जामखेड :- बारामतीची शिकार हातातून जाते काय असे वाटते, परंतु ही शिकार आपल्या हातूनच व्हावी, अशी इच्छा आहे, असे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी पवार यांचे डिपाॅझिट जप्त करून घेणार आहे, असेही ते म्हणाले.
सरपंच परिषद महामेळाव्यात शिंदे बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सारोळ्याचे सरपंच अजय काशीद यांनी या मेळाव्याचे आयोजन केले. या वेळी जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, काशीनाथ ओमासे, विलास मोरे, हनुमंत उतेकर, काकासाहेब चव्हाण, कृष्णा चव्हाण, नंदू गोरे, गणेश लटके, दादासाहेब वारे,

महारूद्र महारनवर, हरिभाऊ मुरूमकर, गफ्फार पठाण, भारत उगले, केशव वनवे, डॉ. गणेश जगताप, लहू शिंदे, बापूराव ढवळे, विद्या मोहळकर, गणेश कोल्हे, सुखदेव शिंदे, प्रशांत शिंदे, विठ्ठलराव राऊत, अॅड. प्रवीण सानप, नगरसेवक महेश निमोणकर, राजेश वाव्हळ, बिभिषण धनवडे, संतोष गव्हाळे, भाजप शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, पांडुरंग उबाळे, मनोज कुलकर्णी, ज्ञानेश्वर झेंडे आदी उपस्थित होते.
कोट्यवधींचा निधी आणल्यामुळे जनता आता विकासाची फळे चाखू लागली आहे. पुढील पाच वर्षांत कृष्णा भीमा स्थिरीकरण पाणी योजना आणून मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करणार आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, आम्ही कोट्यवधींचा निधी आणला, परंतु जाहिरात केली नाही.
विरोधक मात्र चाॅकलेट-गोळ्या वाटतात, पण त्यावर स्वतःचा फोटो छापतात. विरोधात उभा करण्यासाठी एकही माणूस मिळाला नाही. त्यामुळे बाहेरून माणसे आणावी लागत आहेत. तथापि, जनता स्वाभिमानी आहे. बाहेरचे पार्सल ते बाहेरच पाठवतील. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी घेणार आहे. विरोधात कोणीही उभे राहिले, तरी मी ते सावज टिपेन, असे शिंदे यांनी सांगितले.
- MPSC Pashudhan Vikas Adhikari Jobs 2025: तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न साकार करा! MPSC द्वारे पशुधन विकास अधिकारी पदासाठी तब्बल २७९५ जागांची भरती सुरू
- कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली हे करणे सोपे नव्हते मात्र आपण ते करून दाखवले – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
- शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील ८३ तलाव होणार गाळमुक्त – आ. मोनिका राजळे
- लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी ! 2100 रुपयांचा हफ्ता कधीच मिळणार नाही ? सरकारमधील मंत्र्यांच्या विधानाने चर्चा
- ऊस आणि चारा पिके करपली, मुळाच्या पात्रात तातडीने पाणी सोडा ! शेतकऱ्यांची मागणी