सरकार चालवण्याचा ठेका उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे दिला आहे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- सांगलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपाल काय बोलले हे माहीत नाही.

पण हे खरं आहे, की उद्धव ठाकरे यांना भेटून काही उपयोग नाही, शरद पवारचं राज्य चालवत आहेत असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

उद्धव ठाकरे हे घराच्या बाहेर पडत नाहीत. तसेच कोणतेही निर्णय घेत नाही असे म्हणत सर्व निर्णय शरद पवार हेच घेत आहेत अशी टिका देखील त्यांनी केली.

सरकार चालवण्याचा ठेका पवार यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी दिला आहे असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. महाराष्ट्रात हळूहळू काही गोष्टी सुरू केल्या पाहिजेत. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe