धक्कादायक : जमिनीच्या घरगुती वादातून गळफास घेऊन आत्महत्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात जमिनीच्या वादातून दिनकर यादव वर्पे (५५) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी आश्वी बुद्रूक येथे घडली. त्यांच्या खिशात दोन चिठ्ठ्या सापडल्या.

नऊ जणांवर आश्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ जणांना अटक केली. गोरख वर्पे यांची १५ गुंठे जमीन व घर दिनकर वर्पे यांनी २०१७ मध्ये खरेदी केली.

मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यातील आमची अडीच गुंठे जागा काढून द्या, अशी मागणी केली. काहींनी जमिनीत अतिक्रमण केले.

वर्पे यांना रविवारी मारहाण करण्यात आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. सोमवारी घरातील लोक चारा काढण्यासाठी शेतात गेले असता वर्पे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

चुलतभाऊ ऋषिकेश वर्पे, आशुतोष वर्पे, चुलती चंद्रकला वर्पे (आश्वी बुद्रूक), पप्पू तांबे, भानुदास तांबे, अलका तांबे, भीमाजी तांबे, सचिन तांबे, राणी तांबे (चिंचपूर) यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News