शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी करण्याची मागणी

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघासह नगर शहर आणि श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार विजयी झाला नसून, त्याला जिल्हाप्रमुख जबाबदार आहेत. पारनेर, नगर शहर व श्रीरामपूर मतदारसंघातील तालुक्यात कार्यरत असलेल्या जिल्हाप्रमुखांची तत्काळ हकालपट्टी करावी, असा सूर पारनेर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत आळवण्यात आला. विधानसभा निवडणूकीत पारनेर – नगर मतदारसंघातून विजय … Read more

उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू – खा. डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर : नगर शहरातील उड्डाणपूल हा महत्त्वाचा विषय आहे. येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लष्कर हद्दीतील जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. ९० टक्के जमीन संपादित असेल, तर कार्यारंभ आदेश देता येतात. त्यानुसार उड्डाणपुलासाठी येत्या आठ ते दहा दिवसात आणखी जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले, की उड्डाणपुलाच्या कार्यारंभ आदेश जारी केले जातील. उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू … Read more

नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

अहमदनगर :- नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंग्यूसह हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून शासकीय रुग्णालयांतही गर्दी वाढली आहे.  पाणी साचलेल्या ठिकाणी डासाच्या अळ्यांची निर्मिती जोमात सुरू आहे. आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात महापालिका हद्दीत डेंग्यूचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा … Read more

पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल !

अहमदनगर :- ‘परशुराम सेवा संघ लवकरच व्यापक रूप घेणार असल्याने भविष्यकाळ संघासाठी चांगला राहणार आहे. त्यामुळे यापुढे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार असेल आणि पुढचा मुख्यमंत्री परशुराम सेवा संघाचा असेल,’ असे प्रतिपादन परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे यांनी येथे केले. परशुराम सेवा संघाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक नगरच्या एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र राज्य संपर्क … Read more

कांद्याची सहा हजारांकडे झेप

अहमदनगर : राज्यभरात भीषण दुष्काळ व त्यापाठोपाठ सांगली, सातारा,नाशिकमध्ये आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे उत्पादनच झाले नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शनिवारी अहमदनगर येथील नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला ५ हजार ६०० रूपये एवढा विक्रमी दर मिळाला. सततच्या भीषण दुष्काळामुळे मेटाकटीला आलेल्या शेतकऱ्याला अवकाळी … Read more

अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप

अहमदनगर : नगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. नगर शहराच्या हद्दीतून … Read more

पोलिसास धक्काबुक्की

अहमदनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगितल्याचा राग येवून त्यास शिवीगाळ केल्याची घटना जामखेडमध्ये घडली. याप्रकरणी नागेश अशोक गवळी, अशोक मारूती गवळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, रॅलीमुळे झालेली वाहतूक कोंडी कमी करत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे सांगितल्याने नागेश अशोक गवळी व अशोक … Read more

मनपा आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच बसवण्यात येणार

अहमदनगर : महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. या पुतळ्यासाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा ठराव महासभेत दोन वर्षापुर्वी झालेला आहे. मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही. … Read more

नगर शहराला महानगर बनवणार : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर :- नगर शहर विकासाच्या संकल्पनेतून नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान केले. माझ्यावर आता शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. नागरिकांना बरोबर घेऊन मी शहर विकासाला चालना देणार आहे. उपनगरांच्या विकासाबरोबरच मध्यवर्ती शहराचे प्रश्न सोडवणार आहे.  विकासकामांबरोबर रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुकुंदनगरच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे … Read more

आयुक्तांच्या दालनाला चिकटवले निवेदन

नगर : संततधार पावसाने शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत.  रस्त्याचे पॅचिंगचे काम मनपा प्रशासनाने लवकरात लवकर करावे अशी मागणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना देण्यासाठी मागणीचे निवेदन देण्यासाठी गेले तेव्हा अधिकारी उपस्थित नसल्याने आयुक्तांच्या दालनाला निवेदन चिकटवून नगरसेवक योगीराज गाडे यांनी निषेध व्यक्त … Read more

आता कोण होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

अहमदनगर :- विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे.पालकमंत्रिपदासाठी शहर-जिल्ह्यात इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरेल. शहर अथवा जिल्ह्यातील इच्छुकांना संधी मिळाली, तर पालकमंत्रिपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. विधानसभेचा निवडणूक निकाल लागून आठ दिवस झाले तरी … Read more

वृद्ध महिलेची हत्या करणार्यास अटक

अहमदनगर : शहरातील लालटाकी भागातील भारस्कर कॉलनीत किरकोळ वादातून वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. ही घटना एप्रिलमध्ये घडली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपी करण नारायण दिनकर (वय २०, रा. कसबा पेठ, पाथर्डी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डीतून ताब्यात घेतले.  याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १० एप्रिल २०१९ रोजी दुपारच्या सुमारास लालटाकी भागातील … Read more

दोन गटात हाणामारी,पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : शहरातील घासगल्ली भागात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. कॉ. शहीद सलीम शेख गस्तीवर असताना त्यांना अनस मोहम्मद लुकमान खत्री (वय १९), मोहम्मद अबीद हारून खत्री (वय २१, दोघे रा. गोविंदपुरा), आकाश अरुण … Read more

मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही….

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर, कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिल्ह्यात भाजपचे निवडून आलेले तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही. त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांनी केली आहे.गेंट्याल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

ह्रद्याचा ठोका चुकवित मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर

अहमदनगर (प्रतिनिधी)- दोरी व खांबावरच्या मल्लखांब स्पर्धेत खेळाडूंनी ह्रद्याचा ठोका चुकवित प्रात्यक्षिके सादर केली. अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन आयोजित जिल्हा मल्लखांब अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा बुरुडगाव रोड येथील श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन संचलित सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल रामावतार मानधना ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेस शहरासह जिल्ह्यातील शालेय खेळाडूंचा उत्सफुर्त … Read more

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा !

अहमदनगर : शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा.असे साकडे या शिष्टमंडळाने ठाकरे यांना घातले.राठोड यांच्याबाबत आपण विचाराधीन असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अशी माहिती सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखालील … Read more

महापौर वाकळे यांनाही पडला ह्या रस्त्याचा विसर !

अहमदनगर : नगर शहर विकास योजनेतील दिल्लीगेट रस्ता रुंदीकरणासाठी मनपाने प्रशासकीय सोपास्कर पूर्ण केले आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून फोटोसेशन केले. तथापि, रस्ता रुंदीकरणाची अंमलबजावणी झालेली नाही. महापौरांनाही या रस्त्याचा विसर पडला आहे. आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे असताना त्यांनी दिल्लीगेट भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले … Read more

तक्षिला स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अहमदनगर ;- तक्षिला स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडले. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक विश्‍व व अनेक गोष्टी या विषयावर बहारदार कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विश्‍वनिर्मितीचे रहस्य उलगडले. यामध्ये अश्मयुगीनपुर्वीच्या डायनासोर युगाची झालेली निर्मिती व त्याचा नाश, विविध धर्माच्या धर्मगुरुंनी दिलेली शिकवण तर मनुष्याने स्वत:च्या स्वार्थासाठी प्रदुषण करुन ओढवलेल्या … Read more