सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळून दिवस चांगला जातो. नियमित चालणं, तसंच योगासनं हे व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं.
दिवसभराच्या कामांचं सकाळीच नियोजन करून ती कामं शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे कामाचा अतिरिक्त तणाव येत नाही.

- पौष्टिक आणि संतुलित आहाराचं पालन करावं.
- दररोजच्या आहारात फळं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
- दोन वेळच्या जेवणात साधारण सात ते आठ तासांचा अवधी ठेवावा.
- रात्री जेवल्यानंतर दोन तासांनी झोपावं.
- दररोज किमान १० ते १२ ग्लास पाणी प्यावं.
- जास्त क्षार आणि शर्करायुक्त पदार्थ खाणं टाळावं.
- धूम्रपान, दारू, चटपटीत पदार्थ आणि फास्टफूड यांच्यापासून दूर राहावं.
- पचनक्रियेच्या आरोग्यासाठी आठवडय़ातून एकदा उपवास करावा.
- रोजच्या कामाच्या वेळापत्रकात शारीरिक श्रमाला महत्त्व द्यावं. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, अॅसिडिटी, निद्रानाश, कॅन्सर आणि हृदयरोग या आजारांपासून दूर राहता येतं.
- कामाच्या व्यापातून आपल्या परिवारासाठी वेळ काढा. त्यामुळे कामाचा तणाव दूर होतो.
- कामाइतकीच शरीराला आरामाचीही गरज असते. रात्रीची आठ ते दहा तासांची शांत झोप शरीरासाठी आवश्यक असते.
- अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यप्रदेशातील उमरठी गावातून होतेय गावठी कट्ट्याची तस्करी, पोलिसांच्या कारवाईत 280 गावठी कट्ट्यांसह 597 काडतुसे जप्त
- ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच कृषी कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
- अहिल्यानगरमध्ये अनियमितता करणाऱ्या कृषी दुकानदारांना कृषी विभागाचा दणका, २४ कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी केले रद्द
- मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात सव्वा लाख मराठ्यांना मिळाले कुणबी दाखले
- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची जोरदार तयारी, मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या होणार पदाधिकाऱ्यांचा मेळावा