अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या एका इंजेक्शनसाठी तब्बल चार मंत्री व सात आमदारांकडे पाठपुरावा केला, मात्र यापैकी एकानेही दखल घेतली नाही.
त्यामुळे दुर्दैवाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील एका पत्रकाराच्या पत्नीचा अखेर मृत्यू झाला. याबद्दल कर्जत तालुक्यातील पत्रकार बांधवांनी खेद व्यक्त केला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/04/cb0236d8-18ae-44c5-83ff-a689ebfd0b9e.jpg)
मिरजगाव येथील पत्रकार विनायक चव्हाण यांच्या पत्नी वैशाली चव्हाण यांचे अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना कोरोनाने निधन झाले. याबाबत कर्जत तालुका पत्रकार संघ व कर्जत तालुका प्रेस क्लब यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीत पत्रकार बांधव, वितरक व त्यांचे कुटुंबीय यांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. वैशाली चव्हाण यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी कोरोना बाबत आवश्यक असलेले एक इंजेक्शन उपलब्ध करण्यास सांगितले होते.
यासाठी विनायक चव्हाण यांच्या प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडीयातील मित्र परिवाराने चार मंत्री व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या सह सात आमदारांकडे एका इंजेक्शनसाठी पाठपुरावा केला होता.
पण कोणाकडूनही इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेबद्दल कर्जत तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली.
कोरोनाच्या संकटात पत्रकार बांधव व वृत्तपत्र विक्रेते यांनी दक्षता घेऊन काम करावे असे आवाहन करण्यात आले. पत्रकार बांधवांना राजकीय नेते असे दुर्लक्ष करत आहेत तर इतरांची काय स्थिती असेल.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार राज्यभर औषधे वाटप करत आहेत. मात्र कर्जत जामखेड मतदारसंघातील पत्रकार बांधवांना खरी मदतीची गरज असताना मदत करत नाहीत. याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|