कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्यातील खेड, औटेवाडी, भांबोरा, दुधोडी, जलालपूर, गणेशवाडी आदी गावांना पुराचा फटका बसला आहे. पवार यांनी आज या भागाचा दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आज शाळाही बंद ठेवण्यात आल्या. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी या भागाचा दौरा करून तेथील प्रश्न समजावून घेतले. खेड येथे अण्णासाहेब मोरे, युवा नेते नीलेश निकम, उपसरपंच बाळासाहेब मोरे, सुरेश शिंदे, अक्षय वाघमारे आदींशी चर्चा केली.
- प्रतीक्षा संपली ! मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला धावणार Bullet Train
- ब्रेकिंग ! केंद्र पाठोपाठ ‘या’ राज्यात स्थापित झाला आठवा वेतन आयोग, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- मुंबई ते नाशिक प्रवास होणार वेगवान ! तयार होणार १३१ Km लांबीचा नवा रेल्वेमार्ग, या गावांमधून जाणार नवा मार्ग
- ……तर राज्यातील 45 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही ! नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस सरकारचा दणका
- ब्रेकिंग ! नव्या वर्षात मुंबईसह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, महाराष्ट्रात किती दिवस राहणार पावसाचे सावट?