कर्जत :- तालुक्यातील ४३४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ कोटींचा व नगर जिल्ह्यातील ८ हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४२ कोटींचा पीकविमा एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीकडून मंजूर झाली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासराव शेवाळे यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे दिली.
२०१७-१८ या वर्षात बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेमार्फत डाळिंब पिकासाठी पंतप्रधान फळपीक हवामान आधारित विम्याची रक्कम भरली होती. परंतु ही रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेने एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई याच्याकडे उशिरा भरल्याच्या कारणावरून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा चार कोटींचा डाळिंब पीकविमा कंपनीने नाकारला होता.
याबाबत शेवाळे यांनी जिल्हा बँक व विमा कंपनीकडे पाठपुरावा केला. औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल करत विमा कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता. एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत भोसुरे यांच्याकडेही पाठपुरावा करून या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी, म्हणून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.
याची गंभीर दखल घेत नगर जिल्ह्यातील आठ हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४२ कोटी रुपयांचा व कर्जत तालुक्यातील बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ कोटी रुपयांचा डाळिंब पिकाचा विमा मंजूर केला. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
- शुक्र ग्रह देतो पैसा, प्रसिद्धी आणि नाव… ‘या’ 3 तारखांना जन्मलेले लोक असतात प्रचंड भाग्यवान!
- MBA करायचंय?, मग भारतातील टॉप-5 MBA कॉलेज आणि त्यांची फी, प्रवेशप्रक्रिया, पॅकेज सगळं काही इथे जाणून घ्या!
- पाथर्डीतील मुख्य रस्त्यावर गटारीचं पाणी, उपजिल्हा रुग्णालय परिसर दुर्गंधीने हैराण; सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेचे दुर्लक्ष
- जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांची श्रीगोंदा तहसील कार्यालयात झाडाझडती, कर्मचाऱ्यांना कामावर लक्ष देण्याच्या सूचना
- अहिल्यानगरच्या भाजी बाजारात २५३३ क्विंटल भाजीपाल्यांची आवक, जाणून घ्या कोणत्या भाज्यांचे काय आहेत दर?