…आता डास चावला तरी डेंग्यू, मलेरिया होणार नाही !

डासांमुळे फैलाव होणाऱ्या मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांनी हैराण असलेल्या भारतासह जगातील अनेक देशांसाठी एक खूशखबर आहे.  मेलबर्न आणि ग्लासगो विद्यापीठांतील शास्त्रज्ञांनी हल्लीच एक अनोखे तंत्रज्ञान विकसित केले असून ते डासांना न मारताच त्यांच्यात अस्तित्वात असलेला डेंग्यूचा व्हायरस पसरू देणार नाही. एवढेच नाही तर झिका व्हायरसवरही हे तंत्रज्ञान सारखेच प्रभावी आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जगभरात डेंग्यूच्या … Read more

मुलीच्या जन्माने पित्याचे आयुष्य वाढते !

लंडन : आईवडिलांच्या आयुष्यात आनंद भरण्यासोबतच मुली वडिलांच्या आयुष्याची काही वर्षेही वाढवतात. पोलंडच्या जेगीलोनियन यूनिव्हर्सिटीच्या अध्ययनात हा दावा करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, मुलीचा पिता ज्या पुरुषांना मुलगी नसते, त्यांच्या तुलनेत जास्त आयुष्य जगतात. मुलगा झाल्याचा पुरुषाच्या प्रकृतीवर किंवा वयावर कोणताही फरक पडत नाही, पण मुलगी झाल्यानंतर पित्याचे आयुष्य ७४ आठवड्यांनी वाढते. पित्याला जेवढ्या जास्त … Read more

शास्त्रज्ञांनी बनविली मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी लाभदायक साखर, जाणून घ्या…

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी बॅक्टेरियाच्या मदतीने फळे आणि दुग्धोत्पादनांपासून नव्या पद्धतीने साखर तयार केली असून तिच्यात सामान्य साखरेच्या तुलनेत अवघ्या ३८ टक्के कॅलरी आहेत. या साखरेला ‘टॅगाटोज’ असे म्हटले जाते. अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, आतापर्यंत या साखरेमुळे होणारा कोणत्याही प्रकारचा दुष्प्रभाव समोर आलेले नाही. टॅगाटोजला अमेरिकेच्या खाद्यान्न नियंत्रक एफडीएची मान्यता मिळाली आहे. कॅलरी कमी … Read more

LIVE UPDATES: शपथविधीची जय्यत तयारी

    महाविकास आघाडीचे विधीमंडळ नेते म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा हा शपथविधी खूपच खास समजला जात आहे. कारण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला बाजूला सारुन शिवसेनेने सत्तास्थापन केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा शपथविधी हा शिवाजी पार्कवर घेण्यात येणार आहे. यासाठी देशातील अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रण देण्यात आली … Read more

घडले असे काही की, सहा फेऱ्यानंतर वधू जागेवरच थांबली, म्हणाली…

उत्तर प्रदेश/ कानपूर –  येथील  एका लग्न सोहळ्यात एक विचित्र घटना घडली. लग्न चालू असतानाच नवरी ने लग्न करण्यास नकार दिला आणि यामुळे सर्वत्र शांतता पसरली.  नवरीने असे करण्याचे कारण म्हणजे तिचा होणारा पती. झाले असे कि लग्नात सप्तपदी चालू असताना सहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर नवरीला नवरदेवाच्या तोंडातून दारूचा वास येऊ लागला. तोंडातून येणारा दारूचा वास … Read more

भयानक घटना – अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नी, आई, आणि 3 चिमुकल्यांचेही गळे चिरले!

झारखंड- झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्यात मनाला हादरा बसवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका इसमाने आपल्या गर्भवती पत्नीसमवेत 3 तीन लहान मुलांची हत्या केली आहे.  या भयानक घटनेत एक सात वर्षीय भाची गंभीररीत्या जखमी झाली आहे मृतांमध्ये पत्नी, आई आणि तीन मुलांचा समावेश आहे.सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली. सध्या पोलिसांनी आरोपी गंगादास … Read more

गुप्तांग कापून निर्दयी खून प्रकरणी ३ तृतीयपंथी गजाआड

पंढरपूर : पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण भागातील एका व्यक्तीचा डोक्यात चेहऱ्यावर, पोटावर दगड आणि काचेच्या फुटलेल्या बाटलीने मारून हा निर्दयीपणे खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच मयताचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत असल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. ही धक्कादायक घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली होती. खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी या भागात अखेर यश आले … Read more

जामखेड मध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड :- रस्त्याच्या कारणावरून तालुक्यातील भवरवाडी येथे दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत बाराजण जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या वेळी दोन्ही गटांकडून दगड व काठयांचा सर्रास वापर करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या ते दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गटांतील दहा जणांना पोलिसांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळूतस्करांकडून तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

पारनेर :- पारनेरच्या तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी अवैध वाळूच्या वाहनाचा पाठलाग केल्याने वाळूतस्करांनी त्यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार- पारनेरच्या तहसीलदार ज्योती रामदास देवरे या दि.२५ नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ढवळपुरी शिवारात गस्तीसाठी गेल्या होत्या. या वेळी तहसीलदार ज्योती … Read more

breaking news – अजित पवारच उपमुख्यमंत्रिपदाचे दावेदार, पण…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चारच दिवसांपूर्वी बंड करून भाजपला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण काही तासातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचं बंड मोडून काढल्याने उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी फडणवीस सरकार पाडलं होतं. या बंडामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीने गटनेतेपदावरुन हकालपट्टीही केली होती. आणि त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत … Read more

अखेर फडणवीसांच ‘वर्षा’वरचं बिऱ्हाड हलवलं…!

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हे पद घेतलं नव्हतं. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा मोडून एक नवा इतिहास रचला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्र्यांना आपले बंगले रिकामे करावे लागले होते. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरेंचा अत्यंत मोठा निर्णय

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजता  राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.  याचसोबत ते एक नवा इतिहास घडवण्याच्या अवघ्या काही तास दूर आहेत. कारण आजवर ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हे पद घेतलं नव्हतं. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा मोडून एक नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे … Read more

अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल !

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत असलेल्या साशंकतेमुळे अजितदादा नाराज आहेत असे तर्क लावले जात आहे. अखेर सुप्रिया सुळे यांनी फोन करुन अजित पवारांशी बातचित केली. अजितदादा सिल्व्हर ओकवर आल्यानंतर आम्ही पाच वाजता एकत्रच शपथविधीला येऊ, असं सुळेंनी सांगितलं. परंतु अजित पवारांच्या मनात नेमकं … Read more

संशय घेऊन खून; पतीला जन्मठेप

पुणे :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विनोद नवबहादूर भंडारी (३४, रा. गोऱ्हे बुद्रुक, हवेली, पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने आपली पत्नी तलाशी विनोद भंडारी (२५) हिचा खून केला होता. याप्ररकणी बाळासाहेब नामदेव जावळकर यांनी … Read more

चिंता मिटली,जिल्ह्यातील धरणांत आहे इतका जलसाठा !

अहमदनगर :- दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला कमी प्रमाणात पाऊस होतो. मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र सुरुवातीला चांगला पाऊस होतो. ऑगस्टच्या मध्यात ही धरणे जवळपास भरत येतात. परंतु, यंदा परतीच्या पावसामुळे व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सध्या साठ्याची स्थिती चांगली आहे. यंदा नोव्हेंबर महिना संपत आला असला, तरी … Read more

सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो

कोपरगाव ;- आमदार म्हणून शपथ घेताना जबाबदारीची जाणीव मला झाली, असे आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या विधानभवनात यशवंतराव चव्हाण, शंकरराव काळे, शरद पवार अशा मातब्बर नेत्यांनी शपथ घेतली, तेथे शपथ घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. विधानभवनात जाण्याची माझी पहिली वेळ नाही, पण कोपरगाव मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी विधान भवनाच्या परिसरात … Read more

देवेंद्र फडणवीसांचे मोठे नुकसान झाले !

मुंबई :- भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. भाजप आता विरोधी बाकावर बसणार असल्याचे निश्चित झाले आहे आणि राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपने अगदी शेवटपर्यंत अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाविकास आघाडीची घडी एवढी … Read more

आणि अजितदादा बोलले…’झालं ते झालं, आता नव्याने सुरुवात करायचीय !

मुंबई :- बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झालेले राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे पुन्हा मूळ पक्षात बुधवारी सक्रिय झाले आहेत.  यशवंतराव चव्हाण सेंटरमधील पक्षाच्या बैठकीत अजितदादांनी केवळ हजेरीच लावली नाही तर नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शनही केले. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडासंदर्भात शंका व्यक्त केली गेली नसेल तर नवलच  राष्ट्रवादीतील आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा अजित पवार यांना विश्वास … Read more