नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील लोकांवर होत असलेले अत्याचार सहन होत नसल्याचे सांगत सहा महिन्यांपूर्वी मुख्य राजकारणात आलेली ‘जेएनयू’ची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदने बुधवारी राजकारण सोडण्याची घोषणा केली. काश्मीर खोऱ्यात बीडीसी निवडणूक होणार असताना शेहलाने हा निर्णय घेतला आहे.
शेहलाने मार्च महिन्यात माजी आयएसएस अधिकारी शाह फैसल यांच्या जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंट (जेकेपीएम) पक्षामध्ये प्रवेश केला होता. जम्मू-काश्मीर खोऱ्यात गटविकास परिषद अर्थात बीडीसीच्या निवडणुका घेऊन केंद्र सरकारला लोकशाही जिवंत असल्याचे दाखवायचे आहे; परंतु या ठिकाणी लोकांवर अत्याचार केले जात आहेत.

अशा स्थितीत आपण निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे मी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अन्याय-अत्याचाराविरोधातील आपली लढाई सुरूच राहणार असल्याचे शेहला रशीदने स्पष्ट केले आहे.
- घोडेगावात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशनची नंबर प्लेट बसवण्यासाठी ५३१ रूपये दर असतांना उकळले जात आहेत ७०० रूपये, वाहनमालकांचा आरोप
- अहिल्यानगर- अजमेर रेल्वे सुरू करण्याची शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांची मागणी, खासदार निलेश लंके यांना निवेदन
- रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ह्या नागरिकांना सप्टेंबर महिन्यापासून रेशन मिळणार नाही, यादीत तुमचंही नाव आहे का ? पहा….
- चूका करणाऱ्या अति उत्साही कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा, नाहीतर पक्ष अन् नेता दोघंही अडचणीत येतात- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा, खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी