जामखेड शहरासाठी ११७ कोटींची पाणीयोजना मंजूर!

जामखेड : जामखेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोत्थान महाअभियानांतर्गत ११७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. याबाबत मंजुरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत पालकमंत्री प्रा. राम शिंदे व नगराध्यक्ष निखिल घायतडक यांना दिले. यामुळे जामखेड शहरापुढील तीस वर्षांपर्यंतचा पाणीप्रश्न मिटणार आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून जामखेड तालुक्यात … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महीला जागीच ठार

पारनेर ;- प्रातंविधीसाठी शेजारील डाळींबाच्या बागेत गेलेल्या एका वृद्ध महीलेवर बिबट्याने हल्ला केल्याने ही महीला जागीच ठार झाली. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज (शनिवारी )पहाटे साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली. राधाबाई कारभारी वाजे (वय 70) असे या महिलेचे नाव असुन या घटनेने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहीती अशी की,वडनेर येथील राधाबाई कारभारी … Read more

विकासकामांमुळेच जनता माझ्यासोबत – आ.राहुल जगताप

श्रीगोंदा: श्रीगोंदा -नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून पाच वर्षांत श्रीगोंदा नगर तालुक्यात मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत, त्या विकासकामांमुळेच जनता आपल्यासोबत असल्याचे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सुरेगाव ते घुटेवाडी या २.५० कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आ. जगताप यांनी बोलताना सांगितले की, मतदारसंघातील … Read more

मुलासोबत झालेल्या भांडणातून श्रीगोंद्यातील सातवीच्या विद्यार्थिनींनीच केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव !

श्रीगोंदा :- शाळेत जाण्याचा कंटाळा व रस्त्याने जाताना वर्गातील मुलासोबत झालेल्या वादावरून शाळेत शिक्षक ओरडतील या भीतीमुळे शाळेत जायचे नाही म्हणून सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मैत्रिणींनी घरी न जाता वाट सापडेल तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु एका शिक्षकाच्या जागरुकतेमुळे या मुली पुन्हा घरी सुखरूप पोहोचल्या खऱ्या परंतु पालक ओरडतील म्हणून या मुलींनी आयडियाची कल्पना करून … Read more

पाणी द्या; अन्यथा धडा शिकवू – खा. सदाशिव लोखंडे

राहुरी : तालुक्यातील ३२ गावातील व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उभ्या पिकांसाठी योग्य क्षमतेने पाणी मिळत नाही. टेल टू हेडवरील सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही उभे राहून पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला. मुळा व भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडले गेलेले आवर्तन योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना मिळत … Read more

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.  … Read more

लवकरच माझी भूमिका स्पष्ट करणार -राजेश परजणे

कोपरगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३१) आयोजित करण्यात आलेली कार्यकर्त्यांची बैठक गोदावरी दूध संघाबरोबरच दोन्ही साखर कारखान्यांच्या वार्षिक सभांमुळे तूर्त स्थगित ठेवण्यात आली असून, कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात राजकीय दिशा आणि भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती जि. प. सदस्य राजेश परजणे पाटील यांनी दिली. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात परजणे यांनी सांगितले, कोपरगाव … Read more

दिव्यांग मुलांचा विवाह पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणवले

अहमदनगर :- मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अलीकडे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. तर विवाह कशा पध्दतीने चांगला होईल यासाठी वारेमापपणे खर्च केला जातो. मात्र विवाह दिव्यांगांचा असल्यास या अडचणींमध्ये आणखीच भर पडते. घरची बिकट परिस्थितीमुळे अनामप्रेम संस्थेने आधार दिलेल्या दोन दिव्यांग जोडप्यांचा विवाह सेवाप्रीत सोशल फाऊंडेशन या महिला संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या थाटात हॉटेल … Read more

रोहित पवारांची कर्जत तालुक्यात जमीन खरेदी !

अहमदनगर :- खासदार शरद पवार यांचे नातू आणि कर्जत – जामखेड तालुक्यातून निवडणूक लढवणार असल्याचे नुकतेच जाहीर केलेले रोहित पवार यांनी नुकतीच पिंपळवाडी येथील उमा महेश्वरी राजा प्रकाश यांच्याकडून दीड हेक्टर जमीन खरेदी केली. रोहित यांचे सासरे मगर परिवार यांची कर्जत तालुक्यामधील पिंपळवाडी येथे २०० एकर शेतजमीन आहे. आता स्वत: पवार यांनीही तेथे जमीन घेतली … Read more

पवारांचा पारा चढविणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराने नाही मागितली माफी,दिले हे उत्तर

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत. याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आला. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आता नातेवाईकही (डॉ. पद्मसिंह पाटील) सोडून जात असल्याबद्दल विचारले आणि पवारांचा पारा चढला. त्या पत्रकारावर डाफरून पवार चक्क उठून निघू लागले. नंतर काही जणांनी समजूत काढल्यावर त्यांनी … Read more

शरद पवारांना जेव्हा राग येतो,पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पवार संतापले…करायला लावले ‘हे’ कृत्य

श्रीरामपूर :- नगर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असलेले शरद पवार यांचे आक्रमक रूप अहमदनगर करांना पाहायला मिळाले, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरमध्ये आले होते, यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला. नेत्यांबरोबर नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकाराच्या एका प्रश्नावर पवारांचा … Read more

शेतकऱ्यांना पाणी मिळेल,संयम ठेवावा – माजीमंत्री पाचपुते

श्रीगोंदा – पुणे जिल्ह्यातील येडगाव धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी संपले आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन बंद करावे, असे पत्र पुणे जिल्ह्यातील एका आमदाराने दिले. त्यामुळे भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता स्वप्नील काळे यांना आज कुकडी कार्यालयात घेराव घातला. कुकडी प्रकल्पातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले. कर्जत, करमाळा तालुक्‍यांसाठी सुमारे आडीच टीएमसी पाणी … Read more

आ. संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब ? कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसचे नगर शहराचे आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मध्यंतरी थंडावली होती. मात्र आज पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला. मुंबईत सेना पदाधिकार्‍यांसमवेत झालेल्या गुप्त बैठकीत आ. जगताप यांच्या सेना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरले. मात्र यासंदर्भात आ. जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ … Read more

बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट

अहमदनगर : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून पोळा सणाकडे पाहिले जाते. सध्या जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सततच्या दृष्काळामुळे हातात पैसा नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, तर दुसरीकडे चारा पाण्याची टंचाई असल्याने जिल्ह्यातील लाखभर पशुधनाची दावन अजूनही छावणीतच उभी आहे. दृष्काळाचे भीषण सावट जिल्ह्यातील शिवारावर अणि बैल पोळ्याच्या सणावर पडलेले आहे. . … Read more

तोतयागिरी करणारा पोलिसांकडून गजाआड

श्रीगोंदा : शासकीय अधिकारी असल्याचे भासवून तोतयागिरी करणाऱ्या व बनावट शासकीय ओळखपत्र बनवून त्याचा गैरवापर करणाऱ्या प्रसादकुमार बापूराव जठार, रा. लोणी व्यंकनाथ यास श्रीगोंदे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याने अनेक ठिकाणी लोकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांना वर्तविली. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसादकुमार जठार याच्यावर श्रीगोंदा न्यायालयाने पकड वारंट काढले होते. प्रसादकुमार जठार हा आकुर्डी (पुणे) … Read more

कॉलेज परिसरात हाणामारी

अहमदनगर : पाथर्डी येथील एमएम निऱ्हाळी कॉलेज परिसरात २७ ऑगस्टला विद्यार्थ्यांमध्येच राडा झाला. मागील भांडणाचा राग मनात धरून एका विद्याथ्र्यास मारहाण करण्यात आली. तसेच भांडणात मधे पडणाऱ्या शिक्षकालाही शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गात खळबळ उडाली आहे. . २७ ऑगस्ट रोजी फिर्यादी मुलगा … Read more

राज्यातील साखर कामगारांचा पुणे साखर आयुक्त कार्यालयावर धडकला मोर्चा

अहमदनगर – महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. नगर जिल्ह्यासह राज्यातील 15 हजारपेक्षा जास्त साखर कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे सहचिटणीस कॉ.आनंदराव वायकर, प्रतिनिधी मंडळाचे … Read more

अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने बेवारस तरूणीचे कौटुबिक पुनर्वसन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मध्यप्रदेश राज्यातील धामणी कटोरा (ता. रानापूर, जि. झाबुआ) येथील एका आदिवासी समाजातील अतिशय गरीब कुटुंबातील तरूणी सुमित्रा रालू अटल भुरिया (अंदाजित वय 26 वर्ष) मानसिक भान हरवून रस्तावरच जीवन जगत होती. कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाकीची असल्यामुळे तीला कोणतेही उपचार घेता आले नाही. व सभोवतालचे वातावरण पोषक नसल्याने ऑक्टोबर 2018 ला रस्त्याने फिरत फिरत … Read more