दुकानातून खाऊ घेऊन देतो म्हणत, नराधमाने 6 वर्षीय चिमुरडीवर केला बलात्कार

सातारा – खाऊचे आमिष दाखवून एका सहा वर्षांच्या मुलीवर नराधम तरुणाने बलात्कार केल्याची घटना सातारा शहरात घडली.  याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सलम्या मंडे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.  दरम्यान, पीडित मुलगी दिवाळी सुट्टीनिमित्त नातेवाइकांकडे आली आहे.याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. सलम्या याने किराणा दुकानातून खाऊ देतो, असे मुलीला सांगितले.  … Read more

कर्तव्य बजावत असताना वीज पडून २२ वर्षीय जवान शहीद

नळदुर्ग  तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी गावचे सुपुत्र भारतीय लष्कर दलात मेजर सतीश नागनाथ बाबर (२२) यांचा पुणे येथे कर्तव्य बजावताना बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे.  गुरुवारी (दि.७) सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या मूळगावी गुळहळ्ळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबर हे पुणे येथे कर्तव्य बजावत असताना बुधवारी दुपारी अंगावर वीज … Read more

धक्कादायक! कपडे वाळवताना विजेचा धक्का, आतेबहिणींचा जागेवरच मृत्यू

केज – केज तालुक्यातील शिंदी येथे गुरुवारी (दि. १) दुपारी एकेच्या सुमारास  २२ वर्षीय विवाहित तरुणी कपडे वाळू घालत असताना तिला  विजेचा धक्का बसला व  तिला वाचवण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय आतेबहिणीचाही मृत्यू झाला. दिवाळी सणासाठी विवाहिता माहेरी तर मुलगी आजोळी आली होती. शिंदी येथील अनिल पाटील यांची कन्या रेणुका थोरात ही दिवाळीच्या सणासाठी माहेरी आली होती. … Read more

पाचच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू

तीर्थपुरी –  एका सीड्स कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत असलेले आकाश जाधव (२४, राहेरा तांडा, ता. घनसावंगी) हे तीर्थपुरी येथे पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होते.  बुधवारी संध्याकाळी उशिरा घरी येऊन जेवण करून झोपी गेले होते. पहाटे पती झोपेतून उठत नसल्याने पत्नीने हलवून पाहिले असता ते जागे होत नसल्याने पत्नीने शेजारच्यांना उठवून पतीला दवाखान्यात अंबडला नेले होते.  … Read more

५ लाख रुपये माहेरुन घे, तरच तुला नांदवतो, असे म्हणत मारहाण…

राहुरी  – राहुरी येथील सातनपीरबाबा रोड परिसरात राहणारी विवाहित तरुणी तेरेसा कन्हैय्या वाघमारे ही भैरवनाथ मंदिर परिसर कोंढवा खुर्द, पुणे येथे नांदत होती.  नांदत असताना नवरा व सासरच्या लोकांनी ११/ ५/ २०१८ ते १८/ ६/ २०१८ दरम्यान ५ लाख रुपये माहेरुन घे, तरच तुला नांदवतो, असे म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करुन शारीरिक व मानसिक छळ … Read more

स्कुटर खड्ड्यात आदळून एकाचा मृत्यू

संगमनेर – संगमनेर तालुक्यात साकूर गावच्याजवळ बिरेवाडी फाट्याजवळ कोठे मकापूर रस्त्यावर स्कूटर दुचाकी नं. एमएच १७ सीइ ६६५८ हिच्यावरील,  चालक रमेश मच्छिंद्र बोरुडे, रा. कोल्हार, ता. राहाता याने स्कूटरवर पाठीमागे मनाजी काशिनाथ नान्नोर, वय ७४, रा. गंगापूर, ता. राहुरी यांना बसवून साकूर ते करणपूर अशी स्कूटर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालविली.  दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात … Read more

शेतात कांदा सडलेच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

नेवासा – तालुक्यातील नजीक चिंचोली येथील शेतकरी अनिल नारायण शेळके, वय – ४२ यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार दि . ५ रोजी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, कर्जबाजारीपणा आणि पावसाने शेतातच कांदा सडून गेल्याच्या विवंचनेतून शेळके यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. अनिल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.  नेवासा … Read more

गांजाचा ओव्हर डोस घेतल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणतांबा – राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे राहणाऱ्या गणेश नावाच्या ३० वर्ष वयाच्या तरुणास रहात्या घरातून औषधोपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत आणले.  त्याने गांजा जास्त प्रमाणात घेतल्याने गणेशला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ओषधउपचार सुरू असताना गणेशचा मृत्यू झाला. प्रवरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वरीलप्रकरणी राहाता पोलिसांत खबर दिल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सफो पवार हे … Read more

अस्मानीनंतर सुल्तानी संकट, संतप्त बळीराजाने कांद्याचे लिलाव बंद पाडले!

नगर –  नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात गुरुवारी कांद्याचे लिलाव सुरू होते. सोमवारी कांद्याचे भाव साडेचार हजार रुपये क्विंटलपर्यंत गेल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला.  मात्र, गुरुवारी  सकाळी कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याचे भाव अचानक १० ते ३० टक्क्यांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत कांद्याचे लिलाव बंद पाडले. आक्रमक झालेले शेतकरी थेट … Read more

breaking- कोकणचा दौरा अर्धवट सोडून शरद पवार मुंबईकडे रवाना

मुंबई –  राज्यात सत्ता स्थापनेवरुन अद्यापही राजकीय पेच कायम आहे. भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे मात्र, अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाहीये.  तसेच उद्धव ठाकरेंनी फोडाफोडीच राजकारण होऊ नये म्हणून सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली, या बैठकीत शिवसेना मुख्यमंत्री पदावर आणि आपल्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं ठरवलं आहे.   त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे … Read more

‘स्वतःहून युती तोडायची माझी इच्छा नाही,पण…’,

मुंबई: शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या बैठकीत काय घडल  याकडे भाजपचं लक्ष लागून होत, पण उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा निर्णय घेतला, ते म्हणाले…  मला स्वत:हून युती तोडायची नाही. युती तोडण्याचं पाप मला करायचं नाही. त्यामुळे जे काही ठरलं असेल ते सगळं गोडीने व्हावं. समसमान वाटप … Read more