अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- बंद असलेली मंदिरे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मंदिरे उघडण्यात यावी यासाठी भारतीय जनता पक्ष आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुद्धा सुरू केलं आहे.
भाजप, मनसेकडून विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मंदिरे पुन्हा खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार कधी घेणार? या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक पार पडल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी मंदिरे खुली करण्यासाठी भाजप-मनसेच्या आंदोलनाबाबत विचारले.
यावर अजित पवार म्हणाले, मंदिरे उघडा भाजप म्हणत आहे मात्र त्यांनी केंद्र सरकार काय म्हणतयं हे बघावं. सणासुदीच्या काळात गर्दी करू नका असं केंद्र सरकार म्हणत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जाला की महाविकास आघाडी सरकार मंदिरे खुली करेल. कुणी आक्रमक व्हाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असा टोला मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन मनसे-भाजपला लगावला.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करणार. मंदिरे खुली करा हा भावनिक मुद्दा आहे. त्या भावनिक मुद्द्याच्या निमित्ताने काही साध्य होऊ शकतं का हे आजमवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. असं पवार म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम