जामखेड :- बारामतीची शिकार हातातून जाते काय असे वाटते, परंतु ही शिकार आपल्या हातूनच व्हावी, अशी इच्छा आहे, असे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी पवार यांचे डिपाॅझिट जप्त करून घेणार आहे, असेही ते म्हणाले.
सरपंच परिषद महामेळाव्यात शिंदे बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सारोळ्याचे सरपंच अजय काशीद यांनी या मेळाव्याचे आयोजन केले. या वेळी जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, काशीनाथ ओमासे, विलास मोरे, हनुमंत उतेकर, काकासाहेब चव्हाण, कृष्णा चव्हाण, नंदू गोरे, गणेश लटके, दादासाहेब वारे,

महारूद्र महारनवर, हरिभाऊ मुरूमकर, गफ्फार पठाण, भारत उगले, केशव वनवे, डॉ. गणेश जगताप, लहू शिंदे, बापूराव ढवळे, विद्या मोहळकर, गणेश कोल्हे, सुखदेव शिंदे, प्रशांत शिंदे, विठ्ठलराव राऊत, अॅड. प्रवीण सानप, नगरसेवक महेश निमोणकर, राजेश वाव्हळ, बिभिषण धनवडे, संतोष गव्हाळे, भाजप शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, पांडुरंग उबाळे, मनोज कुलकर्णी, ज्ञानेश्वर झेंडे आदी उपस्थित होते.
कोट्यवधींचा निधी आणल्यामुळे जनता आता विकासाची फळे चाखू लागली आहे. पुढील पाच वर्षांत कृष्णा भीमा स्थिरीकरण पाणी योजना आणून मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करणार आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, आम्ही कोट्यवधींचा निधी आणला, परंतु जाहिरात केली नाही.
विरोधक मात्र चाॅकलेट-गोळ्या वाटतात, पण त्यावर स्वतःचा फोटो छापतात. विरोधात उभा करण्यासाठी एकही माणूस मिळाला नाही. त्यामुळे बाहेरून माणसे आणावी लागत आहेत. तथापि, जनता स्वाभिमानी आहे. बाहेरचे पार्सल ते बाहेरच पाठवतील. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी घेणार आहे. विरोधात कोणीही उभे राहिले, तरी मी ते सावज टिपेन, असे शिंदे यांनी सांगितले.
- लाडक्या बहिणींसाठी Good News ! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ मुहूर्तावर खात्यात जमा होणार, वाचा डिटेल्स
- मोठी बातमी ! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवाभाऊंची मोठी घोषणा, आता महिलांना मिळणार बिनव्याजी 100000 रुपयांचे कर्ज
- वाईट काळ कायमचा निघून जाणार! ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल, मनातील अनेक इच्छा पूर्ण होणार
- राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार चार दिवसांची शासकीय सुट्टी !
- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांना 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्टी जाहीर, दिवाळीच्या आधीच सरकारची मोठी घोषणा