राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी १९ जणांची चौकशी तर १०५ जणांची बाकी

राहुरी: राहुरीत बुवासिंद बाबा तालीम परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १९ जणांची चौकशी पूर्ण झाली आहे. याशिवाय १०५ जणांची चौकशी करायची बाकी आहे. राहुरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण ठोस पुरावे हाती लागल्याशिवाय आरोपींवर कारवाई करणं शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी जर काही माहिती किंवा … Read more

शिर्डीतील गुन्हेगारीला मुळापासून उखडणार, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा ठाम निर्धार

शिर्डी: शिर्डीतील अतिक्रमणांवर मी ठाम भूमिका घेतली आहे आणि ती कदाचित काहींना टोकाची वाटेल. पण या अतिक्रमणांच्या आडून गुन्हेगारांना आश्रय मिळत असेल, त्यांना लपण्यासाठी जागा मिळत असेल, तर ही अतिक्रमणे हटवणं अत्यंत गरजेचं आहे. कितीही टीका झाली तरी माता, भगिनी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी हा कठोर निर्णय घ्यावाच लागेल, असं माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील … Read more

Vande Bharat Train पेक्षा हायटेक ट्रेनची ट्रायल रन सुरु ! ‘या’ मार्गावर धावणार ट्रेन

India Railway News

India Railway News : भारतात सुरुवातीला कोळशावर चालणारी रेल्वे धावली होती. यानंतर भारतीय रेल्वेमध्ये डिझेल इंजनाचा पर्याय आला. डिझेल इंजन नंतर रेल्वेमध्ये इलेक्ट्रिक रेल्वेचा पर्याय आला. अन आता हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुद्धा सुरु होणार आहे. देशात सध्या वंदे भारत ट्रेनची क्रेज आहे. पण वंदे भारत ट्रेन नंतर आता देशात हायड्रोजन ट्रेन धावताना दिसणार आहे. … Read more

भारतात आली पहिली Hydrogen Train ! तब्बल 110 किमी वेग, 2600 प्रवासी… ही ट्रेन ना पेट्रोलवर ना डिझेलवर, तर चालते ‘हायड्रोजन’वर !

India Hydrogen Train : भारतात पहिल्यांदाच हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनची चाचणी सुरू झाली असून, यामुळे पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं गेलं आहे. जिंद ते सोनीपत या हरियाणातील ८९ किमी मार्गावर ही ट्रेन सध्या चाचणीवर आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या ट्रेनचं उत्पादन करण्यात आलं आहे. भारताची पाचव्या देशाच्या यादीत एन्ट्री … Read more

Car Loan Tips : ही सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त कार लोन ! आताच पहा दहा लाखांच्या कारसाठी…

Car Loan Tips : स्वतःची कार घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, पण कार खरेदीसाठी लागणारी मोठी रक्कम सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असते. अशा परिस्थितीत कार लोन हा एक सोयीस्कर पर्याय ठरतो, जो तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी देतो. भारतात अनेक बँका वेगवेगळ्या व्याजदरांवर आणि अटींसह कार लोन देतात, पण तुमच्या बजेटला अनुकूल आणि कमी व्याजदराची बँक … Read more

Facts About Snakes : जगातील टॉप 10 विषारी सापांमध्ये भारताचा ‘हा’ साप ! एक दंश म्हणजे थेट मृत्यू

Facts About Snakes : भारतात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात, आणि त्यापैकी काही इतक्या विषारी आहेत की त्यांचा दंश म्हणजे मृत्यूला आमंत्रणच ठरतो. सामान्यपणे किंग कोबरा हा भारतातील सर्वात विषारी साप मानला जातो, पण याशिवायही काही प्रजाती आहेत ज्या नागापेक्षाही जास्त घातक आहेत. या सापांच्या दंशामुळे होणारा मृत्यूदर नागाच्या तुलनेत अधिक आहे. भारतात सापांच्या सुमारे ३५० … Read more

Indian Railway Rules : खरेदी केलेले तिकीट रद्द करता येते का ? संपूर्ण माहिती जाणून घ्या

Indian Railway Rules : आजच्या डिजिटल युगात बहुतांश कामे ऑनलाइन होत असली, तरी दररोज लाखो लोक रेल्वे काउंटरवरून तिकिटे खरेदी करतात. पण जर तुम्हाला अचानक प्रवास रद्द करावा लागला, तर एक प्रश्न मनात येतो – काउंटरवरून घेतलेले तिकीट ऑनलाइन रद्द करता येईल का? अनेकांना वाटते की त्यासाठी पुन्हा स्टेशनवर जावे लागेल, पण आता तसे नाही. … Read more

Ahilyanagar News : याला सोडू नका, मारून टाका..! माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना माराण्याचा कट पूर्वनियोजितच

Ahilyanagar News : आपल्यावर करण्यात आलेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. शिवाय आपण जखमी झालो तेव्हा हल्लेखोर हे याच्या डोक्यात मारा, आज सोडायचे नाही असे म्हणत होते. असे आपण ऐकल्याचे देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितल्याने ६ जणांसह ५-६ अनोळखी इसमांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सत्यजित चंद्रशेखर कदम … Read more

Ahilyanagar News : २५० एकरात ७०० तरुणांनी शोधले ! अखेर ‘त्या’ बेपत्ता महिलेचे गूढ उलगडले, धक्कादायक..

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील ३२ वर्षांची महिला बेपत्ता झाल्यानंतर तिला बिबट्याने ओढून नेले असावे अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. तिचा शोध जवळपास २०० एकरात घेतला गेला. परंतु आता ही महिला नेवासा येथील आपल्या नातेवाईका सोबत ‘मिस्टर इंडिया’ झाली होती अशी माहिती समोर आली आहे. राहुरी पोलिसांनी या महिलेचा शोध लावल्याने स्थानिक ग्रामस्थांसह वन … Read more

Ahilyanagar News : दुर्गम भागात पिकवली काळी मिरी ! बाराशे रुपये प्रतिकिलो भाव, अहिल्यानगरच्या शेतकऱ्याचा प्रयोग

अहिल्यानगरमधील शेतकरी हे नेहमीच विविध प्रयोग करत असतात. आता अकोले सारख्या दुर्गम भागात काळीमिरी पिकवण्याचाच प्रयोग येथील शेतकऱ्याने केलाय. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ तथा वनौषधी अभ्यासक सेवानिवृत्त प्राध्यापक रामलाल हासे यांनी अथक प्रयत्नातून आपल्या महाळदेवी येथील शेतावर काळी मिरीचे पीक यशस्वीरित्या घेतले आहे. पर्यावरणाचा गाढा अभ्यास असणारे रामलाल हासे यांना 2020 मध्ये कृषी विभागाचे तालुका कृषी … Read more

CSIR CRRI Bharti 2025: केंद्रीय रस्ते संशोधन संस्था अंतर्गत 209 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरीत अर्ज करा

CSIR CRRI BHARTI 2025

CSIR CRRI Bharti 2025: केंद्रीय रस्ते संशोधन संस्था अंतर्गत ज्युनिअर सेक्रेटरीअल असिस्टंट आणि ज्युनिअर स्टेनोग्राफर या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे या भरतीसाठी एकूण 209 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील या गावात होणार बॉम्ब शेल्सची निर्मिती ! 4500 कोटींचा प्रकल्प, 2000 तरुणांना मिळणार नोकरी

शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेला डिफेन्‍स क्‍लस्‍टरचा प्रकल्‍प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या आत्‍मनिर्भर भारत संकल्‍पनेचे प्रतिक आहे. ‘मेक ईन इंडिया’ च्‍या माध्‍यमातून संरक्षण सामुग्री देशातच निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने शेल फोर्जींगचा प्रकल्‍प महत्‍वपूर्ण ठरणार असून, जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक विकासाला मोठ्या संधी या माध्‍यमातून निर्माण होतील असा विश्‍वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. सावळीविहीर … Read more

भारतातील सर्वात श्रीमंत लोक कुठे रहातात ? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Richest States in India : भारतातील अब्जाधीशांची संख्या गेल्या १०-११ वर्षांत दुप्पट झाली असून, सध्या देशात सुमारे १९१ अब्जाधीश आहेत. यामुळे भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पण यापेक्षा आश्चर्यकारक बाब म्हणजे या १९१ अब्जाधीशांपैकी निम्म्याहून अधिक, म्हणजेच १०८ अब्जाधीश, एकाच राज्यात राहतात. ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर लाखो लोकांचे लक्ष या विषयाकडे वेधले गेले … Read more

FD गुंतवणुकीचा सर्वोत्तम काळ ! ‘ह्या’ बँकांमध्ये ठेवा पैसे आणि कमवा दोन लाख रुपयांचं व्याज जास्त

FD Investment : मित्रानो जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते, तेव्हा बहुतांश लोक बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) कडे वळतात. FD हा गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो, कारण यात गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते आणि त्यावर ठरलेला परतावा मिळतो. म्हणूनच, बरेच लोक आपल्या बचतीला वाढवण्यासाठी FD चा आधार घेतात. देशातील अनेक बँका आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या … Read more

Maharashtra School : एप्रिल महिन्यात सुद्धा शाळा असणार ? वाद पोहोचला थेट कोर्टात ! विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची अपडेट

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील शाळांच्या परीक्षा आणि शाळा सुरू ठेवण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) २ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत वार्षिक परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांना एप्रिल महिन्यापर्यंत सुरू ठेवाव्या लागणार आहेत. मात्र, या … Read more

New Rules : उद्या एक एप्रिल पासून बदलणार हे पाच नियम ! UPI ते Credit Card

नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे. या नव्या सुरुवातीबरोबरच अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवर होईल. UPI पेमेंट्सपासून ते बँकेतील किमान शिल्लक मर्यादेपर्यंत आणि क्रेडिट कार्डच्या नियमांपासून करमुक्त उत्पन्नापर्यंत, हे बदल तुमच्या खिशावर आणि नियोजनावर कसा परिणाम करू शकतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे … Read more

विजेच्या लपंडावाने सावेडी, केडगावातील नागरिक हैराण; जास्त वीज पुरवठा वाढल्यामुळे होतेय वीज खंडीत

अहिल्यानगर- गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. रोज तीन-चार वेळा वीज गायब होत असल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सावेडी आणि केडगावसारख्या मोठ्या उपनगरांमध्ये हा प्रकार अधिकच तीव्र झाला आहे. वाढत्या उष्म्यासोबतच विजेची ही अनियमितता नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे. सावेडीत आणि केडगावात दररोज दोन-तीन वेळा … Read more

सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

शिर्डी – राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना सुरूच राहतील आणि कोणतीही जनहिताची योजना बंद केली जाणार नाही, असा स्पष्ट दिलासा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. शेतकरी कर्जमाफीचा विषय महायुतीच्या जाहीरनाम्यात असल्याने त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुढीपाडवा आणि नवसंवत्सरच्या मुहूर्तावर लोणी बुद्रुक येथील श्री मारुती मंदिरात पारंपरिक ग्रामसभा पार पडली. … Read more