार प्रवासी रवाना

 जळगाव, दि. १८ – जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांच्या सीमेपर्यंत २७३ बसेसद्वारे ६००६ प्रवाश्यांना तसेच दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या विद्यार्थ्यांना १९ जिल्ह्यापर्यंत तर वाशिम जिल्ह्यातील मालेगावपर्यंत कामगार, मजूर यांच्यासाठी ४३ बसेसमधुन ९४६ प्रवाशांना याप्रमाणे आतापर्यंत ३१६ बसेसमधून ६९५२ प्रवाशांना पोहचविण्यात आल्याची माहिती एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रण राजेंद्र देवरे … Read more

अपघातग्रस्त रुग्णांची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

यवतमाळ, दि.१९ : आर्णी तालुक्यातील कोळवण येथे आज (दि.19) पहाटे साधरणत: 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान बस आणि टिप्परचा अपघात झाला. यात चार जण ठार तर 28 जण जखमी झाले. जखमींना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन अपघातग्रस्त रुग्णांनी भेट घेतली. तुम्ही कुठे राहता, सोलापूरला कामाकर‍िता … Read more

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी श्रमिक रेल्वेचे नियोजन – विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार

नागपूर, दि.19 :  लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांसाठी बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यासाठी प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजिव कुमार यांनी केले आहे. विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यासाठीचे नियोजन करताना यापुढे संबंधित राज्याच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. तसेच … Read more

अंतिमसत्राच्या परीक्षा रद्द करण्याविषयी युजीसीसोबत पत्रव्यवहार सुरू – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी, दि. १९ – विद्यापीठ अनुदान समितीने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतला होता. पण, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात याविषयी विद्यापीठ अनुदान आयो(युजीसी)सोबत पत्रव्यवहार … Read more

पडवे येथे कोविड लॅब सुरू करण्याविषयी चाचपणी – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 – पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड तपासणी प्रयोगशाळा सुरू करता येईल का याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चाचपणी करावी  असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिल्या. तसेच याबाबतचा स्पष्ट लेखी अहवाल दोन दिवसात सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रयोगशाळेस भेट दिली व … Read more

परिस्थिती नियंत्रणात तरीही सतर्कता आवश्यक : कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. १९ : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी मालेगाव शहरात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांना बऱ्यापैकी यश मिळत आहे. केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार रुग्ण मोठ्या संख्येने घरी जात आहेत. यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. यापुढेही मनपा प्रशासनाने पुढच्या टप्प्यासाठी तयार राहावे व संभाव्य रुग्ण शोधणेची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी. अशा सुचना राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज … Read more

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. १९: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात … Read more

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ०६ हजार पास वाटप

मुंबई दि. 19 : राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भातील अत्यावश्यक सेवेसाठी ४,०६,५९० पासेस  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच 3,84,920 व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दि.२२ मार्च ते १८ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,१०,९२० गुन्ह्यांची नोंद असून २०,९२६ व्यक्तींना अटक करण्यात आली. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ५३ लाख ५९ हजार … Read more

मधुमेही व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक भीती ; तज्ञ् म्हणतात …

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  वैद्यकीय तज्ञांनी मेटाबोलिक सिन्ड्रोम असलेल्या व्यक्तींना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या बाबतीत काळजी घेताना त्यांनी निरोगी जीवनशैली आणि योग्य आहार घेण्याची गरज असल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे इंदूरचे अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे हॉस्पिटल सर्वात व्यस्त रुग्णालयांपैकी एक आहे. … Read more

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३९८ गुन्हे दाखल

मुंबई, दि. १९ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३९८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात  महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण … Read more

राज्यातून सर्व झोन हद्दपार; 22 मेपासून लॉकडाऊनमध्ये नवीन बदल

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- देशभरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. महाराष्ट्राने या चौथ्या टप्प्यासाठी आपले नियम बदलले आहेत. ही नियमावली येत्या २२ मे पासून लागू होणार आहे. यानुसार महाराष्ट्रात आता दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही झोनमध्ये कन्टेनमेंट झोन असणार आहे. राज्यात आता २२ मेपासून रेड आणि … Read more

आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक महाराष्ट्रात परत

मुंबई, दि. १९ :  वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत १९७२ नागरिक आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले. या संदर्भात अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पूनमचा टिकटॉकवर जलवा; जाणून घेऊया त्यांच्याविषयी

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  कधी कुणाच्या कलेला पंख फुटतील, किंवा कधी कोठे संधी मिळेल सांगता येत नाही. पण कलाकार या संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाही. असच काहीस झालंय श्रीगोंदे तालुक्यातील पूनम संजय तुपे यांच्या बाबतीत. पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या पूनम यांचा .. मी लय वेड्यावाणी करते हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच … Read more

धक्कदायक! फेसबुकवर गर्भातील बाळाच्या विक्रीचा प्रयत्न

औरंगाबाद एका महिलेने गर्भातील बाळ विक्री करणार असल्याची जाहिरात फेसबुकवर टाकली. या जाहिरातीत बाळाची किंमत पाच लाख रुपये ठेवण्यात आली होती. परंतु पोलिसांनी हा प्रकार पाहताच या महिलेले अटक केली आहे. सदर महिला तिच्या भाऊंजीसोबत औरंगाबादच्या वाळूज परिसरात राहते, ती सात महिन्यांची गर्भवती आहे. ती नवऱ्यापासून आता दूर झाली आहे. त्यामुळं पुन्हा लग्न करायचं असेल … Read more

अमानवीय ! पोटच्या दोन मुलींवर बापानेच केला अत्याचार

बीड बीड जिल्ह्यात अवमानवीय घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकाने स्वतःच्या दोन मुलींवर बलात्कार केला. त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे या नराधमाने तिसऱ्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. केज तालुक्यात हा सर्व प्रकार घडला आहे. आठ वर्षापूर्वी नराधम बापाने त्याच्या पोटच्या मुली सोबत बळजबरीने बलात्कार केला. तसेच दुसऱ्या मुली सोबतही अशाच प्रकारे … Read more

सोनाली कुलकर्णीचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का ! सोनालीचा झाला साखरपुडा

मराठी इंडस्ट्रीमधील अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने तिच्या आयुष्यात एक खास वळण आले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं साखरपुडा केलाय. सोनालीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी खास फोटो पोस्ट केले. त्या खाली लिहिलंय की, ‘आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच … Read more