उदयोजक नरेंद्र फिरोदिया यांना मसाप कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

अहमदनगर: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना तर वाडमयीन चळवळीसाठीच्या योगदानाबद्दल डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार, नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे. प्रथमच भारताबाहेरील व्यक्तीस हा कार्यकर्ता पुरस्कार दिला जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता … Read more

विवाहित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ‘त्या’ महिलेला अटक !

अहमदनगर :- सागर विलास कानडे या विवाहित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गौरी जगताप या महिलेला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गौरीच्या जाचाला कंटाळून सागरने २ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे वडील विलास कानडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गौरी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. … Read more

गळफास घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

जामखेड :- येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील शिक्षिका विजया नितीन वराट (वय ४०, माहेरचे नाव विजया सीताराम गुजर) यांनी बुधवारी मध्यरात्री तपनेश्वर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शिक्षण विभागात व परिसरात खळबळ उडाली. अंत्यविधी गुरूवारी सकाळी झाला. त्यांच्यामागे पती, मुलगी, मुलगा, सासू-सासरे, आई-वडील,भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले … Read more

नगरसेवकांसह ४० समर्थकांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर :- बसपचे नगरसेवक मुदस्सर शेख व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अरिफ शेख यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी रात्री हाणामारी झाली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोन्ही आजी- माजी नगरसेवकांसह ४० समर्थकांविरूध्द गुन्हा दाखल केला. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाले. सर्जेपुरा परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अरिफ शेख व मुदस्सर शेख यांच्या समर्थकांत राडा झाला. दगडफेेक झाल्याने परिसरात … Read more

विहिरीत पडून एकाचा मृत्यू

कोपरगाव | खिर्डी गणेश शिवारात शेत गट नंबर ५४ मधील विहिरीत बाळासाहेब विठ्ठल शेटे (४५, बोलकी) यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी बसचालकास मारहाण

कोपरगाव :- पुणे-धुळे एसटी बस (एमएच १४ बीटी ३२९०) धुळ्याकडे जात असताना एकाने स्वीफ्ट डिझायर कार (एमएच १७ बीव्ही ९६९१) आडवी लावून माझ्या मावस बहिणीला सावळविहीर येथे का उतरवले नाही? असे म्हणत बसचालकास मारहाण व शिवीगाळ केली. नगर-मनमाड महामार्गावर तीनचारी येथे गुरूवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे…

अवीट गोडी असणारं जांभूळ हे फळ खाण्यातली मजा काही न्यारीच आहे. त्याचवेळी आरोग्यासाठीही हे फळ अतिशय उपयुक्त आहे. जांभळामुळे पित्त कमी होते. थकवा दूर होतो. शिवाय तहानही भागते.आज आपण पहाणार आहोत जांभळाचे आरोग्यदायी फायदे… जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो जांभळामध्ये … Read more

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

संगमनेर : तालुक्यातील पेमगिरी येथील रामदास बबन जेडगुले (वय ३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी घडली. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेमगिरी याठिकाणी रामदास जेडगुले हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी त्यांनी आपल्या राहत्या घरात … Read more

पाणी भरण्याच्या वादातून बेदम मारहाण

नेवासा : नेवासा खुर्द परिसरात रहाणारे शेतकरी गोरख आजीनाथ जाधव (वय २७) या तरुणाचे दि. १२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाणी भरण्यावरून झालेल्या वादाच्या कारणातून जमाव जमवून गज व काठ्यानेबेदम मारहाण करून डोके फोडले. हातावर मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी गोरख जाधव या शेतकऱ्यांने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दामू पिराजी जाधव, … Read more

शिवीगाळ, दमदाटी करत चाकु दाखवत मारुन टाकण्याची धमकी

अहमदनगर : गंगा उद्यान परिसरातील मिस्किन मळा येथे पायी चालणाऱ्या निखिल राजेंद्र सोनवणे (वय १७, रा. चव्हाणवाडी, गेवराई, बीड) यास चार अनोळखी इसमांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारून चाकुने मारुन टाकण्याची धमकी दिली. या मारहाणीत निखिल सोनवणे गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री ११ च्या सुमारास येथे घडली. याप्रकरणी … Read more

पोलीस बंदोबस्त असून यात्रेत गोंधळ, तलवारी घेऊन माजवली दहशत !

श्रीरामपूर :- तालुक्यातील टाकळीभान येथील ग्रामदैवत श्री महादेव यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत झाला; मात्र यात्रेत पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही मोठ्या प्रमाणावर भुरट्या चो‍ऱ्या झाल्या, तसेच खुलेआम तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचे प्रकार झाल्याने भाविक व ग्रामस्थांमधून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. सोरट, चिवचिव याची एक सामाजिक कार्यकर्ता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी मोबाइलमध्ये व्हिडिओ … Read more

धक्कादायक : दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला सप्तशृंगी गडाच्या पायाशी सोडून देत मुलगा फरार !

सप्तशृंगगड : ज्यांनी या जगात आणले,वाढविले त्या वडिलांनाच फसवल्याची हृदयद्रावक घटना नगर जिल्ह्यात समोर आली आहे. ‘तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे, त्यासाठी सप्तशृंगगडावर जायचे आहे’, असे सांगून राहुरी तालुक्यातील एका मुलाने आपल्या वृद्ध पित्याला सप्तशृंगगडावर आणले आणि त्याना गडाच्या पहिल्या पायरीजवळच बसण्यास सांगून स्वत: तेथून पोबारा केला. हा धक्कादायक प्रकार मंदिर ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचाऱ्यामुळे उघडकीस … Read more

मृत्यू की जीवन?’. प्रश्न विचारून आलेल्या उत्तरानंतर तिने केली आत्महत्या

कुआलालंपूर : इंस्टाग्राम ॲपवरील ६९ टक्के फॉलोवर्सनी मरण्याचा सल्ला दिल्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मलेशियात मंगळवारी घडली. मृत्यू की जीवन? असा विचित्र प्रश्न या मुलीने इंस्टाग्रामवरील फॉलोवर्सना विचारला होता. या सर्वेतील कौल गांभीर्याने घेत मुलीने थेट एका दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत मृत्यूला कवटाळले. मलेशियातील सरवाक राज्यात बोर्नियो बेटावरील कुचिंग शहरात … Read more

आजी-माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

अहमदनगर :- शहरातील सर्जेपुरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आरिफ शेख व बसपचे नगरसेवक मुदस्सर शेख या दोघांच्या समर्थमकांमध्ये हाणामारी झाली आहे. या परिसरातील आजी-माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांत हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. या गटातील मारामारीचे कारण किरकोळ असल्याचे समजते. पोलिसांनी या दगडफेकीची गंभीर दखल घेत सर्जेपुरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवला. सायंकाळी दगडफेक झाल्यामुळे परिसरात … Read more

मुख्याध्यापिकेची गळफास घेऊन आत्महत्या

श्रीरामपूर :- नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षिका अलकनंदा सोनवणे (वय ५०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्त्येचे नेमके कारण कळले नसले तरी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोन व्यक्तींचा उल्लेख केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्या दोन व्यक्तींनी छळ केला की आणखी काही त्रास दिला होता? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. अलकनंदा सोनवणे या पतीशी … Read more

आनंदाची बातमी : 11 जूनला महाराष्ट्रात मान्सून धडकणार !

मुंबई :- दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत आपला अंदाज वर्तवला असून मान्सून यंदा 6 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण पाच दिवसांमध्ये म्हणजे 11 जूनला महाराष्ट्रात धडकणार, असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याने विकसित केलेल्या सांख्यिकी प्रारूपाच्या आधारावर हा अंदाज वर्तवण्यात आला … Read more

जमीन विकण्यास विरोध केल्याने पत्नीवर केले चाकूने वार !

अहमदनगर : जमीन विकण्यास हरकत घेणाऱ्या पत्नीस शिवीगाळ करून तिच्या हातावर चाकुने वार करून तिला जखमी केले. ही घटना विळद घाट येथील इंजिनिअरींग कॉलेजवळ शनिवारी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, सुवर्णा सुभाष सानप (रा.विळदघाट, इंजिनिअरींग कॉलेजवळ) या घरी असताना त्यांचा पती सुभाष बाजीराव सानप हा त्यांना म्हणाला की, मी माझी जमीन विकणार आहे. तू … Read more

लोकसभा निवडणूकीनंतर महापालिकेत बदल होणार ?

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे भेट घेतली असून या भेटीत महापालिकेत शिवसेना व भाजपची युती करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. लोकसभा निवडणूकीनंतर याबाबतच्या हालचाली गतीमान होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेत सेना व भाजपच्या युतीच्या चर्चेने जोर धरला असून त्या अनुषंगानेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख दिलीप … Read more