7th Pay Commission : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग इतके दिवस सुट्टी घेतल्यास जाणार नोकरी, पहा नवीन नियम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेताना खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. कारण सलग सुट्ट्या कर्मचाऱ्यांची कायमची सुट्टी करू शकते.

खाजगी नोकरी करणाऱ्यांपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक सुट्ट्या असतात. तरीही अनेकदा सरकारी कर्मचारी सतत सुट्ट्या घेत असतात. कर्मचाऱ्यांच्या याच सवयीमुळे केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आता सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत नवीन नियम बनवण्यात आला आहे. त्यामुळे सलग इतक्या दिवस सुट्ट्या घेणे कर्मचाऱ्यांना महागात पडू शकते. कारण आता सलग सुट्ट्या घेतल्याने कर्मचाऱ्यांची नोकरी देखील जाऊ शकते.

कर्मचाऱ्यांना किती दिवस सुट्टी मिळणार नाही

केंद्र सरकारकडून सुट्ट्यांबाबत आता नवीन नियम बनवण्यात आला आहे. केंद्रीय नागरी सेवा किंवा सीसीएस रजा नियम 1972 च्या नियम 12(1) चा हवाला देत, त्यात म्हटले आहे की सरकारी कर्मचार्‍यांना 5 वर्षांच्या सतत कालावधीसाठी कोणत्याही प्रकारची रजा दिली जाणार नाही.

सामान्यतः, परदेश सेवेव्यतिरिक्त, सलग पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी रजेवर किंवा रजेशिवाय कर्तव्यावर अनुपस्थित राहणे, याचा अर्थ अशा सरकारी कर्मचाऱ्याने सरकारी सेवेचा राजीनामा देणे आहे. त्यामुळे कर्मचारी यापेक्षा अधिक सुट्टी घेऊ शकत नाहीत.

रजा रोखीकरणाचा नवीन नियम

जर कर्मचाऱ्यांना सुट्टी हवी असेल तर त्यासाठी कर्मचाऱ्यांना अगोदरच परवानगी घ्यावी लागेल. तरच त्यांना सुट्टी दिली जाईल अन्यथा कोणत्याही कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाणार नाही. परवानगी घेत असताना LTC सोबत घेणे योग्य आहे. यामुळे तुम्ही काही प्रकरणांमध्ये पुन्हाही सुट्टी घेऊ शकता.

महिलांना लागू असलेले नियम

महिलांच्या प्रसूतीसाठी सरकारकडून अधिक सुट्ट्या दिल्या जात आहेत. महिलांना बाल संगोपनासाठी देखील राजा मिळत असते. जर मूल परदेशात शिकत असेल किंवा महिला कर्मचाऱ्याला त्याची काळजी घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज असेल, तर काही आवश्यक प्रक्रियेनंतर ही रजा दिली जाऊ शकते.