उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांचं नाव लिहिलेलं आहे, ते जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर मला खात्री आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील मावळे शरद पवार यांच्या विचारांना महत्त्व देऊन राष्ट्रवादीसोबत राहतील आणि पक्षाची साथ सोडणाऱ्या फुटिरांना पाडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांनी कडाडून टीका केली.

वाशी (जि. उस्मानाबाद) येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, १५ वर्षे तुम्ही मंत्रिमंडळात होता, आता थोडासा पक्ष अडचणीत आल्यावर पक्ष सोडायला लागले. जेव्हा महाराष्ट्रात फंदफितुरी झाली आहे, तेव्हा त्यांना प्रायश्चित झालं आहे.
म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात कोणी फितुरी केली तर त्यांचा पाडाव करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडून द्या, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ २७ गावांचे पाणी आढळले दूषित, आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश
- पाथर्डी तालुक्यात वादळ आणि पावसाचा हाहाकार! फळबांगाना मोठा तडाखा तर आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान
- ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज, इथे ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट!
- अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर! २४५ हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान
- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शाळांना शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी 100-200 रुपये शुल्क घेण्याचा अधिकार आहे का ?