कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्यातील खेड, औटेवाडी, भांबोरा, दुधोडी, जलालपूर, गणेशवाडी आदी गावांना पुराचा फटका बसला आहे. पवार यांनी आज या भागाचा दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आज शाळाही बंद ठेवण्यात आल्या. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी या भागाचा दौरा करून तेथील प्रश्न समजावून घेतले. खेड येथे अण्णासाहेब मोरे, युवा नेते नीलेश निकम, उपसरपंच बाळासाहेब मोरे, सुरेश शिंदे, अक्षय वाघमारे आदींशी चर्चा केली.
- अहिल्यानगर : चौंडीतील ऐतिहासिक बैठक रद्द ! मुंबईकडे वळले सरकार
- iPhone 16e लाँच किंमतीपेक्षा स्वस्त! Amazon वर सुरू आहे धमाकेदार डील
- HP चा मोठा धमाका,नेक्स्ट जनरेशन AI लॅपटॉप्स भारतात केले लॉन्च, किंमती ऐकून थक्क व्हाल
- 7300mAh बॅटरी आणि AI फीचर्ससह iQOO चे स्मार्टफोन्स झाले लॉन्च ! AI नोट्स, फास्ट चार्जिंग, गेमिंग पॉवरहाऊस…
- ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, 3 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी पण मिळणार, किती वाढला DA? वाचा…