राज ठाकरे म्हणाले आपल्या रामाचा वनवास संपला…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राम मंदिरा व बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज या मंगलप्रसंगी बाळासाहेब असते तर त्यांना मनापासून आनंद झाला असता, असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. #राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya pic.twitter.com/cyIJgn3WfT — Raj Thackeray (@RajThackeray) August 4, … Read more

अतिवृष्टीमुळे ‘हे’ पीक आलं धोक्यात

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मुगाची विक्रमी पेरणी केली. मुगाची उगवण देखील चांगल्याप्रकारे झाली, मात्र सतत व अवेळी झालेल्या पावसामुळे या पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मुगाचे पीक धोक्यात आले आहे. कृषी विभागामार्फ़त खरीप हंगामातील पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्‍यांनी … Read more

अकरावीचे प्रवेश उद्यापासून होणार सुरु असे आहे वेळापत्रक

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद असल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडला होता. काहीदिवसापूर्वीच निकाल जाहीर झाल्याने उद्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.  राज्य सरकारच्या आदेशानूसार जिल्ह्यात शहरी भागात ऑनलाईन तर ग्रामीण भागात सुविधा नसल्यास ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक … Read more

महाविकास आघाडी सरकारला प्रभु श्रीराम मंदीर भूमिपुजनाचा आनंदोत्सव मान्य नाही ?

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या (दि.५) मनसेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इच्छेनुसार फटाके वाजवून धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केलेले असतांना  पोलिस प्रशासनाकडुन मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे व जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांना नोटिस बजावण्यात आली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४६३ रुग्ण वाढले , वाचा गेल्या चोवीस तासातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४, अँटीजेन चाचणीत २९६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १२३ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३५९ इतकी झाली आहे. … Read more

नशिबी मुलगा नसल्याने आठ लेकीनेच पित्याला दिला अग्नीमुख !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-मुळचे तालुका अकोले, कळस येथिल रहिवासी असलेले तीस ते पस्तीस वर्षेपासून सध्या वास्तव्यास राहणार्‍या श्रीरामपूर तालूका बेलापूर (सुभाषवाडी,ऐनतपूर) येथिल रहिवाशी गणपत धोंडीबा वाघमारे (वय६८) यांचे नुकतेच अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांना श्रीरामपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांची रूग्णालयात उपचार सुरू असतानाच दु:खद निधन झाले.यांच्या पश्चात … Read more

नामदार शंकराव गडाख पोहोचले कोविड सेंटरमध्ये !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी नेवासा येथील कोविड केअर सेंटरला आज नामदार शंकरराव गडाख यांनी भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील करोना बाधित रुग्णांच्या संदर्भात व करोनाच्या बाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. नेवासा … Read more

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची बातमी,१० ऑगस्टपर्यंत करून घ्या हे काम…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 3 हजार ६०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असुन त्यांनी ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन दिनांक १० ऑगस्ट,२०२० पर्यंत  करावे आणि या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर यांनी केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती … Read more

जिल्ह्यातील सर्व खासगी अतिदक्षता रुग्णालय शासनाने ताब्यात घेऊ मोफत उपचार करावे

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- बुथ हॉस्पिटल सारख्या ठिकाणी रुग्ण मोफत बरे होऊ शकतात. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये या कोरोसाठी इतकी मोठी रक्कम मोजायची गरज आहे का? की अशी शंका एम.आय.एम. जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी उपस्थित करत. शासनाने जर हे सर्व खासगी अतिदक्षता रुग्णालय ताब्यात घेऊन जर सामान्य जनतेला पूर्ण मोफत उपचार केलेतर … Read more

कुलगुरू सरकारला आणि विद्यार्थ्यांना फसवत आहेत

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांचे आरोग्यहित पाहत परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. याचे विद्यार्थी व पालकांनी स्वागतच केले.सोबतच सर्व महाराष्ट्रभर असे पसरले की सर्वच विद्यार्थ्यांना सरसकटपणे पास केले जाणार आहे;परंतु वस्तूस्थिती अशी नसून विद्यापीठांनी ए बी फॉर्मुल्यावदारे पासिंग क्रायटेरिया ठरवला आहे आणि तोच अत्यंत चुकीचा आहे असा दावा … Read more

पारनेरचे जावई झाले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा,) व पारनेर तालुक्याचे जावई आणि सध्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले सुनील गव्हाणे यांची निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनील गव्हाणे यांनी पक्षासाठी दिवसरात्र काम केले. या कामाची … Read more

कोरोना पॉझिटिव्हकडून लपवालपवी; प्रशासन हतबल 

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जामखेड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कातील संपर्कातील व्यक्तीची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे प्रशासनाला अशा व्यक्तींना क्वाॅरंटाइन करण्यात अडचण निर्माण होत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. काेरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जामखेड तालुक्यातही काही … Read more

‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. ‘ कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प … Read more

कोरोनाग्रस्त गावात प्रशासनाचे दुर्लक्ष, आणि देशभक्त जवान मदतीसाठी ग्राउंडवर !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  सध्या महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यावर अनेक उपाययोजना प्रशासन राबवत आहे. परंतु तरीही संक्रमणाचे प्रमाण जास्तच वाढत चालले आहे.मुंबई , पुणे या ग्लोबल सिटी मध्ये तर रुग्णसंख्या खूपच वाढली आहे.  त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाने आपला फास आवळायला सुरवात केली आहे.जिल्ह्यात कोरोनाची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. या … Read more

‘निसर्ग’चा नगरच्या पर्जन्यमानावर झालाय परिणाम ??

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  कोरोना सोबतच निसर्ग चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रात येऊन गेले. हे वादळ कोकणातून नाशिक, नगर व उत्तर महाराष्ट्रातून गेले. कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने मोठे नुकसान केले. तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातही या निसर्ग चक्रीवादळाने नुकसान केले होते. याचा परिणाम आता थेट पर्जन्यमानावर आणि पर्यायाने धरण भरण्यावर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये … Read more

‘नगर’ शहरातून भाजपचा आमदार निवडून द्यायचाय; विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीची तयारी करा

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तसे मोठे आहे. राज्यातील निवडक जिल्हे असे आहेत कि जेथे सत्ता असावी असे प्रत्येक पक्षाची इच्छा असते. यापैकीच एक म्हणजे अहमदनगर जिल्हा. जिल्ह्यातील नगर शहरावर अनेक पक्षांचा राजकीय डोळा असतो. आता भाजपनेही असाच एक आशावाद व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. … Read more

ओढे-नाले झाले गायब,उभ्या पिकांमध्ये पाणी घुसून पिकांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  राहुरी तालुक्यात पावसाचे पाणी वाहून जाण्याची ओढ्याची नैसर्गिक प्रक्रिया थंडावल्याने हे पाणी शेतातील उभ्या पिकांबरोबरच घरात घुसल्याने पिंपळाचा मळा, राहुरी काॅलेज परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवडेभरापासून राहुरीत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. राहुरी नगर परिषद कार्यक्षेत्रातील पिंपळाचा मळा परिसरात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ पोलिसांना झाला कोरोना, वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून जिल्ह्यातील तीन हजार पोलीस जिल्हाभरात बंदोबस्तावर आहेत. दिवस-रात्र रस्त्यावर असलेल्या पोलिसांचा थेट जनतेशी संपर्क आल्याने जिल्हा पोलीस दलात कोरोनाची लागण झाली आहे.यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा पोलीस दलाने दक्षता घेतल्यामुळे मार्च, … Read more