कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्यातील खेड, औटेवाडी, भांबोरा, दुधोडी, जलालपूर, गणेशवाडी आदी गावांना पुराचा फटका बसला आहे. पवार यांनी आज या भागाचा दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आज शाळाही बंद ठेवण्यात आल्या. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी या भागाचा दौरा करून तेथील प्रश्न समजावून घेतले. खेड येथे अण्णासाहेब मोरे, युवा नेते नीलेश निकम, उपसरपंच बाळासाहेब मोरे, सुरेश शिंदे, अक्षय वाघमारे आदींशी चर्चा केली.
- अहिल्यानगर तालुक्यात महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, भिंतीवरच लटकवले मीटर
- अकोले तालुक्यातील आढळा धरण १०० टक्के भरले, शेतकऱ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण
- संगमनेरच्या चंदनापुरी घाटात विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी स्कूलबस उलटली, ४ विद्यार्थी किरकोळ जखमी
- अहिल्यानगरमध्ये स्वस्तात प्लाॅट देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या पोलिसाला ठोकल्या बेड्या, तर सेवेतूनही करण्यात आले निलंबित
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास दरमहा 3 हजार रुपयांचे व्याज मिळणार ! कशी आहे योजना?