कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्यातील खेड, औटेवाडी, भांबोरा, दुधोडी, जलालपूर, गणेशवाडी आदी गावांना पुराचा फटका बसला आहे. पवार यांनी आज या भागाचा दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आज शाळाही बंद ठेवण्यात आल्या. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी या भागाचा दौरा करून तेथील प्रश्न समजावून घेतले. खेड येथे अण्णासाहेब मोरे, युवा नेते नीलेश निकम, उपसरपंच बाळासाहेब मोरे, सुरेश शिंदे, अक्षय वाघमारे आदींशी चर्चा केली.
- अहिल्यानगरमधील ‘या’ ५४ ग्रामपंचायतीचा महिला चालवणार कारभार, तालुक्यातील सरपंचपदाचे महिला आरक्षण जाहीर
- सोन्याच्या किमती लाखाच्या उंबरठ्यावर, लग्नकार्य, सण-उत्सव कसे करायचे सर्वसामान्यांना पडला प्रश्न?
- निळवंडे धरणाची निर्मिती करून संगमनेरला दुष्काळमुक्त करणं हे माझं अंतिम ध्येय होतं, त्यामुळे माझं योगदान कोणीही नाकारू शकत नाही- बाळासाहेब थोरात
- सहकारी पतसंस्थांना कर्जदाराचा सिबिल स्कोर पाहता येणार? सहकारमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!
- ट्रस्टच्या नावात बदल, नोंदणी क्रमांकात गोंधळ, हेतूपरस्सर दिशाभूल करण्याचा संत शेख महंमद महाराज यांच्या वंशजावर आरोप
ट्रस्टच्या नावात बदल, नोंदणी क्रमांकात गोंधळ, हेतूपरस्सर दिशाभूल करण्याचा संत शेख महंमद महाराज यांच्या वंशजावर आरोप