कारखान्याच्या हलगर्जीपणाने ३३ संस्था सदस्य ठरले अक्रियाशील

श्रीगोंदे:  नागवडे सहकारी साखर कारखान्याने सहकार कायद्याच्या कलम २६ (२)( ब ) नुसार दरवर्षी वित्तीय वर्षे संपताना ४३ संस्था सदस्यांचे क्रियाशील आणि अक्रियाशील असे वर्गीकरण करून, त्याला संचालक मंडळाची ठरावाद्वारे मान्यता घ्यावयास हवी होती.  त्यानंतर ३० एप्रिल अखेर अक्रियाशील संस्था सदस्यांना विहित पध्दतीने ( पोच घेऊन) नमुना डब्ल्यू नुसार कळवावयास हवे होते व तरतुदीतील निकषांची … Read more

एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला

राहुरी : शहरातील  नगर-मनमाड मार्गावरील राहुरीच्या बसस्थानकासमोरील काॅम्प्ल्केसमधील स्टेट बँक शाखेचे एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. पोलिस आल्याचा सुगावा लागताच टोळीतील ५ चोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. पळून जाणाऱ्यांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बसस्थानकासमोरील गाळ्यात असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. पाच चोरांच्या टोळीने एटीएम केबीनमध्ये प्रवेश करून … Read more

उच्चभ्रू वसाहतीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

औरंगाबाद : बीड बायपासवरील एकाच उच्चभ्रू वसाहतीमध्ये काही मीटर अंतरावरच दोन बंगल्यांमध्ये दोन हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री समोर आला. गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी दोन्ही ठिकाणी डमी ग्राहकाच्या मदतीने छापा टाकल्यानंतर या परराज्यातील तरुणींचा सहभाग असलेल्या उच्चभ्रू रॅकेटचा पर्दाफाश झाला. गुन्हे शाखेेने शनिवारी तब्बल सहा तास ही कारवाई केली. संजय त्र्यंबक … Read more

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून अद्यापही एकमत झाले नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथविधी झालेल्या सहा मंत्र्यांकडे खात्यांचा तात्पुरता कार्यभार सोपवून सरकारचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर करावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका असली तरी शिवसेना आणि काँग्रेस मात्र अधिवेशनापूर्वीच विस्तार करण्यासाठी आग्रही आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन … Read more

उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक: खा. सुजय विखे पाटील

नगर : शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी मािहती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खासदार डाॅ. सुजय विखे यांनी नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते … Read more

प्लास्टिक उत्पादनावर निर्बंधासाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार : आमदार जगताप

नगर : शासनाच्या धोरणानुसार प्लास्टिक बंदी कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर संबंधितांवर कारवाई होत आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने ५० मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या वस्तू असूनही त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळे आपण संबंधित पथकाला खातरजमा करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच दंडात्मक रकमेबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले … Read more

वाडिया पार्कमधील अनधिकृत इमारतीवर कारवाई 

अहमदनगर : शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या इमारतीवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार ही इमारत जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत आहे. मोठी इमारत पाडल्यामुळे शहरातील अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत. मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी काहींनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे धाव घेतली … Read more

नापिकी, दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड: सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती, परतीच्या पावसामुळे पाण्याखाली गेलेली पिकं यामुळे अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली असलेल्या तालुक्यातील सरदवाडी येथील अप्पासाहेब रावसाहेब गंभिरे (वय ४८) या शेतकऱ्याने कुसडगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुळे परिसरात शोककळा पसरली. अप्पासाहेब गंभिरे हे गुरुवारी जामखेडवरून सरदवाडी येथे दुपारी घरी गेले होते. आपला मोबाइल घराबाहेर ठेवला … Read more

राम शिंदेंनी बांधली विखेंच्या विरोधात माजी आमदारांची मोट ?

नगर: अहमदनगर जिल्हा  भाजपमध्ये आता पर्यंत गांधी – आगरकर दोन गट असल्याची चर्चा होती. पण आता  माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिसरा गट भाजपमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच भाजपची  बैठक माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून शिंदे यांनी विखे यांच्याविरोधात नाराजांची मोट बांधल्याची … Read more

बापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता पण ते गेल्यानंतर नागवडे कारखान्याची वाईट अवस्था

श्रीगोंदे: शिवाजीराव नागवडे यांनी सहकार चळवळ उभी करून कारखान्याची उभारणी केली. तळागाळातील शेतकऱ्यांनी पैसे दिले. बापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता ,पण बापू गेल्यानंतर कारखान्याची वाईट अवस्था झाली असून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हुकूमशाही सुरू केली असून कारखान्याच्या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवून सुडाचे राजकारण करत आहेत, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब … Read more

भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाहीवर घाला

संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार घटनेच्या तत्त्वावरील असून सामान्य माणसाच्या विकासाचे आहे, तर भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मंत्री झाल्यानंतर प्रथमच शुक्रवारी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन यशोधन इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. मंत्री थोरात म्हणाले, भाजपचा कारभार म्हणजे राजकारणातला … Read more

बाळासाहेब थोरात यांच्याकडून दादापाटील शेळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

नगर : राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांच्या खारे कर्जुने (ता. नगर) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी शुक्रवारी दुपारी शेळके कुटुंबीयांची भेट घेतली. दादापाटील शेळके हे शेतीनिष्ठ असे व्यक्तिमत्त्व होते. कृषी, … Read more

१३ वर्षीय मुलीचे अपहरण करून डांबून ठेवत बलात्कार

जालना: जालना येथील १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला सेनगाव येथे डांबून ठेवण्यात आले. नंतर तिच्यावर सतत बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २३ दिवसांनंतर पोलिसांनी या मुलीची सुटका केली. तीन आरोपींना अटक केली असून यात दोन महिलांचा समावेश आहे. या मुलीची विक्री करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली … Read more

विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी ; एक बेशुद्ध

राजुरी : प्रवरा परिसरातील एका शाळेत गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शाळा भरण्याच्या वेळेस मुलांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. यामध्ये एक विद्यार्थी बेशुद्ध पडला असून याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. प्रवरानगर येथील एका शाळेत गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शाळा भरण्याच्या अगोदर शाळेतील मुलांमध्ये चांगल्याच हाणामारी झाल्या असून यामध्ये मारहाण झालेला मुलगा बेशुद्धावस्थेत पडला … Read more

शेतीच्या बांधावरून लाकडी दांड्याने आणि कुन्हाडीने मारहाण

शिर्डी :  कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात राहणाऱ्या शेतकरी महिला मिराबाई उत्तम देवकर यांच्या शेताच्या सामाईक बांधावर शेजारील आरोपींनी बांधावरील शेत नांगरताना मोडल्याने मिराबाई देवकर या आरोपींना समजावून सांगत असताना त्यांना पाच आरोपींनी लाकडी दांड्याने व कुन्हाडीने मारहाण केली. मुलगा सोमनाथ उत्तम देवकर हा सोडविण्यासाठी आला असता त्याला पण बेदम मारहाण केली. मिराबाई उत्तम देवकर या … Read more

एन्काउंटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

हैदराबाद – हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी चकमकीत ठार केले. एकीकडे पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असताना, पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटाविरोधात शनिवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटेच पोलिस चारही आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते. … Read more

विखे पाटील म्हणाले, आम्ही फार काळ विरोधी बाकांवर बसणार नाही

जळगाव:  भाजपाच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीसाठी जळगावमध्ये आलेले माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जनतेचा कौल आमच्या बाजूनेच आहे. त्यामुळे फार काळ विरोधात बसावे लागणार नसल्याचे सांगून राज्यात पुन्हा एकदा सत्तापालटाचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत अर्धा वाटा या प्रमुख दोन मुद्यांवरून शिवसेना या पक्षाने भाजपाशी असलेली युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी … Read more

नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर : मायबाप सरकार . आमचं काही चुकतं का? नाही तर आम्हाला मरू द्यावाट पाहून पाहून आमची सहनशीलता आता संपुन गेली तुम्ही काही दाद देत नाही, मग आम्हाला तुमच्या दारातच मरु द्या. अशी आर्त हाक कामरगाव येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथे एप्रिल ते ऑक्टोबर२०१७ या काळात अवकाळी व अतिवृष्टीमुळे १०१ शेतकऱ्यांच्या … Read more