कोपरगाव :- मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी रब्बीच्या अनुदानापासून वंचित राहिला. शेतकऱ्यांना डाळिंब, कांदा आदी पिकांचे अनुदान मिळाले नाही.
कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले असताना कोपरगाव तालुका मात्र वगळला गेला, ज्या विश्वासाने तुम्ही २०१४ ला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला.

हे केवळ २०१४ ला केलेल्या चुकीमुळे झाले असून २०१४ ला केलेली चूक पुन्हा करून नका, असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब गाडे होते. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे चासनळी, धामोरी, मोर्विस, बक्तरपूर, वडगाव, मंजूर, कारवाडी आदी गावांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
आशुतोष काळे म्हणाले, चासनळी परिसरातील धामोरी, मोर्विस, बक्तरपूर, वडगाव, मंजूर, कारवाडी आदी गावांमध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणी यांचे प्रश्न मार्गी लावून
या परिसरातील शेतकऱ्यांना आपला माल लासलगाव, बसवंत पिंपळगाव आदी ठिकाणी घेऊन जाता यावा यासाठी चासनळी येथे मोठा पूल बांधला. त्यामुळे या परिसरात दळणवळण वाढलेले आहे.
- सोनई परिसरात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मावा कारखान्यावर मोठी कारवाई, ८० हजारांच्या मुद्देमालासह एकाला केली अटक
- अहिल्यानगर तालुक्यात महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, भिंतीवरच लटकवले मीटर
- अकोले तालुक्यातील आढळा धरण १०० टक्के भरले, शेतकऱ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण
- संगमनेरच्या चंदनापुरी घाटात विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी स्कूलबस उलटली, ४ विद्यार्थी किरकोळ जखमी
- अहिल्यानगरमध्ये स्वस्तात प्लाॅट देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या पोलिसाला ठोकल्या बेड्या, तर सेवेतूनही करण्यात आले निलंबित