अहमदनगर :- विविध संशोधनांमुळे तंत्रज्ञानात मोठे बदल घडत आहेत. विज्ञानातील विविध पैलूंची सखोल माहिती तरुण पिढीला होणे आवश्यक आहे. तरुणांना वैज्ञानिक क्षेत्रात गरुडभरारी घेता यावी,
यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्र आयोजित करणार असून नगरमधून जास्तीत जास्त तरुण इस्त्रोमध्ये कसे जाऊ शकतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

सावेडीतील प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रात चाणक्य मंडळ आयोजित सकल ब्राह्मण समाजातर्फे इस्त्रोतील वरिष्ठ शास्त्रज्ञ आदित्य वैद्य यांचा अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगताप बोलत होते.
प्रा. माणिकराव विधाते, रत्नाकर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी यावेळी उपस्थित होते. चांद्रयान मोहीम, त्यातील बारकावे, तसेच इस्त्रो व नासाचे कामकाज याबाबत प्रेक्षकांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शास्त्रज्ञांशी चर्चा केली.
विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टिकोनातून वैद्य यांच्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन घेतले. जगताप यांनी आदित्य यांचा सत्कार करून विद्यार्थी व तरुणांना अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
नगरमधून विद्यार्थी वर्गास इस्त्रो येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. शास्त्रज्ञ आदित्य वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. चांद्रयान मोहिमेचे अनुभव त्यांनी कथन केले. शास्त्रज्ञ होण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संधींबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
- भारतातील सर्वात उंच स्थानक 2027 मध्ये सेवेत ! ‘या’ शहरात विकसित करणार 16 मजली उंच रेल्वे स्टेशन ! लंडन, पॅरिसला देणार टक्कर
- महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !
- सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी बनलाय डोकेदुखी ! शेतजमीन खरेदी-विक्रीचा नियम पूर्णपणे बदलला, ‘या’ कागदाविना आता जमीन विक्री होणे अशक्य
- नोकरीसाठी आता बेंगलोरला जाण्याची गरजच नाही….! पुण्यानंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारले जाणार आयटी पार्क
- पुणे मेट्रो संदर्भात महत्त्वाची अपडेट…. स्वारगेट – कात्रज मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार?













