सुजय विखेंच्या प्रवेशाने खासदार दिलीप गांधी अस्वस्थ !

अहमदनगर :- डॉ सुजय विखे यांचे संभाव्य भाजप प्रवेशाने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला असतानाच , खासदार दिलीप गांधी हे दिल्लीत तळ ठोकून होते त्यांनतर आता ते मुंबईत आले आहेत.   येत्या दोन दिवसांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिलं यादी जाहीर होणार आहे. या यादीत आपल्या नावाच्या समावेशासाठी खा . गांधी हे दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत … Read more

राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्षनेते पद सोडणार?

अहमदनगर :- सूजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता असताना पक्ष आपल्यासाठी एक जागा मिळवू शकत नसेल तर अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढील भुमिका ठरवावी लागेल, असा इशारा ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाला दिला आहे.  डॉ.सुजय यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चुकीचे चित्र मतदारांसमोर जाईल. त्यामुळे … Read more

विरोधीपक्षनेत्यांचे चिरंजीव आज होणार ‘भाजपवासी’ !

अहमदनगर :- राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्‍चित झाला आहे.  आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास डॉ. सुजय हे त्यांच्या निवडक समर्थकांसह भाजपाच्या मंत्रालयाजवळील कार्यालयात पक्ष प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदी मान्यवर त्यांचे पक्षात स्वागत करतील. या सोहळ्यास विखे यांचे निवडक … Read more

सुजय विखे भाजपमध्ये गेल्याने काहीही फरक पडणार नाही – शरद पवार.

अहमदनगर :- लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. डॉ. सुजय विखे यांचे आघाडीत काहीही योगदान नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्याने काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले. पूर्वी गाजलेल्या एका निवडणुकीचे उदाहरण देऊन विखेंचा पराभव होऊ शकतो हे सांगताना त्यातून उदभवलेल्या खटल्याची आठवणही पवारांनी सांगितली. पुण्यातील … Read more

पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ !

अहमदनगर :- डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ राधाकृष्ण विखे पाटलांवर येवू शकते.  ‘काहीही झाले तर मी निवडणूक लढवणारच. कोणताही पक्ष मिळाला नाही तर अपक्ष म्हणून उभा राहणार,’ असा हट्‌ट सुजय विखे यांनी कायम ठेवला असल्याने राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी झाली होती. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडावी … Read more

…म्हणून गेले सुजय विखे भाजपात !

अहमदनगर :- ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला असलेली नगर लोकसभेची जागा आपल्याला सोडण्यात येईल, अशी खात्री विखे-पिता पुत्रांना होती पण खा. शरद पवार यांनी नगरची जागा ‘राष्ट्रवादी’लाच राहील, असे वारंवार स्पष्ट केल्यानंतर विखे पाटील यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वर्तुळापर्यंत मजल मारली; मात्र नगरची जागा काँग्रेसला मिळू शकली नाही. त्यावर सुजय यांनी ‘राष्ट्रवादी’त जाण्याचीही तयारी दर्शविली; परंतु त्यांना पक्षात घेण्यासही … Read more

खा.दिलीप गांधींचा पत्ता कट सुजय विखे भाजपचे उमेदवार !

अहमदनगर :- खा.शरद पवार व ‘राष्ट्रवादी’ नगरची जागा काँग्रेसला सोडेना आणि ‘राष्ट्रवादी’मध्येही प्रवेश देईना. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायचीच, असा चंग बांधलेल्या सुजय विखे यांनी अखेर भाजपातून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांचा भाजप प्रवेश होणार असून लोकसभेच्या उमेदवारीसह शिर्डी साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपदही सुजय विखेना मिळणार आहे.  गेले दोन … Read more

….आणि महाजन व विखे पाटील एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईला गेले !

अहमदनगर :- जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले डॉ. सुजय विखे यांनी शनिवारी सायंकाळी नगर शहराजवळील विखे फौंडेशनच्या आवारातून एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईकडे उड्डाण केले. राष्ट्रवादीने नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर डॉ. विखे यांनी काल, शुक्रवारी महाजन यांची जळगावमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर लगेच महाजन शनिवारी दुपारी नगरमध्ये आले होते, … Read more

संत निंबराज महाराज यांच्या वेबसाईटचे प्रकाशन संपन्न.

श्रीगोंदा :- तालुक्यातील देवदैठण येथे निंबराज महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ह.भ.प श्री. ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या हस्ते संत निम्बराज महाराज यांच्या वेबसाईटचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी संत निंबराज देव देवस्थानाचे सर्व ट्रस्टी मंडळी व समस्त ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. सारंग दंडवते यांच्या संकल्पनेतून बनविलेल्या ह्या वेबसाईट वर संत निंबराज महाराज यांच्याबाबत माहिती तसेच बातम्या, कथा,आरती,पारायण,संतवानी, देवस्थान … Read more

…म्हणून विखे पाटील भाजपात ?

मुंबई :- ईडीची पीडा टळो म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजयला भाजपात पाठवला का? असा टोला शिवसेना प्रवक्ता डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. ‘राधाकृष्ण विखे … Read more

शिर्डीत खा.सदाशिव लोखंडेच सेनेचे उमेदवार !

कोपरगाव :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीविषयी मातोश्रीवर झालेल्या चर्चेत खासदार सदाशिव लोखंडे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लोखंडे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. बैठकीच्या सुरुवातीलाच ठाकरे यांनी कोणाही शिवसैनिकाने संभ्रमावस्था न ठेवण्याचे आवाहन केले. भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत येणार असल्याची चर्चा होती. युती झाल्यामुळे … Read more

आ.राहुल जगताप यांना चार वर्षांत काही करता आले नाही !

श्रीगोंदे :- चार वर्षांत भाजप सरकारने तालुक्यात आपली सत्ता नसतानासुध्दा मागेल तेथे निधी देऊन विकासाला गती दिली. या विकासकामांमुळे लोकप्रतिनिधीची पोटदुखी वाढली, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे सांगितले. रस्ते, पथदिवे, नळपाणी, संरक्षक भिंत अशा दीड कोटीच्या कामाचा प्रारंभ पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झाला. जि. प. सदस्य सदाशिव पाचपुते, माउली पाचपुते, सुनील दरेकर, बबनराव … Read more

लोकसभेच्या तिकिटासाठी सुजय विखे पाटील आता भाजपच्या दारात !

मुंबई :- विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आहे. भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील होते. यासंदर्भात भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये काल बैठक झाली … Read more

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून अरुणकाका जगताप यांच्या नावावर शिक्का मोर्तब ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या नगर दक्षिणच्या जागवेरुन तिढा कायम असून आता पुन्हा अरुण काका जगताप यांचा नावाची चर्चा सुरु आहे. निवडणूका जाहीर होण्या अगोरदच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नगर दक्षिणच्या जागवेर चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. नगर दक्षिणच्या जागेसाठी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. त्या … Read more

उड्डाणपूल आणि बाह्यवळण मार्गामुळे शहर व जिल्हा विकासाला चालना- नितीन गडकरी.

अहमदनगर :-  नगर शहरातील उड्डाणपूल आणि बाह्यवळण मार्गाच्या कामांमुळे तसेच जिल्ह्यात होणार्‍या विविध १३ हजार कोटी रुपयांच्या कामांमुळे विकासाचा वेग वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाजबांधणी व नदी विकासस जलसंधारण व गंगा शुद्धीकरणमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नगर शहरातील ३.०८ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचे काम आणि अहमदनगर बाह्यवळण रस्त्याचे ४०.६०० किमी. चौपदरीकरणाच्या कामांचा … Read more

लोकसभेआधीच युवा नेते डॉ.सुजय विखे बनले ‘खासदार’!

अहमदनगर :- लोकसभेसाठी इच्छुक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत असलेले विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांना त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर निवडणुकीच्या आधीच खासदार म्हणून घोषित केलय. दररोज वेगवेगळ्या पक्षातून तिकीट मिळण्याबाबत बातम्या येत असताना ठोस काही निर्णय होत नसल्याने विखे समर्थकांची घालमेल वाढली असून विखे पाटील हाच एक पक्ष आहे, … Read more

उड्डाणपूलाच्या भूमीपुजनास नेत्यांसह नागरिकांनी फिरविली पाठ !

अहमदनगर :- कार्यारंभ आदेश नसलेल्या उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आज भूमिपूजन झाले. यावेळी खासदार दिलीप गांधी, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी,माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास पालकमंत्री राम शिंदे,खा. सदाशिव लोखंडे,जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे,आ संग्राम जगताप,आ.अरुणकाका जगताप,व जिल्ह्यातील इतर सर्वच आमदार अनुपस्थित … Read more

आठ दिवसांत सुरू न झाल्याने ६ छावण्यांची मान्यता रद्द

अहमदनगर :- परवानगी मिळूनही आठ दिवसांत चारा छावणी सुरू न केल्याने सहा संस्थांची छावणीची परवानगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केली. एका गावात दोन-तीन छावण्यांना मान्यता दिली आहे. मान्यता मिळूनही छावण्या सुरू केल्या नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात १५१ चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आठ दिवसांत छावणी सुरू होणे बंधनकारक … Read more