जामखेड – सामान्य जनतेच्या मागणीवरून शरद पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा बदलू शकणारा तगडा उमेदवार दिला आहे. तुम्ही रोहित पवार यांना एकदा संधी देऊन पहा, पुन्हा तुम्ही त्यांना आयुष्यभर सोडणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने नान्नज येथे सोमवारी झालेल्या सभेत भुजबळ बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजी भोसले, सूर्यकांत मोरे, विश्वनाथ राऊत, अक्षय शिंदे, सुरेश भोसले, शरद शिंदे, भानुदास बोराटे, हरिभाऊ बेलेकर, अमोल गिरमे, त्रिंबक कुमटकर, अप्पासाहेब मोहळकर, ज्योती गोलेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, दुष्काळात पाणी पोहोचवण्याची जबाबदारी मंत्र्यांची होती. मात्र, त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या बगलबच्च्यांनी पाण्याचे राजकारण व व्यावसायिकरण केले. फेडरेशन नावाच्या भुताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नागवले. शेतमालाची चोरी करत शेतकऱ्यांना लुटले. जलयुक्तचे बंधारे बांधले खरे, पण पाणी अडण्याऐवजी पाणी बंधाऱ्याखालून जाऊ लागले. रस्ते निकृष्ट, पुलांचेही कामे निकृष्ट झाले.
पालकमंत्री राम शिंदे हे अहल्यादेवींचे वंशज म्हणून सांगतात. मात्र, धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते विधिमंडळात एकदाही भांडताना दिसले नाहीत. मी भांडत असताना त्यांनी पाठिंबा दिला नाही. ते अहल्यादेवींचे वंशज असूच शकत नाही. खरे वंशज अक्षय शिंदे हे आहेत, असेही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
- अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान; पाण्यात भिजून कांदा सडला, नुकसान भरपाई देण्याची मागणी
- ‘ही’ आहेत भारतातील टॉप 7 इंजीनियरिंग कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळाल म्हणजे लाईफ सेट, या यादीत महाराष्ट्रातील किती कॉलेज ?
- शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! अवकाळी पावसानं झोडपलं आणि कांद्याने रडवलं, अहिल्यानगरच्या नेप्ती मार्केटमध्ये कांद्याला मिळतोय एवढा भाव
- प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लॉन्च होणार Tata Harrier EV ; फिचर्स आणि इंजिनबद्दल जाणून घ्या
- कर्जमाफीची वाट पाहता पाहता शेतकरी पुन्हा सावकारांच्या दारात! पेरणीसाठी खतं-बियाणे आणायचे कसे? शेतकऱ्यांपुढं प्रश्न