नगर :- शहराच्या विकासासाठी केंद्रातील व राज्यातील नेतृत्वावाने गेल्या पाच वर्षात भरीव निधीच्या माध्यमातून विकासाला चालना दिली आहे. नगरचा विकास हा युतीच्या माध्यमातूनच होऊ शकतो. आज केंद्रात भाजप-सेनेची सत्ता आहे आणि आता विधानसभेतही युतीची सत्ता येणार आहे.
त्यामुळे नगरच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून नगरचा विकास होऊ शकतो. आज नगर शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी आपला हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर शहराचे महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले.

भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भाजपा कार्यालय येथून प्रचारफेरी काढण्यात आली होती. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अभय आगरकर, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा विद्ये,
माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, अर्जुन दातरंगे, सुनिल त्रिपाठी, एल.जी.गायकवाड, गौतम दीक्षित, सचिन पारखी, मिलिंद गंधे, बंडोपंत क्षीरसागर, प्रदीप परदेशी, राजेंद्र घोरपडे, बंट्टी ढापसे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी भगवान फुलसौंदर यांनी विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी आणि नगरच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रचारफेरीस परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे-दानापुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी
- Explained : कोपरगाव काळे-कोल्हे ‘एक्सप्रेस’ पुन्हा धावणार ? कोपरगावात बिनविरोध निवडणूक होईल …
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग