कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्यातील खेड, औटेवाडी, भांबोरा, दुधोडी, जलालपूर, गणेशवाडी आदी गावांना पुराचा फटका बसला आहे. पवार यांनी आज या भागाचा दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आज शाळाही बंद ठेवण्यात आल्या. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी या भागाचा दौरा करून तेथील प्रश्न समजावून घेतले. खेड येथे अण्णासाहेब मोरे, युवा नेते नीलेश निकम, उपसरपंच बाळासाहेब मोरे, सुरेश शिंदे, अक्षय वाघमारे आदींशी चर्चा केली.
- महाराष्ट्रातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘हा’ छोटासा नियम पाळला नाही तर थेट शिस्तभंगाची कारवाई होणार
- EMI वर मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी आरबीआय नवा नियम आणणार ! आता हफ्ता भरला नाही तर…
- रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार 16 कोचवाली वंदे भारत एक्सप्रेस
- नवरात्र उत्सवाच्या आधी लाडक्या बहिणींसाठी Good News ! मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
- पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास किमती किती रुपयांनी कमी होणार ? एक लिटर पेट्रोलसाठी फक्त ‘इतके’ पैसे मोजावे लागणार