अहमदनगर :- आ. संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास मंगळवारी (दि. १) सकाळपासून सुरुवात केली आहे. शहरात प्रभागनिहाय प्रचाराचे नियोजन केले असून प्रभाग क्रमांक १२ मधील प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन व नारळ वाढवून केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक अविनाश घुले, संपत बारस्कर, कुमार वाकळे, गणेश भोसले, विनित पाऊलबुधे, दिपक सुळ, ज्ञानेश्वर रासकर,दगडु पवार, निखिल वारे, मोहन कदम, रेश्माताई आठरे, उबेद शेख, संजय झिंजे, काका शेळके, प्रा. अरविंद शिंदे, आकाश दंडवते, योगेश गलांडे, बाळासाहेब पवार, अमोल गाडे, संभाजी पवार, विशाल पवार, राजेंद्र तागड यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आ . संग्राम जगताप यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवारी निश्चित झाल्याने उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराचा शुभारंभ करत प्रभाग १२ मधुन प्रचारफेरी काढली त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. शहरात महापालिकेच्या १७ प्रभागांमध्ये प्रभागनिहाय प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असून प्रभागनिहाय प्रचाराचे नियोजन करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
- मुंबईकरांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेला सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील 12 Railway Station वर थांबणार, कसा राहणार रूट ? पहा….
- अहिल्यानगर करांनो, सावध व्हा ! आपल्या बसस्थानकांची स्थिती ‘स्वारगेट’ होणार नाही ना ?
- Home Loan घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘ही’ बँक दोन मिनिटात देणार 8 लाखांचे कर्ज, कशी आहे संपूर्ण ऑफर
- महाराष्ट्रातील 3 मोठ्या जिल्ह्यांचे स्वप्न भंगणार ! राज्यातील ‘हा’ महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प रद्द होणार, DCM अजित पवारांचा गौप्यस्फोट
- General Knowledge : भारतातील पहिले विमानतळ आपल्या महाराष्ट्रात, ‘या’ शहराला मिळालाय पहिल्या विमानतळाचा मान !