अवैध मद्यप्रकरणी एका दिवसात राज्यात ८० गुन्ह्यांची नोंद

मुंबई दि.9:  राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.08 मे, 2020 रोजी राज्यात 80 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 42 आरोपींना अटक करण्यात आली असून  69 लाख 58 हजार  रूपयांचा … Read more

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा देण्याचे नियोजन करा

यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास तेथे गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय कृषी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे कृषी निविष्ठा पुरवठाधारकांनी … Read more

पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणाचा शुभारंभ

हिंगोली : पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड या हिंगोली दौऱ्यावर आल्या होत्या. खरीप हंगाम जवळ आल्याने याप्रसंगी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रा.गायकवाड यांच्याहस्ते शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रा.गायकवाड यांच्या हस्ते हिंगोली तालुक्यातील उमरा येथील अमृतेश्वर शेतकरी गट १ आणि २, हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील विजय शेतकरी गट १ आणि २ या  एकूण २५ टन खताचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य … Read more

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६१व्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्र्यांकडून अभिवादन

सातारा, दि. ९ (जिमाका) : सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६१व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार … Read more

कर्मवीर अण्णांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र आजच्या घडीला उपयुक्त

मुंबई, दि. ९:- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवली.  आजच्या सुशिक्षित आणि प्रगतशील महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर अण्णांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. ‘कोरोना’ नंतर राज्याला सावरण्यासाठी त्यांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले. कर्मवीर अण्णांनी रयत … Read more

हिंसक विचार थांबविण्यासाठी विचार प्रक्रिया बदलावी लागेल

मुंबई, दि.9: हिंसक विचार थांबवायचा असेल तर जीवनशैली आणि विचार करण्याची प्रक्रिया बदलण्याची गरज आहे. दुसऱ्याला मारलेली एक थप्पड ही इतरांचा सन्मान व प्रतिष्ठा राखण्याची आपली जबाबदारी विसरण्यास भाग पाडण्यास सुरुवात करते. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे हेच कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी सकारात्मक विचारांना चालना देण्याची गरज आहे, असे मत महिला … Read more

केंद्राच्या भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय

मुंबई, दि.9 :- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत अन्न,नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण विभागाने महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मका पिकाला नगदी पिक म्हटले जाते. मात्र लॉकडाऊनमुळे कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये मंदी आल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत … Read more

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख २० हजार पास वाटप

मुंबई दि.९ –  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३ लाख २० हजार ६९७ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच राज्यात १ लाख २४५ गुन्ह्यांची नोंद झाली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ८ मे २०२० या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख २४५ … Read more

मातृदिन अंगणवाडी सेविकांना अर्पण

मुंबई, दि. ९ : राज्यातील सर्व माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा देताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या वर्षीचा मातृदिन अंगणवाडी सेविकांना समर्पित केला आहे. त्यासाठी त्यांनी एक अभंगपर कविता रचली आहे. कोरोना परिस्थितीमध्ये महिला व बालविकास विभाग लहान बालके, गर्भवती, स्तनदा माता यांच्या पोषण आहाराची तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. … Read more

नफेखोरी करणाऱ्या मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा

मुंबई दि. ९ : राज्य शासनाने दि. ३० एप्रिल २०२० रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य आजारांवरील उपचारांसाठी किती शुल्क आकारावे हे ठरवून दिलेले असताना काही रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारणी चालू असल्याने अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई पालिका आयुक्तांना दिले आहेत. श्री. … Read more

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उद्यापासून ‘मेड इन चंद्रपूर’ रोबोट होणार सहभागी

चंद्रपूर, दि. 8 : कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने बनवलेला आधुनिक मेडी-रोवर रोबोट उद्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी असे सांगितले की, कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी … Read more

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार!

मुंबई, दि. ८ : मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला असून या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी करून आपापल्या घरी जाता येणार आहे. मुंबई शहर व उपनगरात ७ वसतिगृहे असून त्या ठिकाणी ७१ विद्यार्थी थांबलेले आहेत. याव्यतिरिक्त राज्यातील अन्य काही वसतिगृहांमध्ये काही … Read more

चांगापूर व कामुंजा जिनिंग सोमवारपासून सुरु होणार

अमरावती, दि. 8 : चांगापूर, कामुंजा येथील सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर करून तिथे कापूस खरेदी तत्काळ सुरु करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार प्रशासन व पणन महासंघाकडून हालचाली होऊन सोमवारपासून (11 मे) ही खरेदी सुरु होणार आहे. त्यामुळे भातकुली, तिवसा, … Read more

स्वगृही परतणाऱ्या नागरिकांची तपासणी मोफत – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 8 – लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, अमरावती विभागात अडकलेल्या बिहार राज्यातील मजूरांसाठी विशेष रेल्वे अमरावती रेल्वे स्थानकावरून १० मे रोजी रवाना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने सोशल डिस्टन्स, पार्किंग, भोजन, पाणी आदी व्यवस्था … Read more

आपसात समन्वय राखून कोरोनावर मात करुया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

 जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 8- भुसावळ शहरातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सांयकाळी प्रांताधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कठीण काळात सर्व अधिकारी व यंत्रणामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचेही सांगितले. शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त करीत … Read more

लॉकडाऊनच्या काळात राज्यात ३६३ गुन्हे दाखल

मुंबई दि. ८ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६३ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३६३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे … Read more

कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये 10 ते 17 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा

पुणे, दि. 8 : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 10 मे ते 17 मे पर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्‍या. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली. पुणे … Read more

तामिळनाडूतील ४८० जणांना घेऊन एसटीच्या १६ बस रवाना

सांगली, दि. 8 (जिमाका) : लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या तामिळनाडुतील 480 जणांना घेऊन एस.टी  महामंडळाच्या 16 बस रवाना झाल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अवर्णनीय होता. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी याच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तींना सेलम, तामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्वाना खाण्यासाठी टिकाऊ … Read more