भिंगारचे सर्व प्रश्न सोडवले जातील – डॉ. नीलम गोऱ्हे

नगर – राज्यभरातील अनेक छावण्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात मी विधानसभेत आवाज उठवला. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचेही ठरले होते. भिंगार येथील नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी दिले. शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भिंगारमध्ये झालेल्या प्रचारसभेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, अंबादास पंधाडे, जिल्हा महिला … Read more

आयशरला धडकल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

संगमनेर –  नाशिक-पुणे मार्गावरुन पुण्याच्या दिशेने मोटारसायकलीवर जाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी पुढे असलेल्या आयशरवर पाठीमागून धडकला.  आयशरला पाठीमागून धडकल्यानंतर रस्त्याच्या कडेला दुभाजकावर डोके आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  संगमनेरनजीक साकूरफाटा येथे मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला. सुदीप मिरासे (वय २२, वसमत, जि. नांदेड) असे मृत युवकाचे नाव आहे.  तो बीएचएमसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत … Read more

‘या’ कारणामुळे सभापती राहुल झावरे यांनी दिला राजीनामा !

पारनेर :- आमदार विजय औटी यांच्याकडून माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा इतिहास पुसला जात असल्याचे सांगत पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे खळबळ उडाली. पत्रकार परिषदेत झावरे यांनी जि. प. अध्यक्ष शालिनी विखे यांना दिलेल्या राजीनाम्याची प्रत दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नंदकुमार झावरे यांचा अनुल्लेख … Read more

जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले

निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य … Read more

धनगर आरक्षणासाठी राम शिंदे कधीच भांडले नाहीत…

जामखेड – सामान्य जनतेच्या मागणीवरून शरद पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा बदलू शकणारा तगडा उमेदवार दिला आहे. तुम्ही रोहित पवार यांना एकदा संधी देऊन पहा, पुन्हा तुम्ही त्यांना आयुष्यभर सोडणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने नान्नज येथे सोमवारी झालेल्या सभेत … Read more

राहुरीच्या भाजप उमेदवारामुळे जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त

राहुरी – स्वातंत्र्य चळवळीत नगर जिल्ह्याच्या कामगिरीचा मोठा उल्लेख आहे. नव्हेतर राज्य कसे चालवायचे याची दिशा राहुरीतून ठरवली जायची. मात्र आज अनेकांना त्रास देणाऱ्या तसेच अनेक गुन्हे असलेल्या येथील भाजपा उमेदवाराकडे पाहिले तर जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त होत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ. कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत केली. नव्हेतर राजकारणातील गुन्हेगारी … Read more

श्रीरामपुरात उंदिर उड्या, सभेला विखेंच्या; कार्यालयात ससाणेंच्या

श्रीरामपूर  – श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टण्यात आला असून श्रीरामपुरात दोन्ही उमेदवारांकडे असणारे कार्यकर्ते हे ना. विखे यांना मानणारे आहे. ‘नेता एक, कार्यकर्ता अनेक’ अशी परिस्थिती श्रीरामपूरची झाल्याने या ठिकाणी आता निवडणकीत’उंदिर उड्या’ पहायला मिळत आहेत. परवाच भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ असलेल्या तालुक्यातील विखे यांच्या एका सभेत एका मोठ्या नेत्याने हजेरी लावली. हा नेता … Read more

कांबळेंच्या प्रचारात खा. लोखंडे सक्रीय

कोल्हार खुर्द – कोल्हार,  चिंचोली, आंबी, पिंपळगाव फुनगी येथे श्रीरामपूर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना व महायुतीचे अधिकत उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकत्यांशीसंवाद साधला. आज या सभांना शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी हजेरी लावली. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. चंद्रशेखर कदम, … Read more

श्रीरामपूर मतदार संघात विकासाचे नवे पर्व सुरु होण्यासाठी आ.कांबळे यांना विजयी करा !

श्रीरामपूर  ;- जोपर्यंत प्रवरा नदीकाठ ते राहुरी फॅक्टरी पर्यंतच्या भागातील शेती समृद्ध होती तोवर राहुरी तालुका आणि राहुरी कारखाना प्रगतीच्या वाटेवर होता. मात्र आपला भाग सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावला तशी आपल्या भागाची दुर्दशा झाली. ऊसाची शेती गेली. त्याचबरोबर समृद्धी गेली. एकेकाळचे बागायतदार शेतकर्‍यांवर जिरायतदार शेतकरी बनण्याची वेळ आली. हे चित्र पालटायचे या निर्धारानेच मी … Read more

कानडे फक्त निवडणूकीपुरते श्रीरामपूर मधे येतात

श्रीरामपूर ;- काँग्रेस पक्षाचे उमेदवार लहु कानडे हे फक्त निवडणूकीपुरते श्रीरामपूर मधे येतात व निवडणूक संपली की गायब होतात. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्याचे व जनतेचे प्रपंच टिकवायचे असेल तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन मा. आ. भानुदास मुरकुटे यांनी खोकर येथे काल सायंकाळी पार पडलेल्या प्रचार सभेत बोलताना केले. … Read more

विखे – मुरकुटे यांच्या एकत्र येण्यानं कांबळे यांचे पारडे जड !

श्रीरामपूरचे आ. भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे काही नेते आणि माजी आमदार जयंत ससाणे यांचा गट दुखावला. त्याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता होती. कांबळे एकदम एकाकी पडल्यासारखी स्थिती होती. अशा वेळी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सूत्रे हाती घेतली. विखे पाटील यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी अगोदर दूर करण्यात … Read more

ऊस तोडणी मजुराचा मुलगा चीनला !

अहमदनगर ;- लहानपनापासूनच आश्रमशाळेत वाढल्याने तसा त्याचा घरचा पत्ता नाही. नाही म्हणून दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मातेगाव या गावाजवळील एका तांड्यावर झोपडीवजा घर आहे. हाच काय तो सांगायला पत्ता. आई- वडील दोघेही आपलं बिर्‍हाड पाठीवर घेऊन वर्षातील सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ भटकंती करत ऊसतोड करतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ऊसाच्या फडात … Read more

स्थानिक माणूसच श्रीरामपूरचे प्रश्न सोडवू शकतो – भानुदास मुरकुटे

श्रीरामपूर :- भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल, त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या असे आवाहन मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी प्रचारादरम्यान केले. मतदार संघातील चांदेगाव, ब्राह्मणगाव भांड, करंजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, मुसळवाडी, बेलापूर खु., पढेगाव, निपाणीवडगाव येथील प्रचारसभांमध्ये मुरकुटे बोलत होते, सण १९९९ ते २००९ या दहा वर्षात … Read more

‘मी राहुरीकर, राहुरीचा आमदार कर’ च्या चर्चेने तालुका ढवळतोय

राहुरी  – तब्बल १० वर्ष राहुरी तालुक्यावर आमदार म्हणून अधिराज्य गाजवत असलेले आ. शिवाजीराव कर्डिले यांना राहुरी तालुक्याच्या गटा – तटाचा अंदाज आहे. राहुरी तालुक्याची जनता कुठे जावू शकत नाही, असे समजून यंदाच्या निवडणुकीत त्यांनी राहुरी तालुक्यातील मतदारांना ‘गृहीत’ धरल्याचे दिसत आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान दुखावल्याने नाराजीचा सूर दिसत असून ‘मी राहुरीकर’ राहुरीचा … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला !

श्रीरामपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मागील सरकारने उपाययोजना केल्या नाहीत.अशी टीका खा.इम्तीयाज जलील यांनी श्रीरामपूरमध्ये बोलताना केली. विधानसभा निवडणुकीतील एमआयएमचे उमेदवार सुरेश जगधने यांच्या प्रचार सभेत खासदार जलील बोलत होते.  विविध पक्षांमध्ये होणारे नेत्यांचे पक्षांतर खपवून घेतले जाते. मात्र एमआयएम पक्षाची मत कापणारे म्हणत बदनामी … Read more

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर निवडणूक -मा. मंत्री बबनराव पाचपुते

श्रीगोदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारात जनतेने आघाडी घेतली आहे, आज आठवडे बाजार च्या दिवशी पाचपुते यांनी प्रचार केला यावेळी बाजारकरूं शेतकऱ्यांशी पाचपुते यांनी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे काही दिवस उरले असताना प्रचारात दिवसेंदिवस रंगत वाढू लागली महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी सोमवार चा आठवडे बाजार असल्यामुळे … Read more

ना. विखेंना जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची सजावट

शिर्डी  – राहाता तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची साईबाबांच्या मंदिरात सजावट करण्याचा संकल्प साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजराव कोते यांनी केला आहे. यावेळी त्यांच्या साईनिर्माण उदयोग समुहाच्या वतीने अध्यक्ष विजयराव कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा यांनी सत्कार केला. यावेळी शिडींचे प्रथम नगराध्यक्ष केलासबापु कोते, सामाजिक कार्यकर्ते नितिन उत्तमराव … Read more

आदिवासी आरक्षणाला धोका नाही – वैभव पिचड

राजूर : आदिवासी आरक्षणाला कोणताही धोका होणार नाही. हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने व रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठीच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याचे अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगून त्यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे. राजूर येथील प्रचारसभेत आ. पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपाइं नेते भाई पवार होते. यावेळी … Read more