निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फक्त प्रदेशाध्यक्ष राहतील

राहाता : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे. काँग्रेस पक्षानेदेखील धोरणापासून फारकत घेतली आहे. मोठा राष्ट्रीय पक्ष राहिलेल्या काँग्रेस पक्षाला तीन महिने अध्यक्षच नव्हता. महाराष्ट्रात या पक्षाची मोठी पडझड झाली. चांगले बाहेर पडले. आता काँग्रेस पक्षाला दिशाच राहिली नसल्याने विधानसभा निवडणुकीनंतर फक्त प्रदेशाध्यक्षच काँग्रेस पक्षात राहतील, अशी टीका गृहनिर्माण मंत्री व महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण … Read more

पवार ८० वर्षांचे तरीही तरूणासारखा प्रचार

संगमनेर – राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाला चांगले वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज्यात आघाडीच्या १५० पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.    संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आ. थोरात बोलत होते. यावेळी … Read more

विखेंच सर्जिकल स्टाईक सुरूच, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार मोहरे गळाला लावले !

जिल्ह्यातील तरूणवर्ग रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना भाजपा – सेनेने सुरू केलेली राजकीय मेगाभरती मात्र अजुनही कायम आहे. चालू आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पंकजा मुंडे आणि सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीचे चार मोहरे युतीने गळाला लावले. दरम्यान, विखेंचे जिल्ह्यात सर्जिकल स्टाईक सुरू असले तरी, अगोदरच हाऊसफुल्ल झालेले भाजप आताच्या जोरदार इनकमिंगमुळे आणखी तुडूंब … Read more

आशुतोष काळेंना विधानसभेत पाठवणारच !

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागील पाच वर्षापासून आशुतोष काळे यांनी केलेला झुंजार संघर्ष आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघाला पुन्हा विकासाच्या वाटेवर घेवून येण्यासाठी आशुतोष काळे यांच्या सारख्या उच्चशिक्षित नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जीवाचे रान करून कोणत्याही परिस्थितीत आशुतोष काळेंना विधानसभेत पाठवू, असा निर्धार वंचित … Read more

पिचडांची सभा उधळणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध

धामणगाव पाट येथे माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे प्रचार सभेत काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध धामणगाव पाट येथील पिचड समर्थकांनी केला आहे. या पुढे असे वागाल तर जशास तसे उत्तर देऊ, अशी संतप्त भावना व्यक्त केली. दोन दिवसांपुर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची सभा काही विघ्नसंतोषी लोकांनी उधळली होती. त्याचा निषेध धामनगाव पाटच्या … Read more

गावातील मतभेद बाजूला ठेवून नवा इतिहास घडवा…

शिर्डी गावातील मतभेद बाजूला ठेवून नवा इतिहास घडवा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजुरी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. शिर्डीतील महायुतीचे उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रचारार्थ राहाता तालुक्यातील राजुरी येथे आयोजित केली होती.  बैठकीत शालिनी विखे म्हणाल्या, विखे कुटुंबीयांनी कोणाचे वाईट केले का? एका तरी मतदाराने उभे राहून तसे सांगावे. मतभेद … Read more

पापाची फेड करण्याची वेळ आली : खासदार डॉ. विखे

राहुरी ;- राष्ट्रवादी काँग्रेस ही व्हाॅटस् एपची लाभार्थी झाल्याने सभेला भाडोत्री माणसे आणण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली, असा टोला खासदार डाॅ. सुजय विखे यांनी लगावला. भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ रविवारी नवीपेठेत आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी शिवाजी सोनवणे होते. ईडीची चौकशी लागली त्यांना मोकाट सोडायचे, असा सवाल करत केलेल्या पापाची फेड करण्याची … Read more

स्वतःचा रस्ताही त्यांना दुरुस्त करता आला नाही… ते मतदारसंघाचा काय विकास करणार ?

श्रीरामपूर :- तालुक्याचे प्रश्न सोडवायला आमदार भाऊसाहेब कांबळेच हवेत, असे माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणताच कांबळे याना स्वतःच्या घरचा रस्ताही दुरूस्त करता आला नाही, अशी टीका अनिल कांबळे यांनी केली.  श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक उमेदवार भाऊसाहेब कांबळे हवेत, असे आवाहन मुरकुटे यांनी करताच स्वतःच्या घराकडे जाणारा गोंधवणी रस्तादेखील त्यांना गेल्या … Read more

आमदारांबाबत पोस्टवरून तरुणावर तलवारीने हल्ला !

नेवासे :- सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या विरोधी गटातील युवकावर तलवारीने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री सोनईजवळील शिंगवे तुकाई येथे घडली. युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सोमवारी सायंकाळपर्यंत कोणतीही फिर्याद दाखल झालेली नव्हती. ओंकार अरुण होंडे (४०, शिंगवे तुकाई) हा पांढरीपूल एमआयडीसीत नोकरीस आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त … Read more

श्रीरामपूर मतदार संघाचे भवितव्य शेतीवर अवलंबून- मुरकुटे

श्रीरामपूर – श्रीरामपूर मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी … Read more

महिला तलाठीच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव संगमनेर येथील गिरीश अशोक अभंग याने कोपरगाव येथे तलाठी असलेल्या पत्नीच्या बंगल्यावर १३ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृताची पत्नी सोनाली भीमराव विधाते (माहेरचे नाव) हिच्यासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  पत्नीच्या अनैतिक संबंधातून गिरीशने आत्महत्या केल्याची फिर्याद महेंद्र अशोक अभंग यांनी दिली. गिरीशचे सोनालीबरोबर … Read more

काँग्रेसचे लहू कानडे यांच्यावर मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नाराज !

श्रीरामपूर : लहू कानडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने शहरातील आंबेडकरी चळवळ तसेच मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी याबाबत आमदार सुधीर तांबे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच स्थानिक उमेदवार नसल्यामुळे व त्यांचा काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांशी कोणताही संपर्क नसल्याने काँग्रेस पक्षाला श्रीरामपूरची निवडणूक जड जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. भाऊसाहेब कांबळे यांचे शिक्षण जरी … Read more

श्रीरामपूरच्या विकासासाठी आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे!

श्रीरामपूर :- मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी … Read more

मोदी आणि अमित शहा झोपेतही माझे नाव घेत असतील…

कोपरगाव :- पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडून माझ्या नावाचा निष्कारण घोष चालू आहे. झोपेतसुद्धा ते माझेच नाव घेत असतील, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपरगाव येथील सभेत बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांची खिल्ली उडवली. राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पवार आले होते. हा तरुण या भागाच्या विकासासाठी झटत आहे. अशा तरुणांची … Read more

आघाडीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारातून आदिक गायब

श्रीरामपूर: तालुक्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले असून कोण कोणाच्या बाजूने हेच कळेनासे झाले.  त्यात नगराध्यक्षा अनुराधा आदिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी आघाडीच्या बाजूने समर्थन करतील म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांचा प्रचार करतील असे चित्र दिसत असतांना उमेदवार लहू कानडे यांच्या एकही प्रचार सभेला व बैठकीला नगराध्यक्षा अनुराधा आदिक व … Read more

कोल्हेंच्या विजयाची मशाल पुन्हा रिक्षावालेच पेटविणार

कोपरगाव : या पंचवार्षिकला पुन्हा एकदा आ. स्नेहलता कोल्हे यांना आपण निवडून देऊ. पुन्हा एकदा क्रांतीची मशाल आपल्या हाती येणार आहे. पुन्हा एकदा विजयाची क्रांती होणार असून, ही क्रांती गोरगरीब रिक्षावाले व सामान्य जनताच करू शकते, असा विश्वास रिक्षा संघटनेचे संस्थापक जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी शनिवारी (दि. १२) रिक्षा संघटना सदस्य व आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यातील … Read more

अखंड संगमनेर तालुक्याचा विकास करणार – ना. राधाकृष्ण विखे

संगमनेर : आजपर्यंत संगमनेर तालुक्याची विकासाची प्रक्रिया एका कुटुंबापुरती राबविली गेली. आपल्याला आता एका परिवाराचा नव्हे; तर अखंड तालुक्याचा विकास करायचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या निवडणूक प्रचारार्थ वडगावपान, सुकेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत विखे पाटील यांनी राज्य सरकारने केलेल्या … Read more

सेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत इनकमिंग

कोपरगाव : उच्चशिक्षित शांत, सरळ, संयमी व वेळप्रसंगी जनतेच्या हक्कासाठी पेटून उठणारे नेतृत्व आशुतोष काळे यांच्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठांपासून ते युवा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढले आहे. आशुतोष काळे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या न्यायहक्कासाठी पुकारलेला ऐतिहासिक संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपल्या न्यायहक्कासाठी उपोषणाला बसावे लागते. ही दुर्दैवाची … Read more