कपाशीची पूर्व हंगामी लागवड करु नका

अकोला : कपाशी पिकावर शेंद्री (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कपाशीची पूर्व हंगामी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे. अकोला जिल्ह्यामध्ये १.६० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम २०२० मध्ये कपाशी पिकाचे लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले असून त्यापैकी ७०% कोरडवाहू व ३०% ओलित क्षेत्र आहे. शासनाने जिल्ह्यासाठी आठ लाख बियाणे पॅकेटसचे आवंटन दिले आहे. … Read more

खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा – पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी निविष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, जास्त  दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिल्या. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पिकांचे नियोजन, बी-बियाणांची उपलब्धता, रासायनिक खते, औषधे आदी बाबींच्या पूर्वतयारीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली, यावेळी ते … Read more

उत्तर प्रदेशातील सुमारे बाराशे कामगार लखनौकडे रवाना

अमरावती, दि. 9 : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील 1 हजार 239 कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस आज अमरावती रेल्वे स्थानकावरून लखनौकडे रवाना झाली. जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना स्वगृही पोहोचविण्यासाठी नियोजन केले असून, सर्वांनी संयम ठेवावा. कुणीही पायी जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले. अमरावती विभागात अडकलेल्या … Read more

लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी सोमवारपासून एसटी सेवा

चंद्रपूर : राज्यात अडकलेल्या  नागरिकांना आपआपल्या गावी जाऊ द्यावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत  निधीची व्यवस्था करण्यात येईल,  या पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून सोमवारपासून विद्यार्थी नागरिक व प्रवाशांच्या मोफत एसटी बसला सुरुवात होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना व प्रवाशांना आपापल्या मूळ गावी पोहोचण्यासाठी राज्य शासनाने … Read more

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. एक चांगली बाब म्हणजे मृत्युचे प्रमाण खूपच कमी आहे. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून  आणखी रुग्ण वाढणार नाहीत यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करुन संसर्गाची साखळी तोडण्याचे काम करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या. कराड येथील विश्रामगृहात कोरोना … Read more

संगमनेर शहरासह ‘ही’ गावे 23 मेपर्यंत हॉटस्पॉट पॉकेट

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून संगमनेर शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्‍हणुन व सदरच्‍या क्षेत्राच्‍या मध्‍यबिंदु पासुन जवळपास ०२ कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला असून यापूर्वी हॉटस्पॉट पॉकेट म्‍हणून घोषित केलेल्‍या कुरण गाव (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) या क्षेत्रातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक व्यक्ती कोरोना बाधित, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५३

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही ३६ वर्षीय व्यक्ती धांदरफळ येथीलच आहे. या व्यक्तीचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५३ झाली आहे. तर, धांदरफळ येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ०८ … Read more

जाणून घ्या राज्यासह तुमच्या जिल्ह्यातील कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  २० हजार २२८ झाली आहे. आज ११६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ३३० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ … Read more

‘अशी’ सुरु झाली मदर्स डे साजरी करण्याची पद्धत

नवी दिल्ली: संपूर्ण जगात दरवर्षी मे च्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा करण्यात येतो. उद्या 10 मे रोजी मातृदिन आहे. या दिवशी आईचा सन्मान करण्यात येतो. त्यांच्या प्रति प्रेम , आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. परंतु हा दिवस साजरा करण्याची पद्धत का व कशी सुरु झाली जाणून घेऊयात या विषयी. 1908 मध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ युवक कोरोनामुक्त, हॉस्पिटल मधून आज मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- जामखेड येथील २३ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाला आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्याचे १४ व्य दिवसा नंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाल्याने त्याला सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३५ झाली आहे. जामखेड येथील एका मृत कोरोना बाधित व्यक्तीच्या मुलांना कोरोनाची … Read more

नियमाची अंमलबजावणी करुन जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा

हिंगोली : कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत राज्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतू जिल्हा  प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील प्रमाण सद्यस्थितीत नियंत्रणात आहे. पंरतू आपला जिल्हा लवकरात-लवकर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा, असे पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे … Read more

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

मुंबई, दि.९ – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील  विविध भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी ,भाविक, यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने  काही अटी-शर्तींच्या अधीन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा … Read more

जीवनावश्यक सेवा देणाऱ्या पारंपारिक व्यावसायिकांना पालकमंत्र्यांची मदत

चंद्रपूर : नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या ऑटोचालक, रिक्षाचालक, केशकर्तनालय व लॉन्ड्री व्यवसायात काम करणाऱ्या बारा बलुतेदारातील नाभिक व धोबी समाजातील व्यावसायिकांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही येथील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये शनिवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या दीर्घ काळामध्ये नियमित व पारंपारिक व्यवसायाचा देखील खोळंबा झाला आहे. … Read more

अवैध मद्यप्रकरणी एका दिवसात राज्यात ८० गुन्ह्यांची नोंद

मुंबई दि.9:  राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.08 मे, 2020 रोजी राज्यात 80 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 42 आरोपींना अटक करण्यात आली असून  69 लाख 58 हजार  रूपयांचा … Read more

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा देण्याचे नियोजन करा

यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास तेथे गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय कृषी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे कृषी निविष्ठा पुरवठाधारकांनी … Read more

पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणाचा शुभारंभ

हिंगोली : पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड या हिंगोली दौऱ्यावर आल्या होत्या. खरीप हंगाम जवळ आल्याने याप्रसंगी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रा.गायकवाड यांच्याहस्ते शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रा.गायकवाड यांच्या हस्ते हिंगोली तालुक्यातील उमरा येथील अमृतेश्वर शेतकरी गट १ आणि २, हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील विजय शेतकरी गट १ आणि २ या  एकूण २५ टन खताचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य … Read more

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६१व्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्र्यांकडून अभिवादन

सातारा, दि. ९ (जिमाका) : सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६१व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार … Read more

कर्मवीर अण्णांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र आजच्या घडीला उपयुक्त

मुंबई, दि. ९:- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवली.  आजच्या सुशिक्षित आणि प्रगतशील महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर अण्णांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. ‘कोरोना’ नंतर राज्याला सावरण्यासाठी त्यांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले. कर्मवीर अण्णांनी रयत … Read more