अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण मोडीत निघाले आहे.
तर दुसरीकडे निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव घसरून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असा धोका असल्याचे म्हणत भाजपचे पारनेरचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला.

विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीचा जो निर्णय घेतला आहे त्यास विरोध दर्शवत पारनेर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी घेतला होता.
नंतर प्रशासन ने कोरोना परिस्थितीबाबत विचार करून आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात यावा असे सांगितले. यावेळी बोलताना भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे म्हणाले,
शेतकर्यांना यंदा मूग, वाटाणा हातातून गेल्यावर कांदा पिकाचे उत्पन्न मिळेल अशी आशा होती. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे
कांद्याचे भाव गडगडून शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यामुळे तो निर्णय रद्द करण्याची मागणी कोरडे यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved