नगर :- एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद होत आहेत. आजूबाजूच्या गावांतील तरुणांच्या हाताला काम नाही. लोकप्रतिनिधी आणि विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आमदार विजय औटी यांनी या भागातील पाणीप्रश्न सोडवून उद्योगधंदे येण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांनी केली.
नगर तालुक्यातील पारनेर मतदारसंघातील खारेकर्जुने, इसळक, निंबळक, नवनागापूर, वडगाव गुप्ता येथे राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेनिमित्त चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

या जनसंवाद यात्रेस डॉ. बबनराव डोंगरे, सुदाम सातपुते, लखन डोंगरे, लक्ष्मण गव्हाणे, राजेंद्र ढेपे, संजय चव्हाण, नितीन कोतकर, माधवराव कोतकर, घनश्याम म्हस्के, हरिष कळसे, दादा झावरे, प्रशांत मदने, दत्ता कोतकर, संतोष जाजगे आदी उपस्थित होते.
चौदा दिवसांपासून जनसंवाद यात्रा चालू आहे. लंके म्हणाले, या भागाजवळच एमआयडीसी आहे. मात्र, येथील तरुण बेरोजगार आहे. आठ-आठ दिवस पाणी सुटत नाही. लोकप्रतिनिधींनी १४ वर्षांत एकालाही नोकरी लावली नाही.
वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्याच्या जमिनीवर शासनाने शिक्के मारल्यामुळे त्यांना जमिनीवर कर्ज काढता येत नाही. जमीन विकताही येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. दोनच महिन्यांत शेतकऱ्यांच्या उतारावरील शासकीय शिक्के काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.
- Top 5 बेस्ट सेलिंग 7 सीटर कार खरेदी करण्यासाठी किमान मासिक पगार किती असायला हवा ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- मार्च 2026 पासून एटीएम मधून 500 रुपयांच्या नोटा निघणार नाहीत ? सरकारकडून मिळाली मोठी माहिती
- फडणवीस सरकारचा लाडक्या बहिणींना दिलासा ! मुदतीनंतरही केवायसी प्रक्रिया सुरूच, 31 जानेवारीपर्यंत केवायसी करता येणार ? वाचा….
- महाराष्ट्रात नाही तर ‘या’ राज्यात आहे भारतातील सर्वाधिक मोठा जिल्हा ! जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8 राज्यांपेक्षा अधिक
- मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट किती असणार ? कसं राहणार वेळापत्रक? रेल्वे मंत्र्यांकडून मोठे अपडेट