उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांचं नाव लिहिलेलं आहे, ते जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर मला खात्री आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील मावळे शरद पवार यांच्या विचारांना महत्त्व देऊन राष्ट्रवादीसोबत राहतील आणि पक्षाची साथ सोडणाऱ्या फुटिरांना पाडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांनी कडाडून टीका केली.

वाशी (जि. उस्मानाबाद) येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, १५ वर्षे तुम्ही मंत्रिमंडळात होता, आता थोडासा पक्ष अडचणीत आल्यावर पक्ष सोडायला लागले. जेव्हा महाराष्ट्रात फंदफितुरी झाली आहे, तेव्हा त्यांना प्रायश्चित झालं आहे.
म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात कोणी फितुरी केली तर त्यांचा पाडाव करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडून द्या, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
- येत्या एका वर्षात ‘हे’ 3 शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत! 66% रिटर्न मिळतील, टॉप ब्रोकरेजचा विश्वास
- सोन्याच्या किंमतीत मोठा उलटफेर ! 26 फेब्रुवारी 2025 रोजी 22, 24 अन 18 कॅरेट सोन्याच्या किंमती कशा आहेत, महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचे रेट चेक करा
- Canara Bank Home Loan | बँकेकडून 20 वर्षासाठी 45 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार ?
- गावातील रहिवाशी नसलेल्या ‘त्या’ नागरिकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड कसे ; तहसीलदारांनी दिला हा इशारा
- उन्हाचा तडाखा ; ‘या’ तालुक्यातील काही भागात पाणीबाणी : विहिरींनी गाठला तळ,पिके धोक्यात