अहमदनगर मधील ‘तो’ भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर , प्रतिबंधाची मुदत आता 10 मेपर्यंत वाढवली !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तू विक्री इत्‍यादी दि. 6 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यत बंद ठेवण्‍याबाबत आदेश देण्‍यात आले होते. दिनांक 26 एप्रिल रोजी … Read more

बोगस बियाणे, खते व कीटकनाशक कंपन्यावर कारवाई करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा : शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही कंपन्या  बोगस बियाणे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊन नुकसान सहन करावे लागते. अशा बोगस बियाण्यांच्या कंपन्यांवर कृषी विभागाने  तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. शेतकऱ्यांना योग्य उत्पादनक्षम बियाणे, खते व कीटकनाशके देऊन त्यांना मदत करण्याचे दायित्व कृषी विभागाचे आहे. शेतकऱ्यांचे … Read more

सध्याच्या संकटकाळात तथागत गौतम बुद्धांची शिकवण अंगीकारणे गरजेचे

अमरावती, दि. 6 : तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी  सर्वांनीच शिस्त, संयम, धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी … Read more

सहकारी संस्थांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु.२५ कोटीची भरीव आर्थिक मदत

मुंबई, दि. ६ कोविड – १९  या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाय योजना करत आहे. राज्यातील सहकारी संस्थांनी आतापर्यत २५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन भरीव आर्थिक मदत केली आहे.  सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. श्री.पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता … Read more

शिर्डी ​ येथून विशेष रेल्वेने १२५१ प्रवासी लखीमपूरकडे रवाना

 शिर्डी,दि.6: कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे शिर्डी आणि परिसरात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील 1251 कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना आज दुपारी शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने टाळयांच्या गजरात उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हयाकडे रवाना करण्यात आले. गुरुवारी, दिनांक 7 मे रोजी सायंकाळी सात वाजेपर्यत सदरहू रेल्वे लखीमपूर येथे पोहोचेल. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने … Read more

विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्यासाठी शासन मदत करणार

चंद्रपूर, दि. 6  : लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात विशेषत: मुंबई-पुणे व अन्य प्रमुख शहरात हजारो विद्यार्थी अडकून आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये पोचविण्याची व्यवस्था राज्य शासन करणार आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार … Read more

उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा

सोलापूर दि. 6 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी  उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा,  अशा सूचना  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज  येथे दिल्या. सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा डॉ. म्हैसेकर यांनी आज आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, … Read more

श्रमिक ट्रेनला पालकमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

वर्धा :  लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात बिहारमधील ७०० मजूर अडकले होते. या मजुरांना घेऊन जाणारी विशेष श्रमिक ट्रेन वर्धेतून पाठवण्यासाठी रवाना झाली. या ट्रेनमध्ये एकूण १ हजार १९ प्रवासी होते. पालकमंत्री सुनील केदार,  खासदार रामदास तडस, आमदार रणजीत कांबळे  यांनी ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून मजुरांना टाळ्यांच्या कडकडाटात  निरोप दिला. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन झाल्यामुळे … Read more

अडीच हजार नागरिक विशेष रेल्वेने उत्तर भारताकडे रवाना

नंदुरबार : सतत दुसऱ्या दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या गाड्यांनी अररिया येथे १२१० आणि पुर्णिया येथे १२९० नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. कालप्रमाणेच आजही चोख पोलीस बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बियरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात, तळीरामांची चांदी झाली

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथे बियरची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला आहे.रांगा लावून दारू घ्यावी लागत असताना राहुरीच्या तळीरामांची चांदी झाली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर मनमाड मार्गावर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बियरची वाहतूक  करणारा  आयशर टेम्पो पलटी झाल्याने तळीरामांची चंगळ झाली. वेळीचपोलिस दाखल झाल्याने बियर मिळण्या ऐवजी … Read more

महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवावी

मुंबई, दि. 6 : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली 40 हजार मेट्रिक टनांची खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केंद्र सरकारकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री … Read more

बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 6 : भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीचं कल्याण सामावलं आहे. हे विचारच मानवाचं जीवन अखंड प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री … Read more

थेट बांधावर बियाणे, खत पुरवठा करण्याच्या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये तसेच शेतकऱ्यांना एकत्रितरित्या खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे खते यांचा त्यांचे बांधावर पुरवठा करण्याच्या उद्देशाने निविष्ठा पुरवठा करणाऱ्या वाहनास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवी झेंडी दाखवून बियाणे खते व किटकनाशके पुरवठा मोहिमेस प्रारंभ केला. थेट बांधावर बियाणे, खत पुरवठा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आता ‘या’ वेळेत मिळणार पेट्रोल !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल सीमा हद्दीमध्ये दररोज पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्री वेळ वाढविण्यात आली आहे. आता सकाळी ०५ ते सायंकाळी ०५ अशी विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. डिझेल विक्री पूर्वीप्रमाणेच २४ तास सुरु राहील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता सार्वजनिक … Read more

मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत

मुंबई, दि. 6 : मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश,  मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीशांना, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्यांनी … Read more

ऑपरेशन ब्लॅकफेस : बाल पोर्नोग्राफीविरोधी मोहीम – गृहमंत्री अनिल देशमुख

जानेवारीच्या मध्यापासून ऑपरेशन ब्लॅकफेस या मोहिमेअंतर्गत आम्ही बाल पोर्नोग्राफीत अडकलेले, तसेच बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे, त्याचप्रमाणे बाल पोर्नोग्राफीच्या व्यसनाधीन झालेल्या  व्यक्तींवर नजर ठेवून आहोत. महाराष्ट्र सायबर विभाग ही कारवाई  करत आहे. बाल पोर्नोग्राफी ही समाजाला लागलेली एक कीड आहे. अतिशय विकृत आणि किळसवाणा असलेला हा प्रकार.. याच्या विरोधात  गृह विभाग अतिशय कठोर पाऊल उचलत असून हे विकृत आता … Read more

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९५ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि.६ : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३  व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतू काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी ३४ रुग्ण कोरोना मुक्त !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :-  कोरोना बाधित असलेल्या जामखेड येथील दोन आणि संगमनेर येथील चौघा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आज या ०६ रुग्णाची बूथ हॉस्पिटलमधून तपासणीनंतर घरी रवानगी करण्यात आली. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, इतर आरोग्य कर्मचार्‍यांनी स्वागत करुन त्यांना निरोप दिला.यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या … Read more