संगमनेर ;- विधानसभा- निवडणुकीत लोकांसमोर जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकास कामे मांडा.आपल्यावर जिल्हयासह राज्याची महत्वाची जबाबदारी असल्याने गावामधील कार्यकर्त्यांनी आप आपसातली मतभेद बाजूला ठेवून कामाला लागण्याचे आवाहन करतानाच शेजारील (थोरात) म्हणजे बुडत्या जहाजाचे कॅप्टन असल्याची टिका गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या आश्वी खुर्द येथे आयोजीत २६ गावांमधील प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीत ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. दरम्यान बैठकीत गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.

यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, भाजपा – शिवसेना सरकारने लोकाभिमुख विकास कामे केली. त्यामुळे राज्यातील जनता या सरकारवर खूश आहे. आताची परिस्थिती बघता संपूर्ण राज्यात देवेंद्र फडणवीस यांना लोक पसंती देत आहे.
शेजारील हे बुडत्या जहाजाचे कॅप्टन असल्याने जिल्हयासह राज्यात आपल्याला भरघोष यश संपादन होणार असून राज्यातील दुष्काळी भागाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाआपलचं समजवून कामाला लागा.
जिल्हयासह राज्यात युतीचा प्रचार करण्याची माझ्यावर जबाबदारी असल्याने वेळ कमी असल्यामुळे सर्वांपर्यंत पोहचणे अशक्य असल्याने कुटुब प्रमुखांची जबाबदारी ही तुमच्यावरचं आहे. कार्यकर्त्यांनी बुथवाईज काम करा म्हणजे कार्यकर्त्यांना किती सक्षम आहे हे समज घेईल हा कानमंत्र ना. विखेनी शेवटी कार्यकर्त्यांना दिली.
- तुमचं वीकेंडचं प्लॅनिंग झालंय का? या आठवड्यात नेटफ्लिक्सवर येत आहेत 9 दमदार कथा; फॅमिली ड्रामा, थरार, प्रेमकथा आणि…
- ऐश्वर्या रायने नाकारला होता तब्बल 4,000 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट, नंतर ‘या’ अभिनेत्रीचं भाग्यच खुललं! कोण आहे ही अभिनेत्री?
- मीठ, हळद, दूध आणि…सायंकाळी ‘या’ गोष्टी दान केल्याने घरातील सुख-शांती भंग होऊन येते दारिद्र्य, आत्ताच व्हा सावध!
- किशोर कुमार यांच्या निधनानंतर रेडिओवर वारंवार वाजलं होतं ‘हे’ गाणं; आजही ऐकलं तर डोळ्यात येईल पाणी!
- केवळ अन्नपदार्थच नाही तर, ‘या’ 7 ब्युटी प्रॉडक्टसलाही ठेवतात फ्रीजमध्ये;तुम्हाला माहीत होतं का?