अहमदनगर :- नगर शहर विधानसभा मतदारसंघात मागील २०१४च्या निवडणुकीतही या दोन्ही भय्यांमध्येच प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस या चारही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते.

त्यामुळे या चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मते विभागली गेली, व त्याचा फायदा जगतापांना झाला. २५ वर्षे आमदारकी केल्यानंतर राठोडांचा त्यावेळी पराभव झाला. या पार्श्वभूमीवर यंदा युती व आघाडी अशी लढत होणार आहे.

राठोड यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी (३ ऑक्टोबर) दाखल होणार असून, त्याचे नियोजन त्यांच्याकडून सुरू आहे. तर जगतापांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे जाहीर झाल्य़ावर त्यांच्याही अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. मात्र, अर्ज भरण्यापूर्वीच निवडणूक प्रचाराची प्राथमिक तयारी दोन्ही भय्यांनी सुरू केली आहे.
- तीन वर्षांनंतर सोयाबीनच्या दरात अचानक उसळी; तेजीमागची कारणे काय आणि ही वाढ किती काळ टिकणार?
- एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास कडक कारवाई; गोंदिया जिल्ह्यात ७० हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! कोकण रेल्वेकडून गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक,मडगाव विशेष गाड्या सुरू
- PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार २२वा हप्ता; फेब्रुवारीत मिळणार २००० रुपये, आधी पूर्ण करा ‘ही’ कामे
- जळगाव-भुसावळ मार्गे धावणार नवीन अमृत भारत एक्सप्रेस; जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा













