अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसने दुपटीहून अधिक जागा पटकावत जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध केले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी यंदाच्या नगर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते.
मागील निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या श्रीगोंद्याच्या बबनराव पाचपुतेंना पराभूत करून पवारांनी जसा करिष्मा दाखवला होता, तसाच या वेळी अकोल्यात पिचडांना पराभूत करून दाखवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पवारांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे सिद्ध होते.

राष्ट्रवादी पक्षाला आलेली उभारी कायम ठेवून पुन्हा संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न आता सुरू होतील. पूर्वी पक्षात आपसांत कुरबुरी होत होत्या. बहुतांश नेते केवळ पक्षाध्यक्ष शरद पवार आल्यानंतरच एकत्र येत असत.
त्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समर्थक सुप्त गटही अस्तित्वात होता. आता मात्र रोहित यांचा संपर्क वाढणार आहे. त्यांचे नेतृत्व जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनाही मान्य करावे लागणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जे आमदार निवडून आले, त्यातील चौघे युवा आहेत. उरलेलेही तसेच तरुणच आहेत. एकाच वयोगटातील असल्याने रोहित यांच्यासोबत त्यांचे सूर अधिक चांगल्या पद्धतीने जुळून संघटना बांधणीसाठीही त्याचा फायदा होईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते मानतात.
- एसबीआयची 24 महिन्यांची FD योजना गुंतवणूकदारांमध्ये बनली लोकप्रिय ! 4 लाखाची गुंतवणुक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, मार्चअखेरीस ‘हा’ Metro मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार, तिकीट दर कसे असणार ? पहा….
- राजकीय आणि प्रशासकीय समीकरणे बदलणार ? अहिल्यानगरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत उत्सुकता
- महाराष्ट्रातील नाशिक-अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यांना जोडणारा ‘हा’ Railway मार्ग प्रकल्प पुन्हा चर्चेत ! मुंबईत मोठी बैठक, रूट पुन्हा बदलणार का ?
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत शेतकरी, यादीतील सर्व शेतकरी आहेत कोट्याधीश !